शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मनोमिलन अन् आघाडीसुध्दा !

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

सोयीचे राजकारण : नेत्यांचेही कानावर हात; म्हणे... तुमचं तुम्ही बघा !

प्रमोद सुकरे - कऱ्हाड तालुक्याचं राजकारण प्रत्येक निवडणुकीत बदलताना पाहायला मिळते. सत्तेसाठी नेत्यांची वेगळी समीकरणं पाहायला मिळतात. त्याला मनोमिलन, मैत्रिपर्व अशी गोंडस नावंही दिली जातात; पण यातून कार्यकर्त्यांनीही आता बरेच शहाणपण घेतले आहे. त्याचेच प्रत्यंतर आता गावोगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत येत असून, ग्रामस्थांनी काही ठिकाणी नव्याने मनोमिलन केलेलं दिसतंय तर काही ठिकाणी मैत्रिपर्व जपल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही गावांत मतभेद बाजूला ठेवून आघाडीही झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायती ! ही पहिली पायरी आपणच यशस्वीपणे पार पाडावी यासाठी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आता अर्ज माघारीची मुदत संपल्याने उमेदवारांसह स्थानिक नेत्यांनी जोर बैठकांची गती वाढविली आहे. ४ आॅगस्टला ते एकमेकांना प्रत्यक्ष भिडणार आहेत. पण, गावच्या आखाड्यातील ही कुस्ती जिंकण्यासाठी सोयीचे राजकारण करत गावागावांत नवे मैत्रिपर्व, मनोमिलन पाहायला मिळाले आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतोच मुळी ! कऱ्हाड तालुक्यात तर प्रत्येक निवडणुकीला राजकारणाच वेगळे चित्र पाहायला मिळू लागले आहे. त्याला ग्रामपंचायत निवडणूकाही अपवाद नाहीत. राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे मोहिते अन् भोसले गट सात वर्षांपूर्वी एकत्र आले. त्याला ‘मनोमिलन’ असं नाव देण्यात आलं. त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विलासराव पाटील-उंडाळकरांच्या विरोधात सर्वजण एकत्रित आले. त्याला ‘महाआघाडी’ असे संबोधले गेले. तर विधानसभा निवडणुकीतील घडामोडींनंतर विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले गट पुन्हा एकत्र आले. त्याला ‘मैत्रिपर्व’ म्हटलं गेलं. या साऱ्या घडामोडींमुळे गावागावांत दोन नव्हे तर तीन, चार, पाच असे गट तयार झाले आहेत. पण, प्रत्येक निवडणुकीत नेते वेगवेगळ्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालत असतील तर ग्रामपंचायत निवडणुकीला आपण त्याचे अनुकरण केले तर बिघडले कुठे? असे म्हणत निवडणुकीसाठी नवी समीकरणे पाहायला मिळत आहेत. तालुक्यात सध्या ९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. ४ आॅगस्टला मतदान होणार आहे. तर ६ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. मनोमिलन, मैत्रिपर्व अन् आघाडीमुळे बहुतांशी गावात अपवाद वगळता दुरंगीच लढती होत आहेत. पाच गावांचा बिनविरोधचा ‘झेंडा’ खरंतर गावाची एकी गावाच्या विकासाला गती देऊ शकते; पण हे लक्षात कोण घेतो? पण, कऱ्हाड तालुक्यातील शेवाळेवाडी, भुयाचीवाडी, भरेवाडी, भोळेवाडी अन् पाचुंदच्या ग्रामस्थांना ते पटलंय म्हणून तर त्यांनी बिनविरोधचा झेंडा फडकविला आहे.