शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

बहुतांश शाळांनी पूर्ण केला गुणदानाचा टप्पा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

सातारा : शाळांनी दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची मुदत संपत आली असतानाच जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी गुणदानाचा टप्पा ...

सातारा : शाळांनी दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची मुदत संपत आली असतानाच जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी गुणदानाचा टप्पा पूर्ण केला आहे. कोविडचे निर्बंध लक्षात घेता काही शाळा मात्र मुदतवाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल वेळेत लावण्यासाठी सोपवण्यात आलेल्या कामकाजासाठी राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे थोडाच कालावधी उरला आहे. या उरलेल्या दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुण, त्यासाठी मंडळाकडून आलेले संपूर्ण नियोजन पूर्ण करायचे आहे. तर त्यासाठी शिक्षकांनी त्यांना दिलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज सुरू ठेवले आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागला आहे.

विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली असून, आपले निकाल कधी येतात, अभ्यासू व हुशार विद्यार्थ्यांना किती गुण मिळतील, याचीदेखील उत्सुकता आहे. दहावीची परीक्षा झाली नाही. मात्र, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी संपूर्ण तयारी केली व कोरोना काळातही परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी ठेवली होती. यात परीक्षा कधी होणार याचे वेळापत्रकही जाहीर होत नव्हते व परीक्षा होणार की नाही, हेदेखील स्पष्ट होत नव्हते. अखेर परीक्षा होणार नसल्याचे जाहीर झाले व विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी प्रत्येकाचे गुण सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याचप्रमाणे बारावीच्या निकालाचाही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.

.....

पॉर्इंटर

दहावी विद्यार्थ्यांची संख्या :

निकाल पूर्ण करण्यासाठी सुरूय लगबग

१. त्यांच्या स्तरावर गुणांचे विभाजन करून सूत्रांमध्ये बसवण्यिाचे काम सुरू आहे. मात्र, मनुष्यबळाचा अभाव, याच काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणे या सर्वात जास्त वेळ जात आहे. त्यामुळे निकालाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे.

२. राज्यातील बहुतांश शाळांनी गुणदानासह इतर प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे निकालाच्या कामासाठी मुदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

३. यंदाचा निकाल कसा असेल, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच निकालाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण न केल्यास त्यास शाळा जबाबदार असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोट :

गुणदानाबाबत शिक्षकांच्या अडचणी

सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर आणि पाटण येथील बहुतांश भागात इंटरनेट कनेक्शन मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे येथील निकाल तयार करण्यापेक्षा तो अपलोड करणं अधिक जाचक ठरलं.

-

कोविडमुळे काही पालक गावाकडे स्थलांतरित झाले. दहावीत स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांचे नववीतील गुणपत्रक पूर्वीच्या शाळेतून प्राप्त करण्यासाठी पालकांना विलंब लागला. परिणामी शाळांना या विद्यार्थ्यांसाठीही त्यांचा निकाल बोर्डाकडे जमा करता आला नाही.

कोट..

जिल्ह्यातील बहुतांश शाळांची गुणदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याची माहिती काही शाळांनी अपलोडही केली आहे. उर्वरित शाळांचे काम वेगाने सुरू व्हावे, याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. शाळांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार कार्यवाही करणे सुरू आहे.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी