शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला इकडे येण्याची संधी, विचार करता येईल, विधिमंडळातच फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
7
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
8
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
9
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
10
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
11
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
12
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
13
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
14
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
15
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
16
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
17
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
18
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
19
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
20
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

‘जागर’साठी मराठा बांधव आज रवाना-साताऱ्यातील बैठकीत पुन्हा एल्गार; तुळजापूरच्या आंदोलनासाठी जिल्ह्यातून मोठा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:20 IST

सकल मराठा समाजबांधवांच्या तुळजापूर येथे दि. २९ जून रोजी होणाºया जागर व गोंधळ मोर्चासाठी साताºयातून मराठा बांधव गुरुवारी रवाना होणार आहेत. दरम्यान, या आंदोलनासाठी

सातारा : सकल मराठा समाजबांधवांच्या तुळजापूर येथे दि. २९ जून रोजी होणाऱ्या जागर व गोंधळ मोर्चासाठी साताऱ्यातून मराठा बांधव गुरुवारी रवाना होणार आहेत. दरम्यान, या आंदोलनासाठी जिल्हाभरातूनही मराठा बांधवांचा मोठा सहभाग निश्चित झाला असून, त्या त्या तालुक्याच्या ठिकाणाहून मराठा बांधव मार्गस्थ होणार आहेत.

मुंबईतील ५८ व्या मोर्चानंतरही शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत कसलाही प्रतिसाद दिला नाही. इतर समाजाने मोर्चे काढले असते तर सरकारने गुडघे टेकून त्यांना वंदन करून मागण्या मान्य केल्या असत्या. मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले आहे. शासनाने सुरुवातीच्या काळात फसव्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड खदखद निर्माण झाली आहे.

विराट मोर्चानंतर आता मराठा क्रांती मोर्चाचा दुसरा व निर्णायक टप्पा लवकरच सुरू होत आहे. त्या अनुषंगाने राज्यभर बैठकांचे सत्र सुरू आहे. साताºयातही मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीला समन्वयक शरद काटकर, हरीष पाटणे, राजू भोसले, राजेंद्र मोहिते, शरद जाधव, वैभव चव्हाण, अमोल मोहिते, बापू क्षीरसागर, संदीप पोळ, सुनील काटकर आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साताºयातून गुरुवारी दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृहावरून मराठा बांधव तुळजापूरकडे रवाना होणार आहेत. यासंदर्भात मराठा बांधवांनी शरद जाधव व प्रशांत निंबाळकर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच प्रत्येक तालुक्यातून त्या त्या तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आंदोलनासाठी जाण्याबाबतचे नियोजन करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

२९ जून रोजी तुळजापूर येथे जागरण व गोंधळ घालून दुसऱ्या टप्प्यातील रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यामुळे या आंदोलनात मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मराठा समाजाच्या मुलांना टक्केवारी चांगली मिळाली; परंतु आर्थिक विवंचनेमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता येत नाही. ही मराठा समाजाची शोकांतिका आहे. नुकतेच नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मात्र, मराठा समाजाच्या कोणत्याही मुलाला शिक्षणासाठी शासनाने लाभ दिलेला नाही.आज ८० टक्के मराठा समाज शेतकरी असून, तो ४० एकर जमिनीवरून चार गुंठ्यांवर आला आहे. कारण मराठा या नावामुळे कुठल्याच सवलती त्याला मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. शासन फसवत आहे, याची मराठा समाजाला जाणीव होऊ लागली आहे.बैठकीत १२ ठराव सर्वानुमते मंजूरसाताºयातील बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एकूण १२ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. समाजाच्या यापुढील आंदोलनाच्या दुसºया टप्प्यात सर्वांनी सहभागी होऊन आंदोलनाची तीव्रता व व्यापकता वाढवण्याचा एल्गार पुकारण्यात आला. यावेळी झालेल्या ठरावापैकी तीन ठराव खालीलप्रमाणे आहेत. दरम्यान, साताºयात लवकरच मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक होणार असल्याची माहितीही समन्वयक शरद काटकर यांनी दिली.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत २० मार्च २०१८ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी व मराठा क्रांती मोर्चाने गैरवापर रोखण्यासाठी सूचवल्याप्रमाणे कायद्यामध्ये तत्काळ दुरुस्त्या करून त्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू कराव्यात.

मराठा आरक्षणाबाबत कोणतीही न्यायालयीन वा प्रशासकीय सबब न दाखवता वा सांगता राज्य शासनाने येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षण जाहीर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी. तसेच केंद्र शासनास मराठा समाजाचा इतर मागासवर्गामध्ये समावेश करण्याबाबत ठोस शिफारशीसह तत्काळ अहवाल पाठवावा व राजपत्रित अधिसूचना काढण्याबाबत विनंती करावी.ईबीसी सवलत आणि पन्नास टक्के फी माफीचा निर्णय तत्काळ लागू करावा व त्या आदेशाची प्रत राज्यातील सर्व कॉलेजेस व शाळांना देऊन या आदेशाचे पालन व अंमलबजावणी न करणाºया शाळा व कॉलेजेसची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागास द्यावेत.

टॅग्स :marathaमराठाSatara areaसातारा परिसर