शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

‘नमो शेतकरी महासन्मान योजना: सातारा जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ८० कोटी

By नितीन काळेल | Updated: October 11, 2023 19:03 IST

केंद्र शासनाचाही वर्षातील दुसरा हप्ता मिळणार 

सातारा : बळीराजाला मदत होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्षाला शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळतात. त्याप्रमाणेच राज्य शासनानेही नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली असून याचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ८० कोटी रुपये जमा होणार आहेत. तर केंद्राचाही दुसरा हप्ता मिळू शकते. त्यामुळे बळीराजा मालामाल होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या अंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्यात येतात. हे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होत असतात. आतापर्यंत शेतकऱ्यांना १४ हप्ते देण्यात आलेले आहेत. यातून शेतकरी शेतीपयोगी साहित्य, खते आणि बियाणे खरेदी करत असतो. त्याचबरोबर राज्य शासनानेही शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेवर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झालेले आहे.त्यातच ‘नमो’ योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होऊ शकतात. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर सुमारे ८० कोटी येऊ शकतात. त्याचबरोबर केंद्र शासनाने या योजने अंतर्गत २०२३-२४ वर्षातील पहिला हप्ता दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना दिलेला आहे. आता दुसरा हप्ताही लवकरच मिळणार आहे. दिवाळीच्यावेळीच हा निधी जमा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.

जिल्ह्यात साडेचार लाख लाभार्थी...केंद्र शासनाने ही योजना सुरू केली तेव्हा जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक शेतकरी लाभाऱ्थी होते. मात्र, त्यानंतर आयकर भरणारे, नोकरदार यांना वगळण्यात आले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४७ हजार ६५५ शेतकरी लाभाऱ्थी राहिले होते. त्यातील ४ लाख ८ हजार ४३४ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीbankबँकDiwaliदिवाळी 2022