शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

महायुतीत साताऱ्यावर ‘रिपाइं’चाच दावा; २०१४ला आमच्यासोबत गद्दारी झाली - अशोक गायकवाड 

By नितीन काळेल | Updated: March 7, 2024 18:43 IST

सातारा : राज्यात २०१४ मध्ये महायुतीचा जन्म झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ ‘रिपाइं’ला सोडण्यात आला होता. त्यावेळी आमच्यासोबत गद्दारी आणि ...

सातारा : राज्यात २०१४ मध्ये महायुतीचा जन्म झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ ‘रिपाइं’ला सोडण्यात आला होता. त्यावेळी आमच्यासोबत गद्दारी आणि बंडखोरी झाली होती. तरीही आम्ही ८३ हजार मते घेतली. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा आहे. नाहीतर आताच्या निवडणुकीत आम्हाला कोणी गृहित धरु नये,’ अशी स्पष्ट भूमिका ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जाहीर केली.सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी सर्वगोड, अण्णा वायदंडे, आप्पा तुपे, पूजा बनसोडे आदी उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, राज्यातील युतीत ’रिपाइं’चे रामदास आठवले आले आणि महायुतीचा जन्म झाला. या महायुतीमुळेच २०१४ ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याचवेळी सातारा मतदारसंघ महायुतीतून ‘रिपाइं’ला सोडण्यात आला होता. पण, निवडणुकीत आम्हाला वाऱ्यावर सोडले. असे असलेतरी आताही महायुतीतून या मतदारसंघावर आमचाच दावा आहे. उमेदवार कोण असणार हे पक्ष ठरवेल. पण, ही जागा ‘रिपाइं’ला मिळाली तरच युती धर्म राहणार आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत आम्हाला जागा न मिळाल्यास जशास तसे उत्तर देण्यासही आम्ही तयार आहोत. कारण, आम्ही नाराज आहोत. सन्मानाने घेतले तर सोबत राहू नाहीतर संबंधितांना जागाही दाखवून देवू.२०१४ च्या निवडणुकीत आम्हाला ८३ हजार मते मिळाली ती आमच्या पक्षाचीच होती. त्यामुळे आता एक लाख मते आमच्याकडे आहेत. याचा विचार करुन सातारा मतदारसंघ मिळावा. नाहीतर परिस्थिती पाहून पुढील विचार करु, असा इशाराही गायकवाड यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभा