शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

Wedding ceremony : साखरेच्या रुखवताचा विवाह सोहळ्यात गोडवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 17:16 IST

विवाह सोहळ्यात अशा रुखवताला मानाचे स्थान असते ; परंतु काळ बदलला तसा रुखवतही बदलत गेला. वधू-वराच्या आवडी-निवडीप्रमाणे रुखवत देण्याची परंपरा सुरू झाली.

सचिन काकडे

सातारा : विविध साहित्याचा कल्पकतेने वापर करून बनविलेल्या वस्तू म्हणजे रुखवत. विवाह सोहळ्यात अशा रुखवताला मानाचे स्थान असते ; परंतु काळ बदलला तसा रुखवतही बदलत गेला. वधू-वराच्या आवडी-निवडीप्रमाणे रुखवत देण्याची परंपरा सुरू झाली.

याही पलीकडे जाऊन आता साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी रुखवतातील वस्तूंना चक्क साखरेचा साज चढवलाय. केवळ साखरेपासून तयार केलेला हा अनोखा रुखवत विवाह सोहळ्याची गोडी देखील वाढवू लागला आहे.

असा तयार झाला रुखवत

-साखर, साखरेचा पाक अन् खाऊच्या रंगांचा अत्यंत कल्पकतेने वापर करून हा रुखवत तयार करण्यात आला आहे.-या वस्तू बनविण्यासाठी जवळपास ६ किलो साखरेची गरज भासते. बऱ्याचदा रेडिमेड अथवा घरात बनविलेला फराळ रुखवत म्हणून वधूसोबत पाठविला जातो.-हा फराळ काही दिवस टिकतो. मात्र, साखरेचे तसे नाही. साखरेचा स्वयंपाकघरात पुन्हा वापरही करता येऊ शकतो, असे व्यापारी सांगतात.

रुखवतातील पदार्थ

या रुखवतात साखरेपासून बनविलेला हळदी-कुंकवाचा करंडा, कलश, फराळाचे ताट, करंजी, लाडू, मोदक, बर्फी, महादेवाची पिंड, तांब्या भांडे, तुुळशी वृंदावन, आईस्क्रीम, जेवणाचे ताट अशा वस्तूंचा समावेश आहे.

लग्नसराईत रुखवताची संकल्पना दिवसेंदिवस बदलू लागली आहे. आता विविध प्रकारच्या वस्तूंबरोबरच साखरेच्या रुखवतालाही मागणी वाढली आहे. साखर पुन्हा उपयोगात येणारा पदार्थ आहे. त्यामुळे असा रुखवत लग्न सोहळ्याची शोभाच नव्हे तर, गोडवाही वाढवत आहे. - योगेश मोदी, व्यावसायिक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न