शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका स्वबळावर

By admin | Updated: July 6, 2016 00:24 IST

अशोकराव गायकवाड : रामदास आठवले यांच्या निवडीने पक्षाला बळकटी

कऱ्हाड : ‘जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे स्थान महत्त्वाचे आहे. मित्रपक्षासोबत काम करत असताना त्यांनी आम्हाला सतत नाराज केले आहे. मध्यंतरी शासनाच्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडीवेळीही मित्रपक्षांनी आम्हाला डावलले. त्यामुळे आता आगामी जिल्ह्यातील पालिका निवडणुका या स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळात निवड झाल्यामुळे पक्षाला नवे बळ मिळाले आहे. जिल्ह्यात याचा जल्लोष साजरा केला जात आहे,’ अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद गायकवाड, मधुकर आठवले, अशोक मदने, नितीन आवळे, संतोष संपकाळ, आप्पासाहेब गायकवाड, एकनाथ रोकडे, सचिन वायदंडे आदी उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतलेला निर्णय हा खरोखरच योग्य आहे. त्यांनी आतापर्यंत राज्यातील दलित समाजबांधवांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आता निवडीमुळे त्यांना देशासाठी कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे दलित बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सातारा येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ केला जाणार आहे. जिल्ह्यात आरपीआय पक्षाला बळकटी देण्यासाठी लवकरच कार्यकारीमध्ये बदल केले जाणार आहेत. आरपीआयचे जिल्ह्यात सातारा, वाई, महाबळेश्वर, रहिमतपूर नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहोत. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जागा निवडून आणणार आहे, अशी माहिती अशोकराव गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)