शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

मायणीत दुष्काळात तेरावा..!

By admin | Updated: May 27, 2014 01:23 IST

जलवाहिनीला गळती : हजारो लिटर पाणी वाया

 मायणी : येथील मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. टंचाई काळातच अगोदर येथील नागरिक पाणी-पाणी करीत आहेत. त्यातच या गळतीमुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आलेली आहे. यामुळे नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट आले आहे. ही गळती लवकर काढण्याची मागणी होत आहे. येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. असे असूनही येथील नागरिकांना १० ते १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. अनेकांनी राजकीय, सामाजिक व व्यक्तिगत ताकद वापरुन व कर्मचार्‍यांना हाताशी धरून परस्पर मुख्य जलवाहिनीतून कनेक्शन घेतली असल्याचा आरोप सामान्य नागरिकांतून होत आहे. त्यामुळे टंचाईच्या काळातही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोक पाण्यात डुंबत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत असल्याची परिस्थिती आहे. खासगी मालकीच्या विंधन विहिरींचा आश्रय घ्यावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न सोडविण्याचा गेली अनेकवर्षे प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही सर्वांना समान पाणी वाटप होताना दिसून येत नाही. गावाच्या आसपास नव्याने वसलेली उपनगरे, वाड्या-वस्त्यांनाही पाणी नाही अशी स्थिती आहे. त्यासाठी प्रत्येकवर्षी टँकरची माणगी करावी लागते. यंदाही उपनगरांसाठी ग्र्रामपंचायतीने टँकरची मागणी केली आहे. मात्र, तालुका प्रशासनाने अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. परिणामी दिवसेंदिवस पाणीटंचाईने लोक हैराण होऊ लागले आहेत. मायणीत तीव्र पाणीटंचाई असतानाच गावातील मुख्य रस्त्याने गेलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागलेली आहे. कर्मचार्‍यांना पाण्याचे महत्व वाटत नसल्याने गळती काढण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. सध्या या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत आहे. लोकांना प्यायला पाणी नाही अन् रस्त्याने पाणी वाहत असल्याचे पाहून लोकांतून तीव्र प्रतिक्रीय उमटत आहेत. (वार्ताहर)