शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

महापुरामुळे मालदन शाळेचे ६५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:14 IST

ढेबेवाडी : मालदन (ता. पाटण) येथील वांग नदीकाठी असलेल्या माध्यमिक शाळेची इमारत पुराच्या पाण्यात जमीनदोस्त झाली. तर दुसऱ्या ईमारतीमध्ये ...

ढेबेवाडी : मालदन (ता. पाटण) येथील वांग नदीकाठी असलेल्या माध्यमिक शाळेची इमारत पुराच्या पाण्यात जमीनदोस्त झाली. तर दुसऱ्या ईमारतीमध्ये असलेले साठ वर्षांपूर्वीचे जुने दप्तर आणि साहित्याचे सुमारे ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. दुर्घटनेमुळे आता इमारतीच्या उभारणीबरोबरच शाळेतील साहित्य आणि रेकॉर्ड उपलब्ध करण्याचे आव्हान व्यवस्थापनासमोर ठाकले आहे.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल हे माध्यमिक विद्यालय मालदन येथे वांग नदीकाठी ६० वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करत आहे. या विभागात २३ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत हाहाकार माजवला. यामुळे विभागात मोठे नुकसान झाले. मालदन येथील या माध्यमिक विद्यालयाची एक इमारत जमीनदोस्त झाली तर दुसऱ्या इमारतीमधील शालोपयोगी साहित्य खराब झाले.

महसूल विभागाने याचा पंचनामा केला. त्यामध्ये संगणक दहा लाख सतरा हजार, ग्रंथालय ३६०० पुस्तके व साहित्य चार लाख तीन हजार, प्रयोगशाळा साहित्य पाच लाख ७७ हजार, कला कार्यानुभव व शारीरिक शिक्षण खोल्यांचे ३० लाख ९६ हजार, पोषण आहार खोली व स्वच्छतागृहे ५० हजार रुपये, टेबल खुर्च्या व वीज साहित्यांचे ४ लाख असे ६४ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी बी. आर. पाटील यांनी केला.

यावेळी सरपंच भीमराव गायकवाड, उपसरपंच संदीप पाटील, ग्रामसेवक अनिल जाधव, मुख्याध्यापक एस. पी. तोडसाम, आबासाहेब काळे उपस्थिती होती.

आता संस्थेनेही पुढाकार घ्यावा..

आतापर्यंत स्थानिक ग्रामस्थ आणि लोकसहभागातून या शाळेसाठी मदत करण्यात आली होती. आताही या अडचणीच्या काळात माजी विद्यार्थी यांनी आपापल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर शाळेसाठी मदतीचे आवाहन केले आहे. मात्र खूपच मोठे नुकसान झाल्याने संस्थेने मोठी जबाबदारी उचलण्याची गरज आहे. तरच येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल.

जुने रेकॉर्ड कसे मिळणार

साठ वर्षांपूर्वीचे संपूर्ण रेकॉर्डच भिजल्याने आणि तशी माहिती इतरत्र उपलब्ध नसल्याने ते पुन्हा मिळविण्याचे आव्हानच व्यवस्थापनासमोर आहे. तसेच शाळेतील इतर साहित्य आणि पुस्तके उपलब्ध करताना मोठी अडचण असल्याचे ही सांगण्यात आले.

फोटो ओळी

पाटण तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मालदन येथील शाळेची इमारत पाण्यात होती. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. (छाया : रवींद्र माने)