शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
7
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
8
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
9
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
10
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
11
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
12
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
13
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
14
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
15
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
16
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
17
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
18
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
19
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
20
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?

नालाबांध झाला पाझर तलाव ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 16:48 IST

सातारा : ग्रामस्थांमध्ये एकी असेल तर अशक्य कामेही शक्य होऊन जातात. त्यामुळे गावाचा विकास होतोच त्याचबरोबर हाच आदर्श इतरांसमोरही राहतो. अशाचप्रकारे माण तालुक्यातील बनगरवाडी गावाने एकीमुळे इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. ओढ्यावरील नालाबांधाचे रुपांतर पाझर तलाव्यात केले असून यामुळे अडीच कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. तर दिडशे एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. 

ठळक मुद्देबनगरवाडी ग्रामस्थांची एकी अडीच कोटी लिटर पाणीसाठा होणारदिडशे एकर क्षेत्राला फायदा दिडशे एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत

सातारा : ग्रामस्थांमध्ये एकी असेल तर अशक्य कामेही शक्य होऊन जातात. त्यामुळे गावाचा विकास होतोच त्याचबरोबर हाच आदर्श इतरांसमोरही राहतो. अशाचप्रकारे माण तालुक्यातील बनगरवाडी गावाने एकीमुळे इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. ओढ्यावरील नालाबांधाचे रुपांतर पाझर तलाव्यात केले असून यामुळे अडीच कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. तर दिडशे एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. 

माण तालुका म्हटला की समोर येतो तो दुष्काळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष. सततची ही परिस्थिती आहे. मात्र, अलीकडील काहीकाळात यामध्ये बदल होत आहे. विकासासाठी गावे एक होऊ लागली आहेत. शासनाच्या मदतीशिवायही अनेक गावांनी लोकवर्गणी व श्रमदानातून मोठी कामे केली आहेत.

तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गावाने एकत्र येत पाणीसाठ्याची अनेक कामे केली आहेत. यामधील प्रमुख काम म्हणजे नालाबांधाचे पाझर तलावत केलेले रुपांतर. येथील बामणकी ओढ्यावर गावाशेजारीच पूर्वी नालाबांध होता.

पावसाळ्यात सुमारे २०० एकर क्षेत्रावरून या नालाबांधात पाणी येते. मात्र, नालाबांधाला गळती असल्याने पाणी वाहून जायचे. त्यामुळे या नालाबांधाचा फायदा होत नव्हता. त्यातच माण तालुक्यात पाणलोट, वॉटर कप स्पर्धेमुळे गावागावांत पाणी चळवळ सुरू झाली. यातूनच आयकर विभागातील सह आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ एकत्र आले.

गावासाठी पाणी चळवळ राबवायचा निर्णय घेऊन एकी केली. त्यातूनच नालाबांधाचा पाझर तलाव होऊ लागला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

ग्रामस्थ पाझर तलावासाठी रोज श्रमदान करत आहेत. सकाळी साडे आठ ते दहा वाजेपर्यंत ग्रामस्थ काम करतात. या पाझर तलावाच्या भिंतीची लांबी सुमारे १५० मिटर इतकी झाली आहे. लोकांनी स्वत: काम केल्याने काम दर्जेदार झाले असून याचा फायदा पाणीसाठा झाल्यानंतरच समोर येणार आहे. शासनाच्या मदतीशिवाय हे काम झाले आहे. यामागे गावाची एकीच कारणीभूत ठरली आहे. 

पाझर तलावाची स्थिती...

भिंतींची लांबी १५० मिटर१० फूट उंचीचा तसेच पाठीमागे २५० मिटरपर्यंत पाणीसाठा होणार १५० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार परिसरातील ६० विहिरींना फायदा दहा लाखांच्या शासकीय अंदाजाचे काम फक्त ३ लाखांत चहा, नाष्ट्याची सोय...दररोज सकाळी ग्रामस्थ श्रमदानासाठी येतात. त्यांच्यासाठी अनेकजण स्वइच्छेने चहा, नाष्ट्यांची सोय करतात. या कामाची पाहणी आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनीही केली आहे. शासकीय अधिकाºयांनीही या कामाला भेट दिली आहे.