शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

वाईतील ११७ ग्रामपंचायतींना महावितरणचा झटका!, गलथान कारभाराचा जनतेला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 14:35 IST

ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ही पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची असून, त्यांनी ते वेळेत न भरल्याने वाई तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग अंधारात

वाई : वाई तालुक्यातील सर्व ११७ गावांमधील पथदिव्यांचे कनेक्शन गुरुवार, दि. १६ रोजीपासून महावितरणकडून तोडण्यात आले आहे. ग्रामपंचायतींचे लाखोंचे बिल थकल्याने महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ही पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची असून, त्यांनी ते वेळेत न भरल्याने वाई तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग अंधारात आहे, तर गावांतील सर्व पाण्याच्या योजना बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.वाई पंचायत समितीकडून वेळेत लाईट बिल भरले गेले नसल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचायत समिती व महावितरणच्या विरोधात आरपीआय, मराठा आघाडी आक्रमक झाली असून, ११७ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ सोमवार, दि. २० रोजी धडक मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार आहे, त्या अनुषंगाने शुक्रवार, दि. १७ रोजी वाई शासकीय विश्रामग्रहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातील पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वानुमते वाई येथून पंचायत समितीपर्यंत महामोर्चाचे आयोजन केले असून, महावितरणचा झटका बसलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे. हा मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मराठा आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीनिवास घाडगे, उपाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र स्वप्निल गायकवाड, मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील मांढरे, वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, संतोष गायकवाड, काली घाडगे, रुपेश मिसाळ, किरण घाडगे, अनिल सणस, बाजीगर इनामदार, विशाल शिंदे, उमेश गाडे, नीलेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोर्चात ग्रामपंचायतींना सहभागी होण्याचे आवाहन...

वाई तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा जमा होणारा महसूल तुटपुंजा आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेची जबाबदारी असल्यामुळे ग्रामपंचायतील वीजबिल भरणे शक्य नाही, सध्या तालुक्यातील सर्व गावे अंधारात आहेत. तरी या समस्यांविषयी आवाज उठविण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आरपीआय, मराठा आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण