शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

डोंगर उताराला भात लागणी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:19 IST

शेतकरी व्यस्त : बियाणांची किंमत वाढल्याने नाराजी

आॅनलाईन लोकमतचाफळ (जि. सातारा), दि. २२ :चाफळ विभागात गत आठ दिवसापासुन पडत असलेल्या संततधार पावसामुळे खरीपाची पेरणी केलेल्या पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने झाली आहे. विभागात सर्वत्र पडत असलेल्या पावसामुळे डोंगर उतारावरुन येणारे पाणी आडव्या पाटाकडे वळवुन पाडळोशी, केळोलीसह परीसरातील शेतकऱ्यांनी रखडलेल्या भात लागणीस सुरूवात केली आहे.डोंगराळ व दुर्गम विभाग म्हणुन चाफळ विभागाकडे पाहिले जाते. विभागात डेरवण पाझर तलाव व उत्तरमांड धरणाची उभारणी झाली असली तरी आजही बहुतांश शेती कोरडवाहु व पुर्णत: पावसावर अवलंबुन आहे. गत महिनाभरापासुन मान्सुनच्या पावसाने विभागाकडे पाठ फिरवली होती. मात्र, गत आठ दिवसापासुन विभागात पावसाची रिपरिप सुरु झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. विभागाच्या पश्चिमेकडील धायटी, पाडळोशी, केळोली, विरेवाडी, पाठवडे , दाढोली आदी अनेक गावात सध्या भात लागणीची कामे सुरु आहेत. या विभागातील शेती डोंगर उताराची असल्याने येथील शेतकरी भात लागवड जास्त प्रमाणात करतात. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी भात बियाणांच्या किंमतीत शंभर रुपयाने वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थीक भूर्दंड सहन करावा लागत आहे. विभागात सध्या गंगा कावेरी, इंद्रायणी, भोगावती, तृप्ती आदी भात वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मान्सुनच्या सुरुवातीला पडलेल्या तुरळक पावसावर येथील शेतकऱ्यांनी शेतामध्ये तरवे टाकले होते. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेकऱ्यांची भात लागन धोक्यात आली. सध्या उशिरा का होईना दमदार हजेरी लावल्याने रखडलेल्या भात लागणींच्या कामाला वेग आला आहे. सध्या विभागातील शेतकरी आपल्या बैल जोडीच्या सहाय्याने शेतात चिखल करुन भात लागवड करताना दिसून येत आहेत. विभागात गत काही वषार्पासुन पारंपारीक पध्दतीने भात लागवड न करता कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली लागवड केली जात होेती. परंतु सध्या विभागातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी खात्याचे कर्मचारी पोहचु न शकल्याने शेतकऱ्यांतून तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असुन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाविनाच चालु वर्षी शेतकरी भात लागवड करताना दिसुन येत आहेत.गतवर्षीच्या तुलनेत भात बियाणांच्या किंमतीत सहा किलो मागे तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी गंगाकावेरीच्या सहा किलो पिशविचा दर ७५० रुपए होता. आता हे बियाणे ८५० रुपयाला आहे. तर इंद्रायणी गेल्यावर्षी ६ किलो हजार रूपयाला होते. आता त्यामध्ये वाढ होऊन सहा किलोचा दर १ हजार २०० रुपए झाला आहे. तृप्ती बियाणे २०० रूपयाला होते आता ३०० रुपयाला झाले आहे. तर भोगावती बियाणे ६५० ला होत. ते ८६० रुपयाला विकत घ्यावे लागत आहे. शासनाने जीएसटीची नविन करप्रणाली लागु केल्याने ही दरवाढ झाल्याचे दुकानदार सांगत आहेत.- राजाराम पवार, शेतकरी