शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: उद्या ते मुंबईवरही दावा करतील - पृथ्वीराज चव्हाण

By प्रमोद सुकरे | Updated: November 23, 2022 17:56 IST

गुजरातमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये मोठी बंडखोरी

कऱ्हाड : राज्याच्या दिशा बदलण्याचा अधिकार केंद्राच्या सभागृहाला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सिमाप्रश्नाबाबत न्यायालयात दावे-प्रतिदावे आहेत. त्यामुळे सध्या कोण काय म्हणतय, याला महत्व नाही. महाराष्ट्राच्या सिमा निश्चितीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारा लढा आम्ही ताकदीनिशी लढू, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री व सिमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे सदस्य आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, अशोकराव पाटील, इंद्रजीत गुजर, प्रदीप जाधव, फारुख पटवेकर, इंद्रजीत चव्हाण, नितीन थोरात, अ‍ॅड. नरेंद्र पाटील, शिवाजीराव मोहिते, झाकीर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कर्नाटक, महाराष्ट्र सिमाप्रश्न उच्चाधिकार समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यात न्यायीक लढाई कशी लढायची, याच्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर सिमाभागातील लोकांच्यावर जो अन्याय चालला आहे, त्याबाबत काय करायचे, याच्यावर चर्चा होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचे ठरले आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा सांगत आहेत, याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, उद्या ते मुंबईवरही दावा करतील. मात्र, ही न्यायीक लढाई  आहे. महाराष्ट्राने याबाबत २००४ साली सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर त्यावर २०१४ मध्ये कर्नाटकने पुन्हा नवा दावा दाखल केले आहे. कर्नाटकने केलेल्या दाव्यामध्ये सिमाप्रश्नाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्राच्या पार्लमेंटला आहे, असे म्हटले आहे.  त्यामुळे २०१४ च्या दाव्याचा निकाल लागल्याशिवाय मुळच्या दाव्यावर विचार होऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. मात्र, आमची समिती न्यायालयीन लढाई पुर्ण ताकदीने लढेल.गुजरात निवडणुकीच्या संदर्भाने बोलताना ते म्हणाले, गुजरातमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये मोठी बंडखोरी आहे. आप तेथे मोठ्या प्रमाणात उतरला असला तरी तेथे खरी लढत ही काँग्रेस व भाजपमध्येच आहे. भाजपची तेथे सलग २७ वर्ष सत्ता आहे. ती बदलण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

भाजपने खरा शोध घेऊन उत्तरे द्यावीतराहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, इतिहास पुरूषांकडे ऐतिहासीक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. त्यांच्या दोन्ही बाजु तपासल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सावरकरांना माफीवीर असे म्हटले. त्यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी पुरावा मागीतल्यावर त्याचा त्यांनी पुरावाही दिला. आता त्यावर नाहक चर्चा न करता भाजपने खरा शोध घेऊन त्याची उत्तरे द्यावीत... अन् बाबांनी कोपरापासून हाथ जोडले!राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण यांनी कोपरापासून हाथ जोडले. राज्यपाल कोश्यारी हे मुद्दाम वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. त्यांना पुन्हा हिमाचलमध्ये मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशी वक्तव्ये केल्यानंतर ते परत पाठवतील, असे त्यांना वाटत असावे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची मुख्यमंत्री करणार उद्घाटनेशुक्रवार, दि. २५ रोजी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कºहाडात येत आहेत. त्यावेळी मी मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या विकासकामांमधील नवीन प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण, नविन विश्रामगृहाचे उद्घाटन यासह कृष्णा नदीवरील पाचवडेश्वर ते कोडोली व रेठरे नवीन पुलाचे भुमीपुजन त्यांच्या हस्ते आयोजीत केले असल्याची माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण