शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधाच्या कारणावरून युवकाचा खून -: सख्ख्या भावांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 20:39 IST

अनिकेतचे ज्या युवतीशी प्रेमसंबंध होते त्या युवतीचा मंगळवार, दि. १३ विवाह होता. हा विवाह सोहळा त्या दिवशी पार पडला. दुसऱ्या दिवशी अनिकेतचा भाऊ अभिकांत सेंट्रिंगच्या कामावर निघून गेला.

ठळक मुद्देरेठरेतील घटना ; लाकडी दांडक्याने केली मारहाण

क-हाड : नात्यातील युवतीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत युवकाचा खून करण्यात आला. रेठरे कॉलनी, ता. कºहाड येथे बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे.

अनिकेत राजेश रसाळ (वय २४, रा. कार्वे, ता. क-हाड) अने खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर जयदीप शंकर रसाळ व रविराज शंकर रसाळ (दोघेही मूळ रा. कार्वे, सध्या रा. रेठरे कॉलनी) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद अभिकांत राजेश रसाळ यांनी कºहाड तालुका पोलिसांत दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वे येथील अनिकेत रसाळ व त्याचा भाऊ अभिकांत हे दोघेजण सेंट्रिंग काम करीत होते. अनिकेतचे गावातीलच जयदीप रसाळ याच्या नात्यातील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. जयदीप रसाळ व रविराज रसाळ हे मूळचे राहणारे कार्वे येथीलच आहेत. मात्र, कामानिमित्त ते सध्या रेठरे कॉलनी येथे राहत होते. दरम्यान, नात्यातील युवतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून जयदीप आणि रविराज यांचा अनिकेतशी वारंवार वाद झाला होता. मात्र, त्या वादावर तात्पुरता पडदा पडायचा.

दरम्यान, अनिकेतचे ज्या युवतीशी प्रेमसंबंध होते त्या युवतीचा मंगळवार, दि. १३ विवाह होता. हा विवाह सोहळा त्या दिवशी पार पडला. दुसऱ्या दिवशी अनिकेतचा भाऊ अभिकांत सेंट्रिंगच्या कामावर निघून गेला. तर अनिकेत घरातच होता. रात्री उशिरा अभिकांत घरी आला असता पोलिसांनी त्यांच्या वडिलांना पोलीस ठाण्यात नेल्याचे समजले. त्यामुळे तो तातडीने पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी अनिकेतचा खून झाला असल्याची माहिती अभिकांतला मिळाली.गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अनिकेत हा जयदीप आणि रविराज ज्याठिकाणी राहतात त्याठिकाणी गेला होता. अनिकेतला पाहताच त्या दोघांचा रागाचा पारा चढला. त्यांनी त्याला पकडून नजीकच्या शेतात नेले. त्याठिकाणी त्यांनी लाकडी दांडके व लाथाबुक्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी जयदीप आणि रविराज यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना केल्या.पाय मोडला; बरकड्याही तोडल्या!अनिकेतला आरोपींकडून बेदम मारहाण करण्यात आली असल्याचे पोलिसांनी त्याचा भाऊ अभिकांतला सांगितले. अनिकेतच्या हातावर, पायावर, गालावर, मांडीवर मारहाणीच्या खुणा होत्या. तसेच डोक्यात जखम होती. त्या जखमेतून रक्त येत होते. तसेच त्याचा एक पाय मोडल्याचे आणि बरकड्याही तुटल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे अभिकांतने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून