शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

मायणी-विटा राज्यमार्ग बनलाय कर्दनकाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : मायणी-विटा राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असून, या खड्ड्यांकडे संबंधित विभागाने पूर्णपणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : मायणी-विटा राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असून, या खड्ड्यांकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्यांमध्ये कोणाचा जीव गेल्यावर संबंधित विभागाला जाग येणार आहे का? असा सवाल स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.

येथील मिरज-भिगवण राज्यमार्गावरील मायणी-विटा दरम्यान मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सातारा जिल्हा हद्दीवर सुमारे दोन फूट खोल व चार ते पाच फूट लांब खड्डा पडला आहे, तसेच या खड्ड्याजवळील मार्ग ही खचला आहे. दोन्ही बाजूला चांगला मार्ग असल्याने वाहने वेगाने येत आहेत, तसेच रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांची लाईट पडल्यावर हा खड्डा व खचलेला रस्ता दिसत नसल्याने या ठिकाणी रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. तसेच वाहनांचेही नुकसान होत आहे. या खड्ड्यांबाबत अनेकवेळा आवाज उठवल्यानंतरही संबंधित विभाग याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नक्की हा विभाग या ठिकाणी कोणाचा जीव जाण्याची वाट बघत आहे का, जीव गेल्यानंतरच का खड्डा बुजवणार का? असा सवाल स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक करत आहेत.

(चौकट)

जखमींना पोलिसांची मदत...

मागील पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी पती-पत्नी दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाले होते. तसेच शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आणखी एक वयस्कर व्यक्ती खड्ड्यात पडून जखमी झाला होता. त्यावेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांच्या मदतीने या दोन्ही जखमींना उपचारासाठी दाखल केले होते.

(चौकट)

जिल्हा हद्दीत शेकडो खड्डे..

सातारा-सांगली जिल्ह्यातून हा राज्यमार्ग जात असतानाही सांगली जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा सातारा जिल्ह्यापेक्षा अधिक चांगला आहे. सातारा जिल्ह्यातील या मार्गावर शेकडो खड्डे पडले आहेत तरी संबंधित विभाग याकडे म्हणावे तेवढे गांभीर्याने घेत नाही.

(चौकट )

अपघातानंतरच दुरुस्ती होणार का?

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या सुमारे ८० किलोमीटरच्या राज्यमार्गावर अनेक ठिकाणी एक फुटापेक्षा जास्त खोलीचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये अनेक अपघात होत आहेत. वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे, तरीही याकडे संबंधित विभागाचा कानाडोळा सुरू आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतरच या मार्गाची दुरुस्ती होणार का? असा प्रश्न पडत आहे.

कोट...

या राज्यमार्गाची दुरुस्ती करण्याचे संपूर्ण अधिकार केंद्राकडे देण्यात आल्याचे स्थानिक अधिकारी वेळोवेळी सांगत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य भेदभाव न करता जोपर्यंत केंद्राचा निधी येणार नाही, तोपर्यंत स्थानिक विभागाने या मार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

-प्रशांत कोळी, पोलीस पाटील, मायणी

२३मायणी

मायणी-विटा राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत. (छाया: संदीप कुंभार)