शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

बहुतांश शाळांनी पूर्ण केला गुणदानाचा टप्पा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

सातारा : शाळांनी दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची मुदत संपत आली असतानाच जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी गुणदानाचा टप्पा ...

सातारा : शाळांनी दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची मुदत संपत आली असतानाच जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी गुणदानाचा टप्पा पूर्ण केला आहे. कोविडचे निर्बंध लक्षात घेता काही शाळा मात्र मुदतवाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल वेळेत लावण्यासाठी सोपवण्यात आलेल्या कामकाजासाठी राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे थोडाच कालावधी उरला आहे. या उरलेल्या दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुण, त्यासाठी मंडळाकडून आलेले संपूर्ण नियोजन पूर्ण करायचे आहे. तर त्यासाठी शिक्षकांनी त्यांना दिलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज सुरू ठेवले आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागला आहे.

विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली असून, आपले निकाल कधी येतात, अभ्यासू व हुशार विद्यार्थ्यांना किती गुण मिळतील, याचीदेखील उत्सुकता आहे. दहावीची परीक्षा झाली नाही. मात्र, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी संपूर्ण तयारी केली व कोरोना काळातही परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी ठेवली होती. यात परीक्षा कधी होणार याचे वेळापत्रकही जाहीर होत नव्हते व परीक्षा होणार की नाही, हेदेखील स्पष्ट होत नव्हते. अखेर परीक्षा होणार नसल्याचे जाहीर झाले व विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी प्रत्येकाचे गुण सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याचप्रमाणे बारावीच्या निकालाचाही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.

.....

पॉर्इंटर

दहावी विद्यार्थ्यांची संख्या :

निकाल पूर्ण करण्यासाठी सुरूय लगबग

१. त्यांच्या स्तरावर गुणांचे विभाजन करून सूत्रांमध्ये बसवण्यिाचे काम सुरू आहे. मात्र, मनुष्यबळाचा अभाव, याच काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणे या सर्वात जास्त वेळ जात आहे. त्यामुळे निकालाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे.

२. राज्यातील बहुतांश शाळांनी गुणदानासह इतर प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे निकालाच्या कामासाठी मुदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

३. यंदाचा निकाल कसा असेल, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच निकालाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण न केल्यास त्यास शाळा जबाबदार असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोट :

गुणदानाबाबत शिक्षकांच्या अडचणी

सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर आणि पाटण येथील बहुतांश भागात इंटरनेट कनेक्शन मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे येथील निकाल तयार करण्यापेक्षा तो अपलोड करणं अधिक जाचक ठरलं.

-

कोविडमुळे काही पालक गावाकडे स्थलांतरित झाले. दहावीत स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांचे नववीतील गुणपत्रक पूर्वीच्या शाळेतून प्राप्त करण्यासाठी पालकांना विलंब लागला. परिणामी शाळांना या विद्यार्थ्यांसाठीही त्यांचा निकाल बोर्डाकडे जमा करता आला नाही.

कोट..

जिल्ह्यातील बहुतांश शाळांची गुणदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याची माहिती काही शाळांनी अपलोडही केली आहे. उर्वरित शाळांचे काम वेगाने सुरू व्हावे, याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. शाळांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार कार्यवाही करणे सुरू आहे.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी