शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

‘नमो शेतकरी महासन्मान योजना: सातारा जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ८० कोटी

By नितीन काळेल | Updated: October 11, 2023 19:03 IST

केंद्र शासनाचाही वर्षातील दुसरा हप्ता मिळणार 

सातारा : बळीराजाला मदत होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्षाला शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळतात. त्याप्रमाणेच राज्य शासनानेही नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली असून याचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ८० कोटी रुपये जमा होणार आहेत. तर केंद्राचाही दुसरा हप्ता मिळू शकते. त्यामुळे बळीराजा मालामाल होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या अंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्यात येतात. हे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होत असतात. आतापर्यंत शेतकऱ्यांना १४ हप्ते देण्यात आलेले आहेत. यातून शेतकरी शेतीपयोगी साहित्य, खते आणि बियाणे खरेदी करत असतो. त्याचबरोबर राज्य शासनानेही शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेवर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झालेले आहे.त्यातच ‘नमो’ योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होऊ शकतात. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर सुमारे ८० कोटी येऊ शकतात. त्याचबरोबर केंद्र शासनाने या योजने अंतर्गत २०२३-२४ वर्षातील पहिला हप्ता दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना दिलेला आहे. आता दुसरा हप्ताही लवकरच मिळणार आहे. दिवाळीच्यावेळीच हा निधी जमा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.

जिल्ह्यात साडेचार लाख लाभार्थी...केंद्र शासनाने ही योजना सुरू केली तेव्हा जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक शेतकरी लाभाऱ्थी होते. मात्र, त्यानंतर आयकर भरणारे, नोकरदार यांना वगळण्यात आले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४७ हजार ६५५ शेतकरी लाभाऱ्थी राहिले होते. त्यातील ४ लाख ८ हजार ४३४ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीbankबँकDiwaliदिवाळी 2022