शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

अखेर प्रेमचं जिकलं, अडीचशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांवरील बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 14:55 IST

या ऐतिहासिक निर्णयामुळे त्या जोडप्यांना आता समाजात सन्मानाने जगता येऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

सातारा : नंदीवाले, काशीकापडी आणि तिरमल समाजाने नुकताच अडीचशे आंतरजातीय विवाहित जोडपे यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला सामाजिक बहिष्कार मागे घेतला. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारामुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे.

या तिन्ही समाजातील जातपंचायतीमार्फत गेल्या अनेक दशकांच्यापासून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार टाकला जात असे. या जोडप्यांना समाजातील कोणत्याही कार्यक्रमाला जाणीवपूर्वक टाळले जायचे. तसेच अनेक ठिकाणी त्या जोडप्यांना त्यांच्या कुटुंबातील लग्न, अंत्यविधी अशा कार्यक्रमांना देखील सहभागी होऊ दिले जात नव्हते. महाराष्ट्रात सगळी मिळून अडीचशे जोडपी सामाजिक बहिष्कृततेचे जिणे जगत होती. या ऐतिहासिक निर्णयामुळे त्या जोडप्यांना आता समाजात सन्मानाने जगता येऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

कऱ्हाड येथे नुकतीच या तिन्ही समाजातील पंचांची आणि संबंधित जोडप्यांची बैठक झाली. आंतरजातीय विवाहांना आता कायद्याचे पाठबळ आहे. लोकांचे व्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा लक्षात घेऊन तसेच सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर हा ऐतिहासिक निर्णय बहुमताने घेण्यात आला. वसंतराव देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जाहीर केल की, यापुढे आंतरजातीय लग्न करणाऱ्या कुटुंबाला बहिष्कृत केले जाणार नाही तसेच त्यांच्याकडून दंड घेतला जाणार नाही, असा देखील निर्णय घेतला गेला.

आंतरजातीय विवाह केल्याने बहिष्कृत जोडप्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. अजून काही पंच कायदा विरोधी भूमिका घेत असल्यास त्या विरोधी गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असेही अंनिसचे शंकर कणसे, डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत दीपक माने, भगवान रणदिवे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

साताऱ्यातील मेढ्यामधून क्रांतीला सुरुवात

सातारा जिल्ह्यातील मेढा शहरातील अशाच एका प्रकारात सातारा पोलीस आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या पुढाकाराने जोडप्यांवरील बहिष्कार उठवण्याचे आश्वासन दिले, मेढ्यामधूनच क्रांतीला सुरुवात झाली.

कुठलीही व्यक्ती किंवा समूहावर सामाजिक बहिष्कार घालणे, हा कायद्याने गुन्हा आहे. जे लोक अंधश्रद्धेपोटी अशा निर्णयावर अडून बसतात, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो. अन्यथा पोलिसांच्या मदतीने कायद्याची अंमलबजावणी केली जाते. डॉ. हमीद दाभोळकर, राज्य कार्यकारी समिती सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न