शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका स्वबळावर

By admin | Updated: July 6, 2016 00:24 IST

अशोकराव गायकवाड : रामदास आठवले यांच्या निवडीने पक्षाला बळकटी

कऱ्हाड : ‘जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे स्थान महत्त्वाचे आहे. मित्रपक्षासोबत काम करत असताना त्यांनी आम्हाला सतत नाराज केले आहे. मध्यंतरी शासनाच्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडीवेळीही मित्रपक्षांनी आम्हाला डावलले. त्यामुळे आता आगामी जिल्ह्यातील पालिका निवडणुका या स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळात निवड झाल्यामुळे पक्षाला नवे बळ मिळाले आहे. जिल्ह्यात याचा जल्लोष साजरा केला जात आहे,’ अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद गायकवाड, मधुकर आठवले, अशोक मदने, नितीन आवळे, संतोष संपकाळ, आप्पासाहेब गायकवाड, एकनाथ रोकडे, सचिन वायदंडे आदी उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतलेला निर्णय हा खरोखरच योग्य आहे. त्यांनी आतापर्यंत राज्यातील दलित समाजबांधवांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आता निवडीमुळे त्यांना देशासाठी कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे दलित बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सातारा येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ केला जाणार आहे. जिल्ह्यात आरपीआय पक्षाला बळकटी देण्यासाठी लवकरच कार्यकारीमध्ये बदल केले जाणार आहेत. आरपीआयचे जिल्ह्यात सातारा, वाई, महाबळेश्वर, रहिमतपूर नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहोत. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जागा निवडून आणणार आहे, अशी माहिती अशोकराव गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)