शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मराठा आरक्षण एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच मिळेल- राजेश क्षीरसागर

By दीपक शिंदे | Updated: October 22, 2023 17:04 IST

सातारा जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देणार

सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयास लवकरच अचानक भेट देणार आहे. हवं तर स्कुटरवरून येवून पाहणी करेन. या रुग्णालयाचा टप्प्या-टप्प्याने विकास करण्याच्या अनुषंगाने आरोग्य उपसंचालकांसमवेत व्यापक बैठक घेवून जे-जे करावे लागेल, ते करू. जिल्हयातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. मुंबईत आझाद मैदानावर नियोजित शिवसेनेच्या (शिंदे गट) दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी सातारा दौऱ्यावर आलेल्या राजेश क्षीरसागर यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

क्षीरसागर म्हणाले, दरवर्षी दसऱ्याला शिवतिर्थावर शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी जायचो. गेल्यावर्षी शिवसेनाप्रमुखांचे विचार आम्ही एकनाथ शिंदे यांच्या तोंडून ऐकण्यासाठी बी.के.सी. मैदानावर गेलो तर यावर्षी आझाद शिवसैनिकांचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होत आहे. सातारा जिल्ह्यातून किमान दहा हजार शिवसैनिक मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. लोकांनी शिवतिर्थावर सोनिया गांधी, राहूल गांधी, ममता बॅनर्जी, मुलायमसिंग यांचे विचार ऐकायचे काय असा सवाल करत उद्ध ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार टिका केली.

मराठा समाजाचा आरक्षण गंभीर विषय आहे. आरक्षण मिळावे, पण कायमचे टिकणारे असावे, यासाठी सरकार काम करत असून मराठा समाजाला आरक्षण एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारींबाबत क्षीरसागर म्हणाले, असे प्रकार आढळून आल्यास ताबडतोड तक्रार करावी. सर्वसामान्यांना त्रास झाल्यास कडक कारवाई करणार करणार असल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत युतीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यानंतरच साताराची जागा युतीतील कोणत्या पक्षाचा उमेदवार लढवणार हे निश्चित होईल, असे क्षीरसागर म्हणाले. पाटील, महाडिक, मुश्रिफ एकत्र एकत्र आले तर..

कोल्हापुरातील एका कार्यक्रमात एकमेकांचे विरोधक असलेले सतेज पाटील, धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येवून फेटे बांधले याबाबत क्षीरसागर यांना छेडले असता ते म्हणाले, राजकारणात कोणी हाडवैर संपवून एकत्र येत असले तर आनंदच आहे. परंतु, ते तिघे एकत्र आले तरी शिवसेनेला काही फरक पडणार नाही. उलट शिवेसनेचाच जनाधार वाढेलच. कारण जनतेलाही त्यांचे खरे राजकारण कळून येईल.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार