शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

बहुलेत ग्रामस्थांनी बांधले तब्बल ४१ बंधारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST

मल्हारपेठ : चार वर्षांपूर्वी पाणलोट क्षेत्र विकासासाठी बहुले (ता. पाटण) गावात ४१ बंधारे बांधून पाणी अडविल्याने आजमितीला शिवारात सर्व ...

मल्हारपेठ : चार वर्षांपूर्वी पाणलोट क्षेत्र विकासासाठी बहुले (ता. पाटण) गावात ४१ बंधारे बांधून पाणी अडविल्याने आजमितीला शिवारात सर्व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी बहुले येथील शेतकरी राजू पाटील यांच्या धाडसी निर्णयामुळे शिवारातील ओढ्याचे पाणी वाया न घालवता बंधारे अडवून पाणीसाठा केला. बहुले गावच्या शिवारासह शेजारील गावांनाही याचा लाभ झाल्याने चौथ्या वर्षी बारमाही पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांतन समाधान व्यक्त होत आहे. बहुले गावातील शेतकरी राजू पाटील हे आपल्या नऊ एकर शेतीला बारमाही पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ऐन उन्हाळ्यात त्यांना टंचाईस सामोरे जावे लागत होते. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी शेतकरी भरत पानस्कर, अंकुश पानस्कर, राजन पवार, शंकर पवार, दाजी पवार, पांडुरंग डवरी, मानसिंग पानस्कर, भिमराव जरे, भरत पवार यांना एकत्र करून शिवारात वाया जाणारे पाणी ठिकठिकाणी बंधारे बांधून अडविले. पाण्याचा साठा केला. ग्रामस्थांसमवेत लोकसहभागातून मातीचे ४१ बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम त्यांनी आखली. त्याद्वारे बहुले शिवारात ऐतिहासिक चळवळ उभी राहिली. ही चळवळ सध्या चार वर्षे पूर्ण करीत आहे.

शिवारातील पन्नास एकर शेती विहिरींच्या पाण्यावर अवलंबून असल्याने येथे विहिरींची संख्या जास्त आहे. अलीकडील काळात विहिरींची पाणी पातळी खाली जात असून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी टंचाई भासू लागली होती. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत होती. बंधारे बांधल्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचून उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेचे महत्त्व ग्रामस्थांना पटले असल्याने त्यांनी आपला सहभाग नोंदविला. त्यामळे सुमारे तीनशे एकर शेती क्षेत्र ओलिताखाली आली आहे.

- चौकट

इतर गावांनाही झाला लाभ

बहुले गावात बंधारे बांधण्यात आल्याने त्याचा लाभ विभागातील अन्य गावांनाही झाला आहे. शिवारातील गारवडे, पाळेकरवाडी येथील विहिरींना उन्हाळ्यातही पावसाळ्याप्रमाणे पाणी आहे. सध्या बहुले परिसरात बंधाऱ्यात पाणी अडविल्याने सर्व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. हे पाहण्यासाठी अन्य गावांतील शेतकरी व शासकीय अधिकारी भेटी देत आहेत. राजू पाटील यांनी इतर गावांसाठी आदर्श समोर ठेवला आहे.

फोटो : २२केआरडी०३

कॅप्शन : बहुले, ता. पाटण गावात ऐन उन्हाळ्यात बंधारे भरलेले आहेत. त्यामुळे परिसरातील विहिरींमध्येही मुबलक पाणीसाठा आहे. (छाया : सुनील साळुंखे)