शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

मायणी, येरळवाडी परिसर ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : खटाव तालुक्यातील मायणी व येरळवाडी तलाव परिसरामध्ये पक्ष्यांच्या विविध जाती वर्षभर पाहावयास मिळत असतात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी व येरळवाडी तलाव परिसरामध्ये पक्ष्यांच्या विविध जाती वर्षभर पाहावयास मिळत असतात. त्यामुळे शासनामार्फत पक्ष्यांचे संरक्षण व्हावे. यासाठी या भागास मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले होते. मात्र आता हे क्षेत्र ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबत राजपत्र (अधिसूचना) नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यासाठी मायणी, कानकात्रे, अंबवडे, नडवळ, येरळवाडी, बनपुरी गावांच्या परिसरातील ८६६ हेक्‍टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

कोल्हापूर वनवृत्तमधील सातारा जिल्ह्याच्या सातारा वनविभागाच्या वडूज वनपरिक्षेत्राच्या मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये परिस्थितीकीय, प्राणीजातीय व वनस्पतीविषयक महत्त्वाचे असल्याने यामध्ये लेसर फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, ब्लॅक-टेल्ड, गाॅडविट, जकाना, ओपन बिल्ड स्टोर्क आदी पक्षी व त्यातील प्राणी जाती व वनस्पती तसेच संरक्षित करण्याच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र शासनाचा स्थानिक सामुदायिक विचारविनिमय केल्यानंतर हे क्षेत्र संवर्धन क्षेत्र म्हणून गठित करणे गरजेचे आहे, असा निर्णय घ्यावा असे वाटले.

त्यामुळे वन्य संरक्षण अधिनियम कायद्यातील सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने अधिसूचना (राजपत्र) शासनाचे उपसचिव (वने) गजेंद्र नरवणे यांनी प्रसिद्ध केली. यामध्ये मायणी पक्षी संवर्धन राखीव या नावाने ओळखले जाणारे क्षेत्र आता ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये समूह क्रमांक एक मायणी तलाव व समूह क्रमांक दोन येरळवाडी तलाव असे दोन समूह निश्चित करण्यात आले आहेत.

यामध्ये मायणी तलाव व परिसर २१८.२४ हेक्‍टर, कानकात्रे तलाव व परिसर सुमारे १४.९४ हेक्टर, अंबवडे परिसर ७०.७२ हेक्टर, नडवळ परिसर १३२.४० हेक्टर, येरळवाडी तलाव बुडीत क्षेत्र ३२६.२४ हेक्टर व बनपुरी तलाव बुडीत क्षेत्र १०४.२१ असे एकूण ८६६.७५ हेक्टर म्हणजे ८.६७ चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

या संवर्धन राखीव क्षेत्रसाठी राखीव वनक्षेत्र व शासकीय जमीन निश्चित करण्यात आली असून, या सर्व क्षेत्राच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील या भागाचा आता फक्त पक्षी संवर्धन करण्यासाठी उपयोग न करता पक्ष्यांबरोबर वन्य प्राण्यांचे संवर्धन या राखीव क्षेत्रात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

(दोन कोट येणार आहेत..)