शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण ढासळल्याने मोदींनी अर्थव्यवस्थेची सूत्रे हाती घेतलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 20:44 IST

देशाचं अंदाजपत्रक मांडताना अर्थमंत्री विविध घटकांशी चर्चा करतात. ही देशातील परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बैठका घेतल्या. आतापर्यंत १३ बैठका झाल्या असाव्यात. एका बैठकीला अर्थमंत्रीच नव्हत्या. याचा अर्थ दोघांचाही अर्थमंत्र्यावर विश्वास नव्हता का?. हा ऐका महिलेचा अपमान आहे, असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.

ठळक मुद्दे:- पृथ्वीराज चव्हाणांनी डागली तोफ

सातारा : ‘देशाची आर्थिक स्थिती ढासळलीय. पंतप्रधानांनी विकासाचे आकडे फुगवलेत. अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण ढासळल्याने मोदींनी अर्थमंत्र्यांना बाजूला सारून सारी सूत्रे हाती घेतलीत. अर्थव्यवस्थेचं खापर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर फोडायचा प्रयत्न आहे. गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक बेरोजगारी निर्माण करणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही,’ अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तोफ डागली.

सातारा येथे काँग्रेस कमिटीमध्ये पक्षाच्या तालुकानिहाय बैठका घेण्यासाठी चव्हाण आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘राज्यात मागील पाच वर्षांत भाजप आणि मुख्यमंत्री असणाºया फडणवीस यांनी आपल्या पदाचा वापर करून बेरोजगारी वाढविली. तसेच त्यांच्याच काळात राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली. औद्योगिकमध्ये एक नंबरवर असणारे राज्य मागे पडले. सतत घोषणाबाजीत असणाºयांमुळे राज्यात एकही मोठा पायाभूत प्रकल्प आलेला नाही. असे हे सरकार येऊ नये, असे वाटत होते. त्यामुळेच आम्ही तीन पक्ष एकत्र आलो. कारण, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी सत्ता आणि पैशाचा गैरवापर केला.

केंद्र शासनाने नागरिकत्वाचा कायदा आणला आहे. मोदींनी बदल करून देशाच्या संविधानावरच हल्ला केलाय. महिला, मुले, शेतकरी, अल्पसंख्यांक रस्त्यावर उतरलेत, असे सांगून चव्हाण म्हणाले, ‘देशात विस्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तर भारताची लोकशाही धोक्यात आली आहे,’ असं वाटू लागलंय. केंद्राने हा कायदा मागे घ्यावा. नाहीतर आताचे वातावरण आणखी पेटत जाईल.’

देशाचं अंदाजपत्रक मांडताना अर्थमंत्री विविध घटकांशी चर्चा करतात. ही देशातील परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बैठका घेतल्या. आतापर्यंत १३ बैठका झाल्या असाव्यात. एका बैठकीला अर्थमंत्रीच नव्हत्या. याचा अर्थ दोघांचाही अर्थमंत्र्यावर विश्वास नव्हता का?. हा ऐका महिलेचा अपमान आहे, असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. 

  • नवीन पदाधिकारी नेमणार; पत्रकारांना बाहेर काढणं योग्य नव्हतं...

पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विविध प्रश्न केले. यावेळी त्यांनी जिल्'ात नवीन पदाधिकारी नेमणार आहे. त्यासाठीच ही आढावा बैठक घेतली, असे सांगितले. तसेच साताºयात महाविकास आघाडीचा प्रयोग होणार का? या प्रश्नावर त्यांनी ‘प्रयत्न सुरू आहेत,’ असे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील काहीजण भाजपात गेलेत. ते संपर्कात आहेत का? असा प्रश्न केल्यावर, ‘संपर्कात कोणी नाही. वाई, फलटण, क-हाडवाल्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. पण वाईट वाटून घेऊन काय करणार? वास्तव आहे, ते स्वीकारावं लागतं,’ असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

  • जिल्हा नियोजन समिती बैठकीला पालकमंत्र्यांनी पत्रकारांना मज्जाव केल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर चव्हाण यांनी ‘हे योग्य नाही. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. असे झाले तर शासकीय पे्रसनोटवर तुम्हाला अवलंबून राहावं लागेल. तुमचं विश्लेषण येणार नाही,’ असं सांगत एकप्रकारे पत्रकारांची बाजूच त्यांनी घेतली.

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणGovernmentसरकार