शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उन्हाचा चटका; सातारा जिल्ह्यात पारा ३५ अंशावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 14:20 IST

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील तापमानात वेगाने बदल झाला आहे.

सातारा : जिल्ह्यातून थंडी गायब होत असून कमाल तापमान ३५ अंशावर जात आहे. यामुळे यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता लवकरच अनुभवयास मिळणार आहे.

जिल्ह्यात हिवाळी ऋतुत थंडीचे प्रमाण अधिक जाणवलेच नाही. कारण, डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत होता; पण किमान तापमान कधीही ११.०७ अंशाच्या खाली आले नाही. आता तर उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे किमान तापमान वाढत चालले आहे. सध्या सातारा शहरातील किमान तापमान १५ अंशाच्या वर गेले आहे. परिणामी पहाटेच्या सुमारास काही प्रमाणात थंडी जाणवते. पण, रात्रीच्या सुमारास उकाडा जाणवत आहे.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील तापमानात वेगाने बदल झाला आहे. किमान तसेच कमाल तापमान वाढत चालले आहे. यामुळे उन्हाचे प्रमाण वाढले आहे. तसेच दुपारच्या सुमारास तर चटका जाणवत आहे. मागील तीन दिवसांत सतत कमाल तापमान ३४ अंशावर राहिले. त्याचबरोबर थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचाही पारा वाढत चाललाय. यामुळे थंडी गायब झाली असून ऊन वाढू लागले आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात तर कमाल तापमान १५ अंशावर आहे. तर कमाल तापमान ३५ अंशावर राहत आहे. यामुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे. आगामी तीन महिने उन्हाळ्याचे असून कमाल तापमान ४० अंशावर जाणार आहे.

सातारा शहरात नोंद कमाल तापमान

१५ फेब्रुवारी ३१.०८,  १६ फेब्रुवारी ३१.०१, १७ फेब्रुवारी ३१.०२, १८ फेब्रुवारी ३२.०६, १९ फेब्रुवारी ३३.०२, २० फेब्रुवारी ३३.०१, २१ फेब्रुवारी ३४.०५, २२ फेब्रुवारी ३५.०१, २३ फेब्रुवारी ३४.०८ आणि २४ फेब्रुवारी ३४.०५

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान