शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

सातारा: चार माणसं, लाकडी कावड अन् रुग्णाचा जीवघेणा खडतर प्रवास!, जावळी तालुक्यातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 16:39 IST

सातारा जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावे आजही मूलभूत सेवांपासून वंचित

सातारा : भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही सातारा जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावे आजही मूलभूत सेवांपासून वंचित आहेत. जावळी तालुक्यातील सांडवली-केळवली ग्रामपंचायतअंतर्गत येणारी गणेशवाडी, दत्तवाडीदेखील याला अपवाद नाही. या वाड्यांमध्ये आरोग्य सेवाच उपलब्ध नसल्याने आजारी व्यक्तीला चक्क बांबूच्या कावडीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.सांडवली-केळवली हे जावळी तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले गाव. येथील गणेशवाडी व दत्तवाडीत मिळून ३० कुटुंबे वास्तव्य करतात. सातारा शहरापासून ही वाडी ३५ किलोमीटर अंतरावर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या दुर्गम वाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र दूर असून, साधा ये-जा करण्यासाठी रस्ताही कधी झाला नाही. वाडीत एखादी महिला, पुरुष अथवा गर्भवती आजारी पडल्यास त्यांना कावडीतून तीन किलोमीटरची पायपीट करून केळवली अथवा सांडवली गावापर्यंत आणलं जातं. येथे दुधाची अथवा मिळेल ती गाडी पकडून वीस किलोमीटर अंतरावर असलेले परळी हे गाव गाठावं लागतं. आजार गंभीर असेल तर रुग्णाला साताऱ्याला हलविण्याशिवाय पर्याय नसतो.

गणेशवाडीतील चिंगूबाई भगवान माने (वय ७०) ही वृद्धा रविवारी आजारी पडल्याने तिला चार गावकऱ्यांनी बांबूची कावड करून कसेबसे रुग्णालयात दाखल केले. दगड-माती, चिखल अन् पावसाच्या धारा झेलत रुग्णच नव्हे तर ग्रामस्थांना देखील अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षांनंतरही आम्हाला आरोग्य सेवेसाठी झगडावे लागत आहे, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं, अशा भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

अकरा दिवसांपासून वीज खंडित

मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे गणेशवाडी व दत्तवाडीचा वीजपुरवठा अकरा दिवसांपूर्वी खंडित झाला आहे. ग्रामस्थांनी कल्पना देऊनही वीजवितरणचा कर्मचारी आजवर येथे फिरकला नाही. त्यामुळे नोकरीनिमित्त परगावी असणाऱ्या येथील तरुणांना आई-वडिलांशी, नातेवाइकांशी संपर्कच साधता येत नाही. ना ग्रामस्थांना आपल्या समस्या कोणाला सांगता येत आहेत. प्रशासनाने किमान आमची वीज तरी सुरू करावी, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

तुम्हीच सांगा आम्ही जगाचयं कसं ?

या भागातील नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. दुर्गम डोंगरी भाग असल्याने लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते व प्रशासन ढुंकून देखील पाहत नाही. या भागातील नागरिक आजही पारतंत्र्यातील जीवन जगत आहेत. - तानाजी सकपाळ, दत्तवाडी 

आमच्या दोन्ही वाड्या आजही विकासापासून वंचित आहे. मुलांना रोज तीन किलोमीटर पायपीट करून शाळा गाठावी लागते. या भागात वन्यप्राण्यांकडून सातत्याने हल्ले होतात. तुम्हीच सांगा आम्ही जगायचं कसं? - रवींद्र जानकर, गणेशवाडी

या भागात आरोग्य सेवा कधीच उपलब्ध होत नाहीत. ये-जा करण्यासाठी रस्ते नाहीत. प्रशासनाला गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही निवेदने देत आहोत; परंतु आमच्या व्यथा कोणीही जाणून घेत नाही. - दत्तराम सकपाळ, दत्तवाडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर