शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

मनोमिलन अन् आघाडीसुध्दा !

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

सोयीचे राजकारण : नेत्यांचेही कानावर हात; म्हणे... तुमचं तुम्ही बघा !

प्रमोद सुकरे - कऱ्हाड तालुक्याचं राजकारण प्रत्येक निवडणुकीत बदलताना पाहायला मिळते. सत्तेसाठी नेत्यांची वेगळी समीकरणं पाहायला मिळतात. त्याला मनोमिलन, मैत्रिपर्व अशी गोंडस नावंही दिली जातात; पण यातून कार्यकर्त्यांनीही आता बरेच शहाणपण घेतले आहे. त्याचेच प्रत्यंतर आता गावोगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत येत असून, ग्रामस्थांनी काही ठिकाणी नव्याने मनोमिलन केलेलं दिसतंय तर काही ठिकाणी मैत्रिपर्व जपल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही गावांत मतभेद बाजूला ठेवून आघाडीही झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायती ! ही पहिली पायरी आपणच यशस्वीपणे पार पाडावी यासाठी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आता अर्ज माघारीची मुदत संपल्याने उमेदवारांसह स्थानिक नेत्यांनी जोर बैठकांची गती वाढविली आहे. ४ आॅगस्टला ते एकमेकांना प्रत्यक्ष भिडणार आहेत. पण, गावच्या आखाड्यातील ही कुस्ती जिंकण्यासाठी सोयीचे राजकारण करत गावागावांत नवे मैत्रिपर्व, मनोमिलन पाहायला मिळाले आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतोच मुळी ! कऱ्हाड तालुक्यात तर प्रत्येक निवडणुकीला राजकारणाच वेगळे चित्र पाहायला मिळू लागले आहे. त्याला ग्रामपंचायत निवडणूकाही अपवाद नाहीत. राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे मोहिते अन् भोसले गट सात वर्षांपूर्वी एकत्र आले. त्याला ‘मनोमिलन’ असं नाव देण्यात आलं. त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विलासराव पाटील-उंडाळकरांच्या विरोधात सर्वजण एकत्रित आले. त्याला ‘महाआघाडी’ असे संबोधले गेले. तर विधानसभा निवडणुकीतील घडामोडींनंतर विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले गट पुन्हा एकत्र आले. त्याला ‘मैत्रिपर्व’ म्हटलं गेलं. या साऱ्या घडामोडींमुळे गावागावांत दोन नव्हे तर तीन, चार, पाच असे गट तयार झाले आहेत. पण, प्रत्येक निवडणुकीत नेते वेगवेगळ्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालत असतील तर ग्रामपंचायत निवडणुकीला आपण त्याचे अनुकरण केले तर बिघडले कुठे? असे म्हणत निवडणुकीसाठी नवी समीकरणे पाहायला मिळत आहेत. तालुक्यात सध्या ९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. ४ आॅगस्टला मतदान होणार आहे. तर ६ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. मनोमिलन, मैत्रिपर्व अन् आघाडीमुळे बहुतांशी गावात अपवाद वगळता दुरंगीच लढती होत आहेत. पाच गावांचा बिनविरोधचा ‘झेंडा’ खरंतर गावाची एकी गावाच्या विकासाला गती देऊ शकते; पण हे लक्षात कोण घेतो? पण, कऱ्हाड तालुक्यातील शेवाळेवाडी, भुयाचीवाडी, भरेवाडी, भोळेवाडी अन् पाचुंदच्या ग्रामस्थांना ते पटलंय म्हणून तर त्यांनी बिनविरोधचा झेंडा फडकविला आहे.