शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: चार माणसं, लाकडी कावड अन् रुग्णाचा जीवघेणा खडतर प्रवास!, जावळी तालुक्यातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 16:39 IST

सातारा जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावे आजही मूलभूत सेवांपासून वंचित

सातारा : भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही सातारा जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावे आजही मूलभूत सेवांपासून वंचित आहेत. जावळी तालुक्यातील सांडवली-केळवली ग्रामपंचायतअंतर्गत येणारी गणेशवाडी, दत्तवाडीदेखील याला अपवाद नाही. या वाड्यांमध्ये आरोग्य सेवाच उपलब्ध नसल्याने आजारी व्यक्तीला चक्क बांबूच्या कावडीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.सांडवली-केळवली हे जावळी तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले गाव. येथील गणेशवाडी व दत्तवाडीत मिळून ३० कुटुंबे वास्तव्य करतात. सातारा शहरापासून ही वाडी ३५ किलोमीटर अंतरावर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या दुर्गम वाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र दूर असून, साधा ये-जा करण्यासाठी रस्ताही कधी झाला नाही. वाडीत एखादी महिला, पुरुष अथवा गर्भवती आजारी पडल्यास त्यांना कावडीतून तीन किलोमीटरची पायपीट करून केळवली अथवा सांडवली गावापर्यंत आणलं जातं. येथे दुधाची अथवा मिळेल ती गाडी पकडून वीस किलोमीटर अंतरावर असलेले परळी हे गाव गाठावं लागतं. आजार गंभीर असेल तर रुग्णाला साताऱ्याला हलविण्याशिवाय पर्याय नसतो.

गणेशवाडीतील चिंगूबाई भगवान माने (वय ७०) ही वृद्धा रविवारी आजारी पडल्याने तिला चार गावकऱ्यांनी बांबूची कावड करून कसेबसे रुग्णालयात दाखल केले. दगड-माती, चिखल अन् पावसाच्या धारा झेलत रुग्णच नव्हे तर ग्रामस्थांना देखील अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षांनंतरही आम्हाला आरोग्य सेवेसाठी झगडावे लागत आहे, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं, अशा भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

अकरा दिवसांपासून वीज खंडित

मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे गणेशवाडी व दत्तवाडीचा वीजपुरवठा अकरा दिवसांपूर्वी खंडित झाला आहे. ग्रामस्थांनी कल्पना देऊनही वीजवितरणचा कर्मचारी आजवर येथे फिरकला नाही. त्यामुळे नोकरीनिमित्त परगावी असणाऱ्या येथील तरुणांना आई-वडिलांशी, नातेवाइकांशी संपर्कच साधता येत नाही. ना ग्रामस्थांना आपल्या समस्या कोणाला सांगता येत आहेत. प्रशासनाने किमान आमची वीज तरी सुरू करावी, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

तुम्हीच सांगा आम्ही जगाचयं कसं ?

या भागातील नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. दुर्गम डोंगरी भाग असल्याने लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते व प्रशासन ढुंकून देखील पाहत नाही. या भागातील नागरिक आजही पारतंत्र्यातील जीवन जगत आहेत. - तानाजी सकपाळ, दत्तवाडी 

आमच्या दोन्ही वाड्या आजही विकासापासून वंचित आहे. मुलांना रोज तीन किलोमीटर पायपीट करून शाळा गाठावी लागते. या भागात वन्यप्राण्यांकडून सातत्याने हल्ले होतात. तुम्हीच सांगा आम्ही जगायचं कसं? - रवींद्र जानकर, गणेशवाडी

या भागात आरोग्य सेवा कधीच उपलब्ध होत नाहीत. ये-जा करण्यासाठी रस्ते नाहीत. प्रशासनाला गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही निवेदने देत आहोत; परंतु आमच्या व्यथा कोणीही जाणून घेत नाही. - दत्तराम सकपाळ, दत्तवाडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर