शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

राजपथावर कसरतींचे ‘मिशन 38’!

By admin | Updated: March 26, 2015 00:05 IST

सातारकरांचे मणके ढिले : नगरपालिकेला मिळेना डांबरीकरणास मुहूर्त; वाहनचालकांच्या मागे खड्ड्यांचे शुक्लकाष्ट

सातारा : शहराचा मुख्य रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजपथावर पाईपलाईनसाठी तब्बल ३८ चरी खोदण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून या चरी केवळ थातूरमातूर भरून पालिका प्रशासनाने याकडे पाठ फिरविलीय. त्यामुळे अक्षरश: मणके घाईला येत आहेत. शहराची मुख्य ओळख असणाऱ्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पालिकेला या रस्त्याच्या डांबरीकरणास मुहूर्त केव्हा मिळणार आणि खड्ड्यांचे शुक्लकाष्ट कधी हटणार याकडे सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत. महिनाभरापूर्वी पोवई नाक्यापासून शाहू चौकापर्यंत डांबरीकरण करण्यात आले. परंतु तिथून पुढे राजवाड्यापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ठिकठिकाणी राजपथावर तब्बल ३८ चरी खोदण्यात आल्या. पाईपलाईनचे काम संपल्यानंतर या चरी माती व दगडाने भरण्यात आल्या; परंतु काही चरी अद्यापही भरण्यात आल्या नाहीत. पाच-पाच फुटांवर असलेल्या या चरींमुळे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. काहीना मणक्याचे विकारही जडले आहेत. काहीजण राजपथावरून न जाता पर्यायी रस्त्याने पोवई नाक्याकडे जातात. वाहनचालक अचानक ब्रेक लावत असल्यामुळे वाहने एकमेकांवर आदळत असल्याचे प्रकारही घडत आहेत. एवढेच नव्हे तर वाहनांचा मेन्टेन्स खर्चही वाढला आहे. या ना त्या कामानिमित्त नागरिकांना नेहमी घराबाहेर पडावे लागते. राजवाडा ही मुख्य बाजार पेठ असल्यामुळे राजपथावर विशेषत: नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. पाचशे मीटरचे अंतरही पार करणे वाहनचालकांना आता नकोशे झाले आहे. राजपथाचे काम नेमके कोणत्या कारणामुळे खोळंबले आहे, याचा थांगपत्ता नागरिकांना लागेनासा झाला आहे. प्राधिकरणने पाईपलाईनची कामे करण्यास वेळ लावल्यामुळे रस्त्यांची अवस्था अशी झाली, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे, तर आम्ही शहरात सध्या रस्तेच खोदले नसल्याचे जीवन प्राधिकरणाचे म्हणणे आहे.जीवन प्राधिकरण आणि पालिका प्रशासन एकमेकांवर आरोप करण्यातच मग्न आहेत. परंतु राजपथचा प्रश्न वेगळा आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी म्हणे, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीची आवश्यकता आहे. गेल्या महिनाभरापासून पालिका प्रशासन अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे अजून किती दिवस सातारकरांना राजपथावरून कोकर उड्या घेत जावे लागणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) तेराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राजपथ रस्त्याचे काम सुरू करायचे आहे. याला प्रशासकीय मान्यता लागते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील आठवड्यात या रस्त्याचे काम सुरू होईल. -दिलीप चिद्रे, नगर अभियंता, सातारा पालिका पालिकेतील बहुमताच्या सत्तेमुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे सत्ताधारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का? असा आरोप शहरातील नागरिक जाहीरपणे विचारू लागले आहेत. ‘आम्ही कर भरतो, आम्हाला सुविधा द्या,’ असा टाहोही नागरिकांनी फोडला आहे.