शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Brinda Karat: एकात्मता धुळीस मिळविण्याचा मोदींचा डाव, वृंदा करातांचा केंद्र सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 17:42 IST

देशात महागाई वाढली आहे, परंतु पंतप्रधान मोदी व त्यांच्या समर्थकांना त्याची काळजी नाही, तर त्यांना हनुमान चालिसा वाचण्याची काळजी आहे.

सातारा : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी राष्ट्रीय एकात्मता व भाईचारा होता, तो धुळीस मिळविण्याचा कार्यक्रम केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारने हाती घेतला आहे. याच्याविरोधात आता सर्वांनीच एल्गार पुकारला पाहिजे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांनी सातारा येथील गांधी मैदानावरील जाहीर सभेत बोलताना केले.ऐतिहासिक सातारा शहरातील महात्मा गांधी मैदानावर काल, शुक्रवारी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्यावतीने ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी जनवादीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा कॉम्रेड नसीमा शेख होत्या.यावेळी विचार मंचावर ज्येष्ठ नेत्या कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर,  स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, उदय नारकर, कॉ. सुधा सुंदरामन, शुभा शमीम, प्राची हातिवलेकर, मरियम ढवळे, किरण माने, माणिक अवघडे, आनंदी अवघडे आदी उपस्थित होते. यावेळी सातारकर उपस्थित होते.करात म्हणाल्या, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बदलण्याचे काम करीत आहेत, हे आपल्याला जनतेपुढे आणायचे आहे. जो एकात्मतेचा विचार घेऊन स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले, ते हौतात्म्य आम्ही वाया जाऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.स्वातंत्र्ययुद्ध सुरू होते, तेव्हा मोदीजी यांच्या विचारांचे अनुयायी कुठे होते, असा सवालही उपस्थित केला.  देशाच्या संविधानावर घाला घालण्याचे काम मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत असल्याचा आरोप करून, संविधान बदलण्याचे कारस्थान आम्ही हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला. देशात महागाई वाढली आहे, परंतु पंतप्रधान मोदी व त्यांच्या समर्थकांना त्याची काळजी नाही, तर त्यांना हनुमान चालिसा वाचण्याची काळजी आहे.यावेळी कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर, शुभा शमीम, मरियम ढवळे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक जनवादीच्या जिल्हा चिटणीस आनंदी अवघडे यांनी केले, सूत्रसंचालन प्राची हातिवलेकर यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार