शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर उताराला भात लागणी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:19 IST

शेतकरी व्यस्त : बियाणांची किंमत वाढल्याने नाराजी

आॅनलाईन लोकमतचाफळ (जि. सातारा), दि. २२ :चाफळ विभागात गत आठ दिवसापासुन पडत असलेल्या संततधार पावसामुळे खरीपाची पेरणी केलेल्या पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने झाली आहे. विभागात सर्वत्र पडत असलेल्या पावसामुळे डोंगर उतारावरुन येणारे पाणी आडव्या पाटाकडे वळवुन पाडळोशी, केळोलीसह परीसरातील शेतकऱ्यांनी रखडलेल्या भात लागणीस सुरूवात केली आहे.डोंगराळ व दुर्गम विभाग म्हणुन चाफळ विभागाकडे पाहिले जाते. विभागात डेरवण पाझर तलाव व उत्तरमांड धरणाची उभारणी झाली असली तरी आजही बहुतांश शेती कोरडवाहु व पुर्णत: पावसावर अवलंबुन आहे. गत महिनाभरापासुन मान्सुनच्या पावसाने विभागाकडे पाठ फिरवली होती. मात्र, गत आठ दिवसापासुन विभागात पावसाची रिपरिप सुरु झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. विभागाच्या पश्चिमेकडील धायटी, पाडळोशी, केळोली, विरेवाडी, पाठवडे , दाढोली आदी अनेक गावात सध्या भात लागणीची कामे सुरु आहेत. या विभागातील शेती डोंगर उताराची असल्याने येथील शेतकरी भात लागवड जास्त प्रमाणात करतात. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी भात बियाणांच्या किंमतीत शंभर रुपयाने वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थीक भूर्दंड सहन करावा लागत आहे. विभागात सध्या गंगा कावेरी, इंद्रायणी, भोगावती, तृप्ती आदी भात वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मान्सुनच्या सुरुवातीला पडलेल्या तुरळक पावसावर येथील शेतकऱ्यांनी शेतामध्ये तरवे टाकले होते. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेकऱ्यांची भात लागन धोक्यात आली. सध्या उशिरा का होईना दमदार हजेरी लावल्याने रखडलेल्या भात लागणींच्या कामाला वेग आला आहे. सध्या विभागातील शेतकरी आपल्या बैल जोडीच्या सहाय्याने शेतात चिखल करुन भात लागवड करताना दिसून येत आहेत. विभागात गत काही वषार्पासुन पारंपारीक पध्दतीने भात लागवड न करता कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली लागवड केली जात होेती. परंतु सध्या विभागातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी खात्याचे कर्मचारी पोहचु न शकल्याने शेतकऱ्यांतून तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असुन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाविनाच चालु वर्षी शेतकरी भात लागवड करताना दिसुन येत आहेत.गतवर्षीच्या तुलनेत भात बियाणांच्या किंमतीत सहा किलो मागे तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी गंगाकावेरीच्या सहा किलो पिशविचा दर ७५० रुपए होता. आता हे बियाणे ८५० रुपयाला आहे. तर इंद्रायणी गेल्यावर्षी ६ किलो हजार रूपयाला होते. आता त्यामध्ये वाढ होऊन सहा किलोचा दर १ हजार २०० रुपए झाला आहे. तृप्ती बियाणे २०० रूपयाला होते आता ३०० रुपयाला झाले आहे. तर भोगावती बियाणे ६५० ला होत. ते ८६० रुपयाला विकत घ्यावे लागत आहे. शासनाने जीएसटीची नविन करप्रणाली लागु केल्याने ही दरवाढ झाल्याचे दुकानदार सांगत आहेत.- राजाराम पवार, शेतकरी