शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मायणीत दुष्काळात तेरावा..!

By admin | Updated: May 27, 2014 01:23 IST

जलवाहिनीला गळती : हजारो लिटर पाणी वाया

 मायणी : येथील मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. टंचाई काळातच अगोदर येथील नागरिक पाणी-पाणी करीत आहेत. त्यातच या गळतीमुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आलेली आहे. यामुळे नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट आले आहे. ही गळती लवकर काढण्याची मागणी होत आहे. येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. असे असूनही येथील नागरिकांना १० ते १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. अनेकांनी राजकीय, सामाजिक व व्यक्तिगत ताकद वापरुन व कर्मचार्‍यांना हाताशी धरून परस्पर मुख्य जलवाहिनीतून कनेक्शन घेतली असल्याचा आरोप सामान्य नागरिकांतून होत आहे. त्यामुळे टंचाईच्या काळातही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोक पाण्यात डुंबत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत असल्याची परिस्थिती आहे. खासगी मालकीच्या विंधन विहिरींचा आश्रय घ्यावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न सोडविण्याचा गेली अनेकवर्षे प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही सर्वांना समान पाणी वाटप होताना दिसून येत नाही. गावाच्या आसपास नव्याने वसलेली उपनगरे, वाड्या-वस्त्यांनाही पाणी नाही अशी स्थिती आहे. त्यासाठी प्रत्येकवर्षी टँकरची माणगी करावी लागते. यंदाही उपनगरांसाठी ग्र्रामपंचायतीने टँकरची मागणी केली आहे. मात्र, तालुका प्रशासनाने अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. परिणामी दिवसेंदिवस पाणीटंचाईने लोक हैराण होऊ लागले आहेत. मायणीत तीव्र पाणीटंचाई असतानाच गावातील मुख्य रस्त्याने गेलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागलेली आहे. कर्मचार्‍यांना पाण्याचे महत्व वाटत नसल्याने गळती काढण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. सध्या या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत आहे. लोकांना प्यायला पाणी नाही अन् रस्त्याने पाणी वाहत असल्याचे पाहून लोकांतून तीव्र प्रतिक्रीय उमटत आहेत. (वार्ताहर)