शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

नालाबांध झाला पाझर तलाव ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 16:48 IST

सातारा : ग्रामस्थांमध्ये एकी असेल तर अशक्य कामेही शक्य होऊन जातात. त्यामुळे गावाचा विकास होतोच त्याचबरोबर हाच आदर्श इतरांसमोरही राहतो. अशाचप्रकारे माण तालुक्यातील बनगरवाडी गावाने एकीमुळे इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. ओढ्यावरील नालाबांधाचे रुपांतर पाझर तलाव्यात केले असून यामुळे अडीच कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. तर दिडशे एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. 

ठळक मुद्देबनगरवाडी ग्रामस्थांची एकी अडीच कोटी लिटर पाणीसाठा होणारदिडशे एकर क्षेत्राला फायदा दिडशे एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत

सातारा : ग्रामस्थांमध्ये एकी असेल तर अशक्य कामेही शक्य होऊन जातात. त्यामुळे गावाचा विकास होतोच त्याचबरोबर हाच आदर्श इतरांसमोरही राहतो. अशाचप्रकारे माण तालुक्यातील बनगरवाडी गावाने एकीमुळे इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. ओढ्यावरील नालाबांधाचे रुपांतर पाझर तलाव्यात केले असून यामुळे अडीच कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. तर दिडशे एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. 

माण तालुका म्हटला की समोर येतो तो दुष्काळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष. सततची ही परिस्थिती आहे. मात्र, अलीकडील काहीकाळात यामध्ये बदल होत आहे. विकासासाठी गावे एक होऊ लागली आहेत. शासनाच्या मदतीशिवायही अनेक गावांनी लोकवर्गणी व श्रमदानातून मोठी कामे केली आहेत.

तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गावाने एकत्र येत पाणीसाठ्याची अनेक कामे केली आहेत. यामधील प्रमुख काम म्हणजे नालाबांधाचे पाझर तलावत केलेले रुपांतर. येथील बामणकी ओढ्यावर गावाशेजारीच पूर्वी नालाबांध होता.

पावसाळ्यात सुमारे २०० एकर क्षेत्रावरून या नालाबांधात पाणी येते. मात्र, नालाबांधाला गळती असल्याने पाणी वाहून जायचे. त्यामुळे या नालाबांधाचा फायदा होत नव्हता. त्यातच माण तालुक्यात पाणलोट, वॉटर कप स्पर्धेमुळे गावागावांत पाणी चळवळ सुरू झाली. यातूनच आयकर विभागातील सह आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ एकत्र आले.

गावासाठी पाणी चळवळ राबवायचा निर्णय घेऊन एकी केली. त्यातूनच नालाबांधाचा पाझर तलाव होऊ लागला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

ग्रामस्थ पाझर तलावासाठी रोज श्रमदान करत आहेत. सकाळी साडे आठ ते दहा वाजेपर्यंत ग्रामस्थ काम करतात. या पाझर तलावाच्या भिंतीची लांबी सुमारे १५० मिटर इतकी झाली आहे. लोकांनी स्वत: काम केल्याने काम दर्जेदार झाले असून याचा फायदा पाणीसाठा झाल्यानंतरच समोर येणार आहे. शासनाच्या मदतीशिवाय हे काम झाले आहे. यामागे गावाची एकीच कारणीभूत ठरली आहे. 

पाझर तलावाची स्थिती...

भिंतींची लांबी १५० मिटर१० फूट उंचीचा तसेच पाठीमागे २५० मिटरपर्यंत पाणीसाठा होणार १५० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार परिसरातील ६० विहिरींना फायदा दहा लाखांच्या शासकीय अंदाजाचे काम फक्त ३ लाखांत चहा, नाष्ट्याची सोय...दररोज सकाळी ग्रामस्थ श्रमदानासाठी येतात. त्यांच्यासाठी अनेकजण स्वइच्छेने चहा, नाष्ट्यांची सोय करतात. या कामाची पाहणी आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनीही केली आहे. शासकीय अधिकाºयांनीही या कामाला भेट दिली आहे.