शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

महायुतीत साताऱ्यावर ‘रिपाइं’चाच दावा; २०१४ला आमच्यासोबत गद्दारी झाली - अशोक गायकवाड 

By नितीन काळेल | Updated: March 7, 2024 18:43 IST

सातारा : राज्यात २०१४ मध्ये महायुतीचा जन्म झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ ‘रिपाइं’ला सोडण्यात आला होता. त्यावेळी आमच्यासोबत गद्दारी आणि ...

सातारा : राज्यात २०१४ मध्ये महायुतीचा जन्म झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ ‘रिपाइं’ला सोडण्यात आला होता. त्यावेळी आमच्यासोबत गद्दारी आणि बंडखोरी झाली होती. तरीही आम्ही ८३ हजार मते घेतली. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा आहे. नाहीतर आताच्या निवडणुकीत आम्हाला कोणी गृहित धरु नये,’ अशी स्पष्ट भूमिका ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जाहीर केली.सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी सर्वगोड, अण्णा वायदंडे, आप्पा तुपे, पूजा बनसोडे आदी उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, राज्यातील युतीत ’रिपाइं’चे रामदास आठवले आले आणि महायुतीचा जन्म झाला. या महायुतीमुळेच २०१४ ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याचवेळी सातारा मतदारसंघ महायुतीतून ‘रिपाइं’ला सोडण्यात आला होता. पण, निवडणुकीत आम्हाला वाऱ्यावर सोडले. असे असलेतरी आताही महायुतीतून या मतदारसंघावर आमचाच दावा आहे. उमेदवार कोण असणार हे पक्ष ठरवेल. पण, ही जागा ‘रिपाइं’ला मिळाली तरच युती धर्म राहणार आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत आम्हाला जागा न मिळाल्यास जशास तसे उत्तर देण्यासही आम्ही तयार आहोत. कारण, आम्ही नाराज आहोत. सन्मानाने घेतले तर सोबत राहू नाहीतर संबंधितांना जागाही दाखवून देवू.२०१४ च्या निवडणुकीत आम्हाला ८३ हजार मते मिळाली ती आमच्या पक्षाचीच होती. त्यामुळे आता एक लाख मते आमच्याकडे आहेत. याचा विचार करुन सातारा मतदारसंघ मिळावा. नाहीतर परिस्थिती पाहून पुढील विचार करु, असा इशाराही गायकवाड यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभा