शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाईतील ११७ ग्रामपंचायतींना महावितरणचा झटका!, गलथान कारभाराचा जनतेला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 14:35 IST

ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ही पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची असून, त्यांनी ते वेळेत न भरल्याने वाई तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग अंधारात

वाई : वाई तालुक्यातील सर्व ११७ गावांमधील पथदिव्यांचे कनेक्शन गुरुवार, दि. १६ रोजीपासून महावितरणकडून तोडण्यात आले आहे. ग्रामपंचायतींचे लाखोंचे बिल थकल्याने महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ही पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची असून, त्यांनी ते वेळेत न भरल्याने वाई तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग अंधारात आहे, तर गावांतील सर्व पाण्याच्या योजना बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.वाई पंचायत समितीकडून वेळेत लाईट बिल भरले गेले नसल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचायत समिती व महावितरणच्या विरोधात आरपीआय, मराठा आघाडी आक्रमक झाली असून, ११७ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ सोमवार, दि. २० रोजी धडक मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार आहे, त्या अनुषंगाने शुक्रवार, दि. १७ रोजी वाई शासकीय विश्रामग्रहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातील पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वानुमते वाई येथून पंचायत समितीपर्यंत महामोर्चाचे आयोजन केले असून, महावितरणचा झटका बसलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे. हा मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मराठा आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीनिवास घाडगे, उपाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र स्वप्निल गायकवाड, मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील मांढरे, वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, संतोष गायकवाड, काली घाडगे, रुपेश मिसाळ, किरण घाडगे, अनिल सणस, बाजीगर इनामदार, विशाल शिंदे, उमेश गाडे, नीलेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोर्चात ग्रामपंचायतींना सहभागी होण्याचे आवाहन...

वाई तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा जमा होणारा महसूल तुटपुंजा आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेची जबाबदारी असल्यामुळे ग्रामपंचायतील वीजबिल भरणे शक्य नाही, सध्या तालुक्यातील सर्व गावे अंधारात आहेत. तरी या समस्यांविषयी आवाज उठविण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आरपीआय, मराठा आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण