शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

बहुतांश शाळांनी पूर्ण केला गुणदानाचा टप्पा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

सातारा : शाळांनी दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची मुदत संपत आली असतानाच जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी गुणदानाचा टप्पा ...

सातारा : शाळांनी दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची मुदत संपत आली असतानाच जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी गुणदानाचा टप्पा पूर्ण केला आहे. कोविडचे निर्बंध लक्षात घेता काही शाळा मात्र मुदतवाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल वेळेत लावण्यासाठी सोपवण्यात आलेल्या कामकाजासाठी राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे थोडाच कालावधी उरला आहे. या उरलेल्या दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुण, त्यासाठी मंडळाकडून आलेले संपूर्ण नियोजन पूर्ण करायचे आहे. तर त्यासाठी शिक्षकांनी त्यांना दिलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज सुरू ठेवले आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागला आहे.

विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली असून, आपले निकाल कधी येतात, अभ्यासू व हुशार विद्यार्थ्यांना किती गुण मिळतील, याचीदेखील उत्सुकता आहे. दहावीची परीक्षा झाली नाही. मात्र, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी संपूर्ण तयारी केली व कोरोना काळातही परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी ठेवली होती. यात परीक्षा कधी होणार याचे वेळापत्रकही जाहीर होत नव्हते व परीक्षा होणार की नाही, हेदेखील स्पष्ट होत नव्हते. अखेर परीक्षा होणार नसल्याचे जाहीर झाले व विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी प्रत्येकाचे गुण सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याचप्रमाणे बारावीच्या निकालाचाही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.

.....

पॉर्इंटर

दहावी विद्यार्थ्यांची संख्या :

निकाल पूर्ण करण्यासाठी सुरूय लगबग

१. त्यांच्या स्तरावर गुणांचे विभाजन करून सूत्रांमध्ये बसवण्यिाचे काम सुरू आहे. मात्र, मनुष्यबळाचा अभाव, याच काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणे या सर्वात जास्त वेळ जात आहे. त्यामुळे निकालाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे.

२. राज्यातील बहुतांश शाळांनी गुणदानासह इतर प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे निकालाच्या कामासाठी मुदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

३. यंदाचा निकाल कसा असेल, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच निकालाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण न केल्यास त्यास शाळा जबाबदार असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोट :

गुणदानाबाबत शिक्षकांच्या अडचणी

सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर आणि पाटण येथील बहुतांश भागात इंटरनेट कनेक्शन मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे येथील निकाल तयार करण्यापेक्षा तो अपलोड करणं अधिक जाचक ठरलं.

-

कोविडमुळे काही पालक गावाकडे स्थलांतरित झाले. दहावीत स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांचे नववीतील गुणपत्रक पूर्वीच्या शाळेतून प्राप्त करण्यासाठी पालकांना विलंब लागला. परिणामी शाळांना या विद्यार्थ्यांसाठीही त्यांचा निकाल बोर्डाकडे जमा करता आला नाही.

कोट..

जिल्ह्यातील बहुतांश शाळांची गुणदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याची माहिती काही शाळांनी अपलोडही केली आहे. उर्वरित शाळांचे काम वेगाने सुरू व्हावे, याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. शाळांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार कार्यवाही करणे सुरू आहे.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी