शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मनधरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

कोरोनाचे महाभयंकर संकट एका बाजूला घोंगावत असतानाच कृष्णा कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी ३०० वर ...

कोरोनाचे महाभयंकर संकट एका बाजूला घोंगावत असतानाच कृष्णा कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी ३०० वर इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, छाननीचे सोपस्कार पार पडल्यानंतर व दुबार अर्ज बाजूला केल्यानंतर २१३ अर्ज उरले आहेत. वास्तविक २ तारखेपासून अर्ज माघार घ्यायला उमेदवारांना परवानगी होती. पण गत १२ दिवसात फक्त १७ जणांनी अर्ज मागे घेतलेले दिसतात. कारखान्याचे २१ संचालक निवडले जाणार आहेत. तिरंगी लढत गृहीत धरली तरी ६३ उमेदवार अपेक्षित आहेत. पण आजअखेर १९६ जणांचे अर्ज तसेच दिसतात. याचा अर्थ असाही माघारीसाठी अजूनही म्हणावी तशी गती नाही.

डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलमधून यावेळीही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. सत्ताधारी म्हणून ते साहजिकही आहे .... विरोधी असणाऱ्या डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत व अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलमधूनही इच्छुक कमी नाहीत बरं .... सध्या अनेक ‘हौसे नवसे’ ही या निवडणुकीत दिसतात. त्यांना ही निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे सुरुवातीला अर्ज दाखल करताना ‘तुम्ही म्हणाल तसं’ असं म्हणणारेच आज आढेवेढे घेताना दिसत आहेत. त्यामुळे या इच्छुकांची मनधरणी करणं नेत्यांना क्रमप्राप्त झालं आहे.

कारखान्याच्या निवडणुकीत आज तिरंगी लढत गृहीत धरली जातेय. प्रचाराला भलताच जोर चढलाय; तिन्ही पॅनल प्रमुख विजय आपलाच आहे. असा दावा करत आहेत. अशावेळी आपलेच पॅनल विजयी होणार आहे तर मग माघार कशासाठी घ्यायची? अशा भावना इच्छुकांच्यात तयार होत आहेत. अशावेळी या इच्छुकांची मनधरणी करताना नेते त्यांना स्वीकृत संचालक पदाचे ‘गाजर’ दाखवताना दिसत आहेत. पण अनेकांना ‘गाजर हलवा’ ही गोष्ट चांगली माहीत आहे. त्यामुळे हे गाजर त्यांच्या पचनी पडताना दिसत नाही. शिवाय स्वीकृत संचालक पदे फक्त दोनच आहेत. पण त्याचा शब्द किती जणांना दिला आहे याबद्दल इच्छुकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे तर कृष्णा उद्योग समूह आहे. त्यामुळे मनधरणी करताना उद्योग समूहातील इतर दुसऱ्या संस्थेत काम करण्याची संधी देतो असे ही शब्द आता दिले जात आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येते हे तीन दिवसांनंतर स्पष्ट होईलच.

वास्तविक १७ जून ही अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात उमेदवारी व पॅनल निश्चितीच्या दृष्टीने बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. सध्या तरी अनेक इच्छुक ‘राजकारणात थांबला तो संपला’ या मतावर ठाम आहेत. तर नेते त्यांना ‘लांब उडी मारायची असेल तर दोन पावले मागे घ्यावी लागतात’ असा सल्ला देत आहेत. येणारे तीन दिवस कृष्णा निवडणुकीसाठी महत्त्वाचे आहेत. या तीन दिवसात मनधरणी करण्यात कोण प्रभावी ठरतेय हे महत्त्वाचे आहे. आता इच्छुकांना गोळी, इंजेक्शन, सलाईन यातील कशाचा गुण येतोय ते कळलेही. पण काहींची शस्त्रक्रियाही केली जाईल. पण वेदना होणार नाही याची काळजी घेऊन.

प्रमोद सुकरे, कराड