शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

सातारा जिल्ह्यात उन्हाळी पीक क्षेत्रात घट; दीड हजार हेक्टरवरच झाली पेरणी

By नितीन काळेल | Updated: May 13, 2024 19:14 IST

दुष्काळाची झळ; खरीपसाठी पाऊस महत्वाचा 

सातारा : जिल्ह्यात दुष्काळ असल्याने यावर्षी उन्हाळी पिकाची हवाच गेली आहे. त्यामुळे सुमारे दीड हजार हेक्टरवरच पेरणी झाली. ३२.३० टक्के हे प्रमाण आहे. तर आता खरीप हंगामावरच शेतकऱ्यांची भीस्त असून सर्वांचेच मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लागले आहेत.जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्वाचे समजले जातात. यातील खरीप हा सर्वात मोठा हंगाम असतो. सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्र राहते. तर रब्बीत दोन लाख हेक्टरवर पेरणी होते. जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर खरीप हंगाम पेरणीची गडबड सुरू राहते. या मान्सूनवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे पिकांचे गणित अवलंबून असते. पर्जन्यमान चांगले झाले तर खरीप आणि रब्बी हंगामही पदरी पडतो. तसेच उन्हाळी हंगामातही शेतकरी पिके घेतो. पण, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरे पर्जन्यमान झाले. खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फटका बसला. उत्पादन कमी झाले. त्यातच दुष्काळी परिस्थितीही निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी हंगामावर परिणाम झाला.कृषी विभागाकडून सातारा जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ८६० हेक्टर निश्चीत करण्यात आले होते. यामध्ये उन्हाळी भुईमूग, मका, सूर्यफूल, सोयाबीन ही पिके शेतकरी घेतील असा अंदाज होता. मात्र, भुईमूग, मका, सोयाबीन पिके घेण्यात आली. सूर्यफुलाची कोठेही पेरणी झालेली नाही. त्यामुळे दुष्काळाच्या धसक्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले आहे.

भुईमूग ११२४ तर मका ४१३ हेक्टरवर..जिल्ह्यात उन्हाळ्यात २ हजार ६९९ हेक्टरवर भुईमूग घेण्यात येईल असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात १ हजार १२४ हेक्टरवर पेर झाली. ४१.६७ टक्के पेरणी प्रमाण आहे. तर मकाचे सर्वसाधारण क्षेत्र २ हजार ७४ हेक्टर होते. तर पेरणी ४१३ हेक्टरवर झाली. सुमारे २० टक्के क्षेत्रावरच मका पिकाची पेरणी झालेली आहे. सातारा तालुक्यात ३७२ हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र होते. पण, पेरणी १४१ हेक्टरवरच झालेली आहे. तसेच जावळीत ३२ हेक्टर, पाटण २०६ हेक्टर, कऱ्हाड तालुक्यात ९३, कोरेगाव ६४, खटाव ४५३, माण ४८ हेक्टर, खंडाळा ९३, फलटण १०३ आणि वाई तालुक्यात ३४ हेक्टरवर उन्हाळी पिके घेण्यात आलेली आहेत.

उन्हाळी सोयाबीन १६०० वरुन १४ हेक्टरवर..मागील तीन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला दर मिळाला. त्यामुळे खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढले. तसेच दोन वर्षांपूर्वी उन्हाळी सोयाबीन १ हजार ६०० हेक्टरवर घेण्यात आले होते. पण, गेल्या वर्षभरापासून सोयाबीनला दर कमी मिळत आहे. त्यातच दुष्काळी स्थिती असल्याने यंदा उन्हाळी सोयाबीन क्षेत्रात मोठी घट झाली आहे. सोयाबीनचे अंदाजे क्षेत्र ३१ हेक्टर निश्चीत करण्यात आलेले. प्रत्यक्षात १४ हेक्टरवर पेरणी झाल्याचे समोर आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र