शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

मंडल आयोगाने मराठा समाजावर अन्याय केला : शशिकांत पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:08 IST

Sharad Pawar, Satara area, Politics, udayanrajebhosle मंडल आयोगामुळे मराठा समाज इतर समाजापासून बाजूला फेकला गेला. या आयोगाच्या शिफारशींमुळे मराठा समाजावर अन्याय झाला. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी सर्व समाज एकत्र ठेवण्याची अपेक्षा होती, मात्र त्यांनीच मंडल आयोगाला पाठींबा देऊन टाकला. आता सर्वांनी एकत्र आल्याशिवाय समाजापुढील प्रश्न सुटणार नाहीत, असे स्पष्टीकरण अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक शशिकांत पवार यांनी केले.

ठळक मुद्देमंडल आयोगाने मराठा समाजावर अन्याय केला : शशिकांत पवार शरद पवारांनी विरोध करायचा सोडून पाठिंबा दिला

सातारा : मंडल आयोगामुळे मराठा समाज इतर समाजापासून बाजूला फेकला गेला. या आयोगाच्या शिफारशींमुळे मराठा समाजावर अन्याय झाला. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी सर्व समाज एकत्र ठेवण्याची अपेक्षा होती, मात्र त्यांनीच मंडल आयोगाला पाठींबा देऊन टाकला. आता सर्वांनी एकत्र आल्याशिवाय समाजापुढील प्रश्न सुटणार नाहीत, असे स्पष्टीकरण अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक शशिकांत पवार यांनी केले.साताऱ्यातील जलमंदिर येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते.पवार म्हणाले, ह्यगेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी हा मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढत आहोत. ज्येष्ठ नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी क्षत्रिय मराठा समाजाची स्थापना केली. त्यांच्यासोबत मी देखील मराठाच नव्हे तर सर्व समाजांच्या हितासाठी लढत होतो.

अखिल भारतीय मराठा महासंघाने आर्थिक निकषावर आरक्षण दिले जावे, असा ठराव केला होता. मात्र मंडल आयोग या बाबीचा उल्लेख नव्हता. मराठा समाजाला बाजूला ठेवून मंडल आयोगाने शिफारशी लागू केल्या होत्या. या आयोगाला वसंतदादा पाटील यांनी विरोध केला. तर शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या बाजूने कौल दिला.ह्णपवार म्हणाले, मंडल आयोग हा मराठा समाजाला इतर समाजापासून दूर करणारा आहे, त्यामुळे शरद पवार यांनी यात लक्ष घालावे असे वारंवार सांगून देखील त्यांनी दुर्लक्ष केले. मंडल आयोगातील शिफारसी ह्या मराठा समाजावर कशा अन्यायकारक आहेत, याचे विवेचन मी एका पुस्तिकेत द्वारे केले आहे. पवारांनी केलेले दुर्लक्ष त्याला राजकीय कारण असू शकते. मात्र अन्यायग्रस्तग्रस्त मराठा समाज त्यांच्यापासून दूर गेला आहे.

मोठा लढा देऊन संयुक्त महाराष्ट्र कशासाठी मिळवला, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. राजकीय लोक घडीघडीला बदलतात आम्ही त्यातले नाही. जे काय आहे ते समाजाच्या हितासाठी मांडत होतो. आता तरी सर्व समाजाने एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा महाराष्ट्र एकसंघ राहणार नाही.अन्यथा तुमच्या हातून भले मोठे पाप होईल : उदयनराजेमहाराष्ट्रात जे आमदार आहेत त्यांचे मतदार मराठा समाजातील देखील आहेत हे त्यांनी विसरू नये. सर्वांनी एकत्र येऊन एकसंघ मागणी केल्याशिवाय मराठा समाजाचे अन्याय दूर होणार नाहीत. आता फाटे फोडत बसू नका महाराष्ट्राचे तुकडे होण्यापासून वाचवायची असेल तर वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्यांना बाजूला केले पाहिजे तसं झालं नाही तर मोठं पाप होईल. मराठा समाजाला आरक्षण हा राज्याचा प्रश्‍न आहे केंद्राकडे कशाला दाखवता, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारSatara areaसातारा परिसरPoliticsराजकारण