शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

लोकसहभागातून बहुले गाव, शिवारात पाणीदार क्रांती : बारामाही पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:06 IST

जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नसतानाही पाटण तालुक्यातील बहुले गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकजुटीतून मातीचे अठरा बंधारे बांधले. त्यामुळे गावातील संपूर्ण विहिरी बारमाही तुडुंब पाण्याने

ठळक मुद्देओढ्यावर बांधले अठरा बंधारे; दीडशे एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी धडपड

सुनील साळुंखे।मल्हारपेठ : जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नसतानाही पाटण तालुक्यातील बहुले गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकजुटीतून मातीचे अठरा बंधारे बांधले. त्यामुळे गावातील संपूर्ण विहिरी बारमाही तुडुंब पाण्याने भरून राहिल्या आहेत. वर्षभर ओढ्याला पाणी राहिल्याने गावासह शिवारात पाणीदार क्रांती झाली आहे.

मारुल हवेली भागातील बहुले गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून गेल्यावर्षी शिवारातील लहान-मोठे ओढ्यांचे वाया जाणारे पाणी अडवून ठिकठिकाणी मातीचे अठरा वळण बंधारे बांधले व ओढ्याचे पाणी अडविले. गेल्यावर्षी बंधाºयाचे काम केल्यामुळे येणाºया हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही. बहुले गावातील शेतकºयांना गांधीटेकडी पाणी योजनेमुळे बहुले-गारवडे ओढ्याला राहणाºया पाण्याचा फायदा होत होता. मात्र गेल्या सात-आठ वर्षांपासून उन्हाळ्यात टंचाईस सामोरे जावे लागत होते.

यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी शेतकरी राजू पाटील यांनी गावातील सहकारी सयाजी पवार, सर्जेराव पानस्कर, रामचंद्र पानस्कर, भरत पानस्कर, अंकुश पानस्कर, राजन पवार, शंकर पवार, दाजी पवार, पांडुरंग डवरी, मानसिंग पानस्कर, भीमराव जरे, भरत पवार यांनी शिवारातून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी ठिकठिकाणी बंधारे बांधून अडविले आणि गावात पाणीसाठा केला. लोकसहभागातून मातीचे बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी केली.पंधरा-वीस वर्षांपूर्वी पाऊसकाळ जास्त असल्यामुळे बहुले-गारवडे ओढ्याला ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी होते. त्यामुळे बहुले गावात विहिरींची संख्या अनेक वर्षांपासून जास्त आहे.आसपासच्या गावांनाही झाला फायदापाणी अडवा, पाणी जिरवा या पाणीदार मोहिमेचे महत्त्व ग्रामस्थांना पटल्याने ग्रामस्थांचा सहभाग वाढला आहे. यामुळे बहुले गावातील सुमारे पाचशे एकर शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे. बाजूला असणारे उर्वरित १५० एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी धडपड चालू आहे. बहुले परिसरातील गारवडे, पाळेकरवाडी गावातील विहिरींनाही या बंधाºयाचा फायदा झाला असून, पाणीसाठा वाढला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई