शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Brinda Karat: एकात्मता धुळीस मिळविण्याचा मोदींचा डाव, वृंदा करातांचा केंद्र सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 17:42 IST

देशात महागाई वाढली आहे, परंतु पंतप्रधान मोदी व त्यांच्या समर्थकांना त्याची काळजी नाही, तर त्यांना हनुमान चालिसा वाचण्याची काळजी आहे.

सातारा : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी राष्ट्रीय एकात्मता व भाईचारा होता, तो धुळीस मिळविण्याचा कार्यक्रम केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारने हाती घेतला आहे. याच्याविरोधात आता सर्वांनीच एल्गार पुकारला पाहिजे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांनी सातारा येथील गांधी मैदानावरील जाहीर सभेत बोलताना केले.ऐतिहासिक सातारा शहरातील महात्मा गांधी मैदानावर काल, शुक्रवारी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्यावतीने ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी जनवादीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा कॉम्रेड नसीमा शेख होत्या.यावेळी विचार मंचावर ज्येष्ठ नेत्या कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर,  स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, उदय नारकर, कॉ. सुधा सुंदरामन, शुभा शमीम, प्राची हातिवलेकर, मरियम ढवळे, किरण माने, माणिक अवघडे, आनंदी अवघडे आदी उपस्थित होते. यावेळी सातारकर उपस्थित होते.करात म्हणाल्या, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बदलण्याचे काम करीत आहेत, हे आपल्याला जनतेपुढे आणायचे आहे. जो एकात्मतेचा विचार घेऊन स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले, ते हौतात्म्य आम्ही वाया जाऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.स्वातंत्र्ययुद्ध सुरू होते, तेव्हा मोदीजी यांच्या विचारांचे अनुयायी कुठे होते, असा सवालही उपस्थित केला.  देशाच्या संविधानावर घाला घालण्याचे काम मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत असल्याचा आरोप करून, संविधान बदलण्याचे कारस्थान आम्ही हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला. देशात महागाई वाढली आहे, परंतु पंतप्रधान मोदी व त्यांच्या समर्थकांना त्याची काळजी नाही, तर त्यांना हनुमान चालिसा वाचण्याची काळजी आहे.यावेळी कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर, शुभा शमीम, मरियम ढवळे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक जनवादीच्या जिल्हा चिटणीस आनंदी अवघडे यांनी केले, सूत्रसंचालन प्राची हातिवलेकर यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार