शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर उताराला भात लागणी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:19 IST

शेतकरी व्यस्त : बियाणांची किंमत वाढल्याने नाराजी

आॅनलाईन लोकमतचाफळ (जि. सातारा), दि. २२ :चाफळ विभागात गत आठ दिवसापासुन पडत असलेल्या संततधार पावसामुळे खरीपाची पेरणी केलेल्या पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने झाली आहे. विभागात सर्वत्र पडत असलेल्या पावसामुळे डोंगर उतारावरुन येणारे पाणी आडव्या पाटाकडे वळवुन पाडळोशी, केळोलीसह परीसरातील शेतकऱ्यांनी रखडलेल्या भात लागणीस सुरूवात केली आहे.डोंगराळ व दुर्गम विभाग म्हणुन चाफळ विभागाकडे पाहिले जाते. विभागात डेरवण पाझर तलाव व उत्तरमांड धरणाची उभारणी झाली असली तरी आजही बहुतांश शेती कोरडवाहु व पुर्णत: पावसावर अवलंबुन आहे. गत महिनाभरापासुन मान्सुनच्या पावसाने विभागाकडे पाठ फिरवली होती. मात्र, गत आठ दिवसापासुन विभागात पावसाची रिपरिप सुरु झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. विभागाच्या पश्चिमेकडील धायटी, पाडळोशी, केळोली, विरेवाडी, पाठवडे , दाढोली आदी अनेक गावात सध्या भात लागणीची कामे सुरु आहेत. या विभागातील शेती डोंगर उताराची असल्याने येथील शेतकरी भात लागवड जास्त प्रमाणात करतात. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी भात बियाणांच्या किंमतीत शंभर रुपयाने वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थीक भूर्दंड सहन करावा लागत आहे. विभागात सध्या गंगा कावेरी, इंद्रायणी, भोगावती, तृप्ती आदी भात वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मान्सुनच्या सुरुवातीला पडलेल्या तुरळक पावसावर येथील शेतकऱ्यांनी शेतामध्ये तरवे टाकले होते. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेकऱ्यांची भात लागन धोक्यात आली. सध्या उशिरा का होईना दमदार हजेरी लावल्याने रखडलेल्या भात लागणींच्या कामाला वेग आला आहे. सध्या विभागातील शेतकरी आपल्या बैल जोडीच्या सहाय्याने शेतात चिखल करुन भात लागवड करताना दिसून येत आहेत. विभागात गत काही वषार्पासुन पारंपारीक पध्दतीने भात लागवड न करता कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली लागवड केली जात होेती. परंतु सध्या विभागातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी खात्याचे कर्मचारी पोहचु न शकल्याने शेतकऱ्यांतून तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असुन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाविनाच चालु वर्षी शेतकरी भात लागवड करताना दिसुन येत आहेत.गतवर्षीच्या तुलनेत भात बियाणांच्या किंमतीत सहा किलो मागे तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी गंगाकावेरीच्या सहा किलो पिशविचा दर ७५० रुपए होता. आता हे बियाणे ८५० रुपयाला आहे. तर इंद्रायणी गेल्यावर्षी ६ किलो हजार रूपयाला होते. आता त्यामध्ये वाढ होऊन सहा किलोचा दर १ हजार २०० रुपए झाला आहे. तृप्ती बियाणे २०० रूपयाला होते आता ३०० रुपयाला झाले आहे. तर भोगावती बियाणे ६५० ला होत. ते ८६० रुपयाला विकत घ्यावे लागत आहे. शासनाने जीएसटीची नविन करप्रणाली लागु केल्याने ही दरवाढ झाल्याचे दुकानदार सांगत आहेत.- राजाराम पवार, शेतकरी