शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Maratha reservation- मराठा समाज सरकारला धडा शिकवेल : उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 15:01 IST

Maratha Reservation (15823) Court (12523), Udayanraje Bhosale (12272), Satara area मराठा आरक्षणाच्या विषयावर अनेक वर्षे लढा सुरू आहे. शेकडो लोकांचे भविष्य टांगणीला लागले असताना सर्वोच्च न्यायालयात नियोजित सुनावणीवेळी जर सरकारचा वकील उपस्थित राहत नसेल तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही पुढे येत आहे. तसे असेल तर मराठा समाज या सरकारला नक्की धडा शिकवेल, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमराठा समाज सरकारला धडा शिकवेल : उदयनराजे भोसले सुनावणीला सरकारचे वकील उपस्थित न राहिल्याने व्यक्त केला संताप

सातारा : मराठा आरक्षणाच्या विषयावर अनेक वर्षे लढा सुरू आहे. शेकडो लोकांचे भविष्य टांगणीला लागले असताना सर्वोच्च न्यायालयात नियोजित सुनावणीवेळी जर सरकारचा वकील उपस्थित राहत नसेल तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही पुढे येत आहे. तसे असेल तर मराठा समाज या सरकारला नक्की धडा शिकवेल, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

उदयनराजे भोसले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा संताप व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती, त्यानंतर पुन्हा सुनावणी झाल्यावर कोर्टाने ही सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली. मात्र गेले दोन आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असताना सुद्धा सरकारने जाणीवपूर्वक तयार केले नाही.

जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसेल तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदा सुनावणी पार पडणार होती. मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्याने काही काळ कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही, ही बाब स्पष्टपणे दिसून येत आहे.

तसेच सरकार आणि वकीलामध्ये कसलाही समन्वय नाही असेच सिद्ध होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका आता संशयास्पद आहे. मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती देऊन चार आठवडे उलटून गेले तरीही सरकार सुस्तच आहे. आरक्षणाचा निकाल लागत नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला प्रवेशाचा प्रश्न कायम आहे. शेकडो तरुणांच्या नोकरीचा प्रश्‍न लोंबकळत पडला आहे. तरीही सरकारला जाग येत नाही.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे? याचा सरकारने तत्काळ जाहीर खुलासा करावा. मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध तुटायची वेळ आता आली आहे. या उद्रेकाची सरकार वाट पाहते की काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील असल्याची घोषणा केली. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारची नेमकी दिशा ठरलेली दिसत नाही.

कारण सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील सुनावणीला हजर नव्हते. त्यामुळे कोर्टाने काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली, ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे. आता तरी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे उदयनराजे यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणCourtन्यायालयUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर