शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: चार माणसं, लाकडी कावड अन् रुग्णाचा जीवघेणा खडतर प्रवास!, जावळी तालुक्यातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 16:39 IST

सातारा जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावे आजही मूलभूत सेवांपासून वंचित

सातारा : भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही सातारा जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावे आजही मूलभूत सेवांपासून वंचित आहेत. जावळी तालुक्यातील सांडवली-केळवली ग्रामपंचायतअंतर्गत येणारी गणेशवाडी, दत्तवाडीदेखील याला अपवाद नाही. या वाड्यांमध्ये आरोग्य सेवाच उपलब्ध नसल्याने आजारी व्यक्तीला चक्क बांबूच्या कावडीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.सांडवली-केळवली हे जावळी तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले गाव. येथील गणेशवाडी व दत्तवाडीत मिळून ३० कुटुंबे वास्तव्य करतात. सातारा शहरापासून ही वाडी ३५ किलोमीटर अंतरावर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या दुर्गम वाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र दूर असून, साधा ये-जा करण्यासाठी रस्ताही कधी झाला नाही. वाडीत एखादी महिला, पुरुष अथवा गर्भवती आजारी पडल्यास त्यांना कावडीतून तीन किलोमीटरची पायपीट करून केळवली अथवा सांडवली गावापर्यंत आणलं जातं. येथे दुधाची अथवा मिळेल ती गाडी पकडून वीस किलोमीटर अंतरावर असलेले परळी हे गाव गाठावं लागतं. आजार गंभीर असेल तर रुग्णाला साताऱ्याला हलविण्याशिवाय पर्याय नसतो.

गणेशवाडीतील चिंगूबाई भगवान माने (वय ७०) ही वृद्धा रविवारी आजारी पडल्याने तिला चार गावकऱ्यांनी बांबूची कावड करून कसेबसे रुग्णालयात दाखल केले. दगड-माती, चिखल अन् पावसाच्या धारा झेलत रुग्णच नव्हे तर ग्रामस्थांना देखील अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षांनंतरही आम्हाला आरोग्य सेवेसाठी झगडावे लागत आहे, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं, अशा भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

अकरा दिवसांपासून वीज खंडित

मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे गणेशवाडी व दत्तवाडीचा वीजपुरवठा अकरा दिवसांपूर्वी खंडित झाला आहे. ग्रामस्थांनी कल्पना देऊनही वीजवितरणचा कर्मचारी आजवर येथे फिरकला नाही. त्यामुळे नोकरीनिमित्त परगावी असणाऱ्या येथील तरुणांना आई-वडिलांशी, नातेवाइकांशी संपर्कच साधता येत नाही. ना ग्रामस्थांना आपल्या समस्या कोणाला सांगता येत आहेत. प्रशासनाने किमान आमची वीज तरी सुरू करावी, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

तुम्हीच सांगा आम्ही जगाचयं कसं ?

या भागातील नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. दुर्गम डोंगरी भाग असल्याने लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते व प्रशासन ढुंकून देखील पाहत नाही. या भागातील नागरिक आजही पारतंत्र्यातील जीवन जगत आहेत. - तानाजी सकपाळ, दत्तवाडी 

आमच्या दोन्ही वाड्या आजही विकासापासून वंचित आहे. मुलांना रोज तीन किलोमीटर पायपीट करून शाळा गाठावी लागते. या भागात वन्यप्राण्यांकडून सातत्याने हल्ले होतात. तुम्हीच सांगा आम्ही जगायचं कसं? - रवींद्र जानकर, गणेशवाडी

या भागात आरोग्य सेवा कधीच उपलब्ध होत नाहीत. ये-जा करण्यासाठी रस्ते नाहीत. प्रशासनाला गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही निवेदने देत आहोत; परंतु आमच्या व्यथा कोणीही जाणून घेत नाही. - दत्तराम सकपाळ, दत्तवाडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर