शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

लोकसहभागातून बहुले गाव, शिवारात पाणीदार क्रांती : बारामाही पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:06 IST

जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नसतानाही पाटण तालुक्यातील बहुले गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकजुटीतून मातीचे अठरा बंधारे बांधले. त्यामुळे गावातील संपूर्ण विहिरी बारमाही तुडुंब पाण्याने

ठळक मुद्देओढ्यावर बांधले अठरा बंधारे; दीडशे एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी धडपड

सुनील साळुंखे।मल्हारपेठ : जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नसतानाही पाटण तालुक्यातील बहुले गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकजुटीतून मातीचे अठरा बंधारे बांधले. त्यामुळे गावातील संपूर्ण विहिरी बारमाही तुडुंब पाण्याने भरून राहिल्या आहेत. वर्षभर ओढ्याला पाणी राहिल्याने गावासह शिवारात पाणीदार क्रांती झाली आहे.

मारुल हवेली भागातील बहुले गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून गेल्यावर्षी शिवारातील लहान-मोठे ओढ्यांचे वाया जाणारे पाणी अडवून ठिकठिकाणी मातीचे अठरा वळण बंधारे बांधले व ओढ्याचे पाणी अडविले. गेल्यावर्षी बंधाºयाचे काम केल्यामुळे येणाºया हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही. बहुले गावातील शेतकºयांना गांधीटेकडी पाणी योजनेमुळे बहुले-गारवडे ओढ्याला राहणाºया पाण्याचा फायदा होत होता. मात्र गेल्या सात-आठ वर्षांपासून उन्हाळ्यात टंचाईस सामोरे जावे लागत होते.

यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी शेतकरी राजू पाटील यांनी गावातील सहकारी सयाजी पवार, सर्जेराव पानस्कर, रामचंद्र पानस्कर, भरत पानस्कर, अंकुश पानस्कर, राजन पवार, शंकर पवार, दाजी पवार, पांडुरंग डवरी, मानसिंग पानस्कर, भीमराव जरे, भरत पवार यांनी शिवारातून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी ठिकठिकाणी बंधारे बांधून अडविले आणि गावात पाणीसाठा केला. लोकसहभागातून मातीचे बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी केली.पंधरा-वीस वर्षांपूर्वी पाऊसकाळ जास्त असल्यामुळे बहुले-गारवडे ओढ्याला ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी होते. त्यामुळे बहुले गावात विहिरींची संख्या अनेक वर्षांपासून जास्त आहे.आसपासच्या गावांनाही झाला फायदापाणी अडवा, पाणी जिरवा या पाणीदार मोहिमेचे महत्त्व ग्रामस्थांना पटल्याने ग्रामस्थांचा सहभाग वाढला आहे. यामुळे बहुले गावातील सुमारे पाचशे एकर शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे. बाजूला असणारे उर्वरित १५० एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी धडपड चालू आहे. बहुले परिसरातील गारवडे, पाळेकरवाडी गावातील विहिरींनाही या बंधाºयाचा फायदा झाला असून, पाणीसाठा वाढला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई