शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

माउलींचा पालखी मार्ग होणार हरित ! २० हजार झाडे लावणार : प्लास्टिक मुक्तीसाठी वारकऱ्यांना पत्रावळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:07 IST

निर्मल वारी, हरित वारी आणि स्वच्छ वारी संकल्पा अंतर्गत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या बाजूला कडुनिंबासह इतर २० हजार झाडे

ठळक मुद्दे पावसामुळे रेनकोटचेही वाटप

सातारा : निर्मल वारी, हरित वारी आणि स्वच्छ वारी संकल्पा अंतर्गत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या बाजूला कडुनिंबासह इतर २० हजार झाडे लावण्यात येत आहेत, त्यामुळे नजीकच्या काळात हा मार्ग हरित होईल. तर प्लास्टिक मुक्तीसाठी पत्रावळी आणि पावसापाासून बचावासाठी वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात येत आहे.

वृक्षतोडचे प्रमाण मोठे आहे, त्यामुळे याचा परिणाम पर्यावरणावरही होऊ लागलाय. त्यातच दिवसेंदिवस पाऊसही कमी-कमी होत चाललाय. हे ओळखूनच राज्य शासनाने वृक्ष लागवडीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतलीय. तसेच नागरिकांमध्येही जागृती होत असल्याने वृक्षारोपणाचे प्रमाण वाढत आहे. अशाचप्रकारे प्रत्येकजण वृक्ष लागवडीसाठी योगदान देत असतानाच आता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावर जवळपास २० हजार झाडे लावण्यात येत आहेत. त्यामध्ये कडुनिंबाच्या झाडाचा अधिक प्रमाणात समोवश आहे.

निर्मल वारी, हरित वारी आणि स्वच्छ वारी संकल्पा अंतर्गत ही झाडे लावण्यात येत आहेत. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ, पुणे येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, एसएनडीटी विद्यापीठ, सोलापूरच्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासह इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे. हे विद्यार्थी पालखी तळावर थांबून लक्ष देतात. पालखी सोहळा पुढे गेल्यावर तळावर तसेच मार्गाच्या बाजूला कडुनिंबाची झाडे लावत आहेत. तसेच स्वच्छता आणि वारकºयांना सोयी सुविधा मिळतात का? हे ही ते पाहत आहेत.

जिल्ह्यात पालखी सोहळा आला असून, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी जात आहेत. बुधवारी सातारा शहरातील काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी लोणंद येथील पालखी तळावर स्वच्छता करण्याबरोबरच वारकºयांत आरोग्य, पाण्याबाबत प्रबोधन केले. वृक्षारोपणही केले. पालखीचा शेवटचा मुक्काम बरड येथे असतो. तोपर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थी वारीत सहभागी होत स्वच्छता, प्रबोधन, वृक्षारोपण असे कार्यक्रम करणार आहेत.प्लास्टिकचा वापर होणार कमी...ही वारी प्लास्टिकमुक्त होण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जवळपास ५० लाख पत्रावळींचे जेवणासाठी वाटप करण्यात येणार आहे. या पत्रावळीमुळे प्लास्टिकचा वापर खूपच कमी होणार आहे. तसेच या वारीतील ४ ते ५ लाख वारकºयांना पावसापासून बचाव होण्यासाठी ४ ते ५ लाख रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे वारकºयांना पावसापासून संरक्षण करता येणे शक्य होईल. 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात आला आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी स्वच्छता मोहीम, प्रबोधन, वृक्षारोपण आदी कार्यक्रम करत आहेत. बुधवारीही विद्यार्थ्यांनी लोणंद येथील पालखी तळ तसेच नीरापर्यंत स्वच्छता करून वृक्षारोपण केले.- प्रा. प्रकाश गायकवाड, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

लोणंद, ता. खंडाळा येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीने प्रस्थान केल्यानंतर विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर