शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात उन्हाळी पीक क्षेत्रात घट; दीड हजार हेक्टरवरच झाली पेरणी

By नितीन काळेल | Updated: May 13, 2024 19:14 IST

दुष्काळाची झळ; खरीपसाठी पाऊस महत्वाचा 

सातारा : जिल्ह्यात दुष्काळ असल्याने यावर्षी उन्हाळी पिकाची हवाच गेली आहे. त्यामुळे सुमारे दीड हजार हेक्टरवरच पेरणी झाली. ३२.३० टक्के हे प्रमाण आहे. तर आता खरीप हंगामावरच शेतकऱ्यांची भीस्त असून सर्वांचेच मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लागले आहेत.जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्वाचे समजले जातात. यातील खरीप हा सर्वात मोठा हंगाम असतो. सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्र राहते. तर रब्बीत दोन लाख हेक्टरवर पेरणी होते. जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर खरीप हंगाम पेरणीची गडबड सुरू राहते. या मान्सूनवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे पिकांचे गणित अवलंबून असते. पर्जन्यमान चांगले झाले तर खरीप आणि रब्बी हंगामही पदरी पडतो. तसेच उन्हाळी हंगामातही शेतकरी पिके घेतो. पण, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरे पर्जन्यमान झाले. खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फटका बसला. उत्पादन कमी झाले. त्यातच दुष्काळी परिस्थितीही निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी हंगामावर परिणाम झाला.कृषी विभागाकडून सातारा जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ८६० हेक्टर निश्चीत करण्यात आले होते. यामध्ये उन्हाळी भुईमूग, मका, सूर्यफूल, सोयाबीन ही पिके शेतकरी घेतील असा अंदाज होता. मात्र, भुईमूग, मका, सोयाबीन पिके घेण्यात आली. सूर्यफुलाची कोठेही पेरणी झालेली नाही. त्यामुळे दुष्काळाच्या धसक्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले आहे.

भुईमूग ११२४ तर मका ४१३ हेक्टरवर..जिल्ह्यात उन्हाळ्यात २ हजार ६९९ हेक्टरवर भुईमूग घेण्यात येईल असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात १ हजार १२४ हेक्टरवर पेर झाली. ४१.६७ टक्के पेरणी प्रमाण आहे. तर मकाचे सर्वसाधारण क्षेत्र २ हजार ७४ हेक्टर होते. तर पेरणी ४१३ हेक्टरवर झाली. सुमारे २० टक्के क्षेत्रावरच मका पिकाची पेरणी झालेली आहे. सातारा तालुक्यात ३७२ हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र होते. पण, पेरणी १४१ हेक्टरवरच झालेली आहे. तसेच जावळीत ३२ हेक्टर, पाटण २०६ हेक्टर, कऱ्हाड तालुक्यात ९३, कोरेगाव ६४, खटाव ४५३, माण ४८ हेक्टर, खंडाळा ९३, फलटण १०३ आणि वाई तालुक्यात ३४ हेक्टरवर उन्हाळी पिके घेण्यात आलेली आहेत.

उन्हाळी सोयाबीन १६०० वरुन १४ हेक्टरवर..मागील तीन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला दर मिळाला. त्यामुळे खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढले. तसेच दोन वर्षांपूर्वी उन्हाळी सोयाबीन १ हजार ६०० हेक्टरवर घेण्यात आले होते. पण, गेल्या वर्षभरापासून सोयाबीनला दर कमी मिळत आहे. त्यातच दुष्काळी स्थिती असल्याने यंदा उन्हाळी सोयाबीन क्षेत्रात मोठी घट झाली आहे. सोयाबीनचे अंदाजे क्षेत्र ३१ हेक्टर निश्चीत करण्यात आलेले. प्रत्यक्षात १४ हेक्टरवर पेरणी झाल्याचे समोर आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र