शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मायणीत दुष्काळात तेरावा..!

By admin | Updated: May 27, 2014 01:23 IST

जलवाहिनीला गळती : हजारो लिटर पाणी वाया

 मायणी : येथील मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. टंचाई काळातच अगोदर येथील नागरिक पाणी-पाणी करीत आहेत. त्यातच या गळतीमुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आलेली आहे. यामुळे नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट आले आहे. ही गळती लवकर काढण्याची मागणी होत आहे. येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. असे असूनही येथील नागरिकांना १० ते १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. अनेकांनी राजकीय, सामाजिक व व्यक्तिगत ताकद वापरुन व कर्मचार्‍यांना हाताशी धरून परस्पर मुख्य जलवाहिनीतून कनेक्शन घेतली असल्याचा आरोप सामान्य नागरिकांतून होत आहे. त्यामुळे टंचाईच्या काळातही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोक पाण्यात डुंबत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत असल्याची परिस्थिती आहे. खासगी मालकीच्या विंधन विहिरींचा आश्रय घ्यावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न सोडविण्याचा गेली अनेकवर्षे प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही सर्वांना समान पाणी वाटप होताना दिसून येत नाही. गावाच्या आसपास नव्याने वसलेली उपनगरे, वाड्या-वस्त्यांनाही पाणी नाही अशी स्थिती आहे. त्यासाठी प्रत्येकवर्षी टँकरची माणगी करावी लागते. यंदाही उपनगरांसाठी ग्र्रामपंचायतीने टँकरची मागणी केली आहे. मात्र, तालुका प्रशासनाने अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. परिणामी दिवसेंदिवस पाणीटंचाईने लोक हैराण होऊ लागले आहेत. मायणीत तीव्र पाणीटंचाई असतानाच गावातील मुख्य रस्त्याने गेलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागलेली आहे. कर्मचार्‍यांना पाण्याचे महत्व वाटत नसल्याने गळती काढण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. सध्या या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत आहे. लोकांना प्यायला पाणी नाही अन् रस्त्याने पाणी वाहत असल्याचे पाहून लोकांतून तीव्र प्रतिक्रीय उमटत आहेत. (वार्ताहर)