शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर प्रेमचं जिकलं, अडीचशे आंतरजातीय विवाहित जोडप्यांवरील बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 14:55 IST

या ऐतिहासिक निर्णयामुळे त्या जोडप्यांना आता समाजात सन्मानाने जगता येऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

सातारा : नंदीवाले, काशीकापडी आणि तिरमल समाजाने नुकताच अडीचशे आंतरजातीय विवाहित जोडपे यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला सामाजिक बहिष्कार मागे घेतला. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारामुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे.

या तिन्ही समाजातील जातपंचायतीमार्फत गेल्या अनेक दशकांच्यापासून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार टाकला जात असे. या जोडप्यांना समाजातील कोणत्याही कार्यक्रमाला जाणीवपूर्वक टाळले जायचे. तसेच अनेक ठिकाणी त्या जोडप्यांना त्यांच्या कुटुंबातील लग्न, अंत्यविधी अशा कार्यक्रमांना देखील सहभागी होऊ दिले जात नव्हते. महाराष्ट्रात सगळी मिळून अडीचशे जोडपी सामाजिक बहिष्कृततेचे जिणे जगत होती. या ऐतिहासिक निर्णयामुळे त्या जोडप्यांना आता समाजात सन्मानाने जगता येऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

कऱ्हाड येथे नुकतीच या तिन्ही समाजातील पंचांची आणि संबंधित जोडप्यांची बैठक झाली. आंतरजातीय विवाहांना आता कायद्याचे पाठबळ आहे. लोकांचे व्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा लक्षात घेऊन तसेच सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर हा ऐतिहासिक निर्णय बहुमताने घेण्यात आला. वसंतराव देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जाहीर केल की, यापुढे आंतरजातीय लग्न करणाऱ्या कुटुंबाला बहिष्कृत केले जाणार नाही तसेच त्यांच्याकडून दंड घेतला जाणार नाही, असा देखील निर्णय घेतला गेला.

आंतरजातीय विवाह केल्याने बहिष्कृत जोडप्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. अजून काही पंच कायदा विरोधी भूमिका घेत असल्यास त्या विरोधी गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असेही अंनिसचे शंकर कणसे, डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत दीपक माने, भगवान रणदिवे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

साताऱ्यातील मेढ्यामधून क्रांतीला सुरुवात

सातारा जिल्ह्यातील मेढा शहरातील अशाच एका प्रकारात सातारा पोलीस आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या पुढाकाराने जोडप्यांवरील बहिष्कार उठवण्याचे आश्वासन दिले, मेढ्यामधूनच क्रांतीला सुरुवात झाली.

कुठलीही व्यक्ती किंवा समूहावर सामाजिक बहिष्कार घालणे, हा कायद्याने गुन्हा आहे. जे लोक अंधश्रद्धेपोटी अशा निर्णयावर अडून बसतात, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो. अन्यथा पोलिसांच्या मदतीने कायद्याची अंमलबजावणी केली जाते. डॉ. हमीद दाभोळकर, राज्य कार्यकारी समिती सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न