शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

फलटणमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 18:52 IST

बाकीच्या देशातून आलेल्या नागरिकांना अकरा वर्षांत नागरिकत्व मिळते; परंतु या लोकांना पाच वर्षांत मिळणार आहे. सध्या भारतात राहणाºया कोणत्याही धर्मातील बांधवांना या कायद्याचा त्रास होणार नाही. काही अपप्रवृत्ती या कायद्याविरोधात माथी भडकावून दंगे घडवून आणत आहेत, अशा अपप्रवृत्तीविरोधात कारवाई व्हावी.

ठळक मुद्देप्रांताधिकाऱ्यांना निवेदन : अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी

फलटण : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी फलटणमध्ये प्रबोधन मंच आणि राष्ट्रप्रेमी देशभक्त विविध संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. आंदोलनकर्त्यांना प्रांताधिकाºयांना निवेदन दिले.छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात भाजपचे पदाधिकारी अनेक हिंदू संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ‘भारत माता की जय..’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

मोर्चा प्रांत कार्यालयाजवळ आल्यानंतर प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप सामोरे गेले. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणत्याही जातीधर्माविरोधात नाही. हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्थान, बांगलादेश येथील धार्मिक अत्याचारास कंटाळून भारतात आलेल्या तेथील अल्पसंख्याक असणाºयांसाठी आहे. बाकीच्या देशातून आलेल्या नागरिकांना अकरा वर्षांत नागरिकत्व मिळते; परंतु या लोकांना पाच वर्षांत मिळणार आहे. सध्या भारतात राहणाºया कोणत्याही धर्मातील बांधवांना या कायद्याचा त्रास होणार नाही. काही अपप्रवृत्ती या कायद्याविरोधात माथी भडकावून दंगे घडवून आणत आहेत, अशा अपप्रवृत्तीविरोधात कारवाई व्हावी.

मोर्चात नगरसेवक अनुप शहा, सुशांत निंबाळकर, बजरंग गावडे, वि. रा. त्रिपुटे, रवींद्र फडतरे, राजेश हेंद्रे, उषा राऊत, माऊली सावंत, पोपट बर्गे, दामूअण्णा रणशिंग सहभागी झाले होते. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

 

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर