शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मल्हारपेठची सरपंच निवड रखडली

By admin | Updated: April 15, 2016 23:34 IST

जात प्रमाणपत्राचा अडसर : उपसरपंच झाले कारभारी; कार्यकर्ते अस्वस्थ

मल्हारपेठ : निवडणूक आयोगाच्या सुधारित नियमांमुळे जात पडताळणी प्रमाणपत्र न सादर केल्याने मल्हारपेठ ग्रामपंचायत सरपंच निवड लांबणीवर पडली आहे. आरक्षित सरपंचपद मिळणार की नाही, यामुळे इच्छुक उमेदवार चिंताग्रस्त झालेत. सध्या गावकारभारी उपसरपंच असल्याने सर्व काही आलबेल आहे. मल्हारपेठ येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सरपंचपद हे नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. त्याप्रमाणे या पदासाठी नानासाहेब कुंभार हे प्रथम अडीच वर्षांसाठी सरपंच झाले. सत्ताधारी गटाचे आठ व विरोधी गटाचे तीन असे पक्षीय बलाबल आहे. सत्ताधारी देसाई गटाने सरपंच व उपसरपंचपद हे गटात काही वर्षांसाठी वाटून घेतले होते. तो कालावधी संपल्यानंतर खऱ्या अर्थाने बदलाचे वारे वाहू लागले. परंतु ठरल्याप्रमाणे नानासाहेब कुंभार यांनी देखील सरपंच पदाचा राजीनामा दिला.त्यानंतर रितसर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाचे दावेदार गौरीहर दशवंत यांनी अर्ज दाखल केला. मात्र निवडणूक अर्ज दाखल करताना गौरीहर दशवंत हे सर्वसाधारण पुरुष गटातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. उमेदवार मागास प्रवर्गाचे असले तरी सर्वसाधारण गटातून निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज दाखल केल्याने त्यांना त्यावेळी जातपडताळणी प्रमाणपत्र लागू झाले नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जातपडताळणी करणे व त्याबाबतचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असते. जातपडताळणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विभाग तशा आशयाची हमी पावती देतो व ती पावती अर्जासोबत जोडावी लागते.हे प्रमाणपत्र मी निवडणूक झाल्यानंतर स्वत:हून कार्यालयाला सादर करीन, असे अर्जासोबत लिहून दिले जाते. मात्र, निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी आनंदराव संकपाळ यांनी गौरीहर दशवंत यांचा अर्ज तपासताना त्यांनी अर्जासोबत जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावेळी कार्यकर्त्यांची भंबेरी उडाली. कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी वाद घातला. मात्र, नियमाप्रमाणे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे संकपाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कार्यकर्ते व अधिकाऱ्यांत हमरीतुमरी झाली. काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.एकंदरीत पाटण तालुक्यातील मल्हारपेठवासीयांना आता गावकारभारी मिळण्याच्या आशा सध्याच्या स्थितीत तरी लांबल्या आहेत, असे दिसून येऊ लागले आहे. (वार्ताहर)