शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

पिण्याच्या पाण्यासाठी मोजावे लागतायत पैसे

By admin | Updated: April 20, 2017 22:39 IST

विद्यानगरी बनली टंचाईनगरी : कृष्णा नदीकाठावरील स्थिती; पाणी पातळी खालावल्याने नागरिक त्रस्त

विद्यानगर : उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. कधी ३८ तर कधी ४० अंशांपर्यंत तापमान वाढत असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. अशात विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यानगरीत सध्या पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजण्याची वेळ आली आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या प्रलंबित कामामुळे विद्यानगरी सध्या पाणीटंचाई नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.शहरालगतची आणि कृष्णा काठावरील झपाट्याने विकसित होणारी नागरीवस्ती म्हणून विद्यानगरीचा लौकीक आहे. यावर्षी कडक उन्हाळ्यामुळे या परिसरातील कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. तर पाण्याचीही कमतरता भासू लागली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील अपार्टमेंटला पाणीपुरवठा कमी प्रमाणात होऊ लागला आहे. परिणामी जादा पैसे देऊन येथील नागरिकांना टँकरने पाणी आणावे लागत आहे.शांत व रम्य परिसर तसेच सर्व शैक्षणिक सुविधा जवळ असल्याने विद्यानगरचे झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. दीडशेपेक्षा जास्त अपार्टमेंट या ठिकाणी सध्या असून, पाच वसतिगृहांची संख्या आहे. त्यामुळे लोकसंख्येबरोबरच दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या जास्त आहे. या सर्वांचा ताण ग्रामपंचायतीवर पडत आहे. ग्रामपंचायत आपल्यापरिने पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करीत आहे. पण या भागातील रोजची वाढती लोकसंख्या व वाढते पाणी वापराचे प्रमाण यामुळे पाणी कमी पडत आहे.अनेक अपार्टमेंट व इमारतींमध्ये पाणी पुनर्भरणाची कोणतीच सोय नसल्याने तसेच पाणी साठवण्याबाबत उपाययोजना उभारण्यात आल्या नसल्यामुळे पाणी शिल्लक राहत नाही. या कारणामुळे या ठिकाणी नेहमीच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होते. सध्या एप्रिल महिना असल्याने मे व जून महिन्यांच्या पाणीटंचाईच्या झळा या एप्रिल महिन्यातच शहरवासीयांना सोसाव्या लागत आहेत.या ठिकाणी असलेल्या वसतिगृह आणि अनेक अपार्टमेंटच्या इमारतीवरही विद्यार्थी राहतात. एका खोलीत पाच ते सहा विद्यार्थी भाडेतत्त्वावर राहत असल्याने एका खोलीसाठी २५० लिटर पाणी वापरले जाते. ३० ते ४० कुटुंबे वास्तव्यास असणारी अनेक अपार्टमेंटस् येथे मोठ्या संख्येने असल्याने पाण्याची प्रचंड मागणी असते. सैदापूर ग्रामपंचायतीची चोवीस तास पाणी योजनाही अजून पूर्ण झालेली नाही. त्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यातच यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यांतच उन्हाळा प्रचंड वाढला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत जाऊन दिवसेंदिवस कोरड्या पडणाऱ्याकूपनलिकांची संख्या वाढत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरवरच अनेक अपार्टमेंट अवलंबून आहे. त्यासाठी त्यांना मोठी आर्थिक झळही सोसावी लागत आहे. कृष्णा काठावर वसलेली विद्यानगरी काही वर्षांपूर्वी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होती. मात्र, झपाट्याने नागरीकरण वाढत असल्याने येथील संसाधनावर प्रचंड मोठा ताण येत आहे. परिणामी, एकेकाळी पाण्यासाठी स्वयंपूर्ण असणारी ही नगरी आज टँकरवर विसंबली आहे. टँकरची मागणी वाढत असल्याने दरही आता तेजी धरू लागले आहेत. कृष्णा काठच्या विद्यानगरीत अनेक अपार्टमेंट पाणी विकत घेऊ लागलेत. यावरून ऐन उन्हाळ्यात नदीकाठच्या विद्यानगरवासीयांचा घसा कोरडा पडू लागला आहे, हेच वास्तव आहे. (वार्ताहर)