शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Maharashtra Election2019 : गड-किल्ल्यांवर बार उघडायच्या विचारापेक्षा मेलेलं बरं- उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 17:44 IST

गड-किल्ल्यांबाबत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला...

वाई : ‘गड-किल्ल्यांबाबत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, निवडणुका आल्या की चारित्र्यहनन करणं हे आता किळसवाणं झालं आहे. त्याचबरोबर गड-किल्ल्यांवर डान्सबार, बार उघडा असे म्हणण्याचा विचार मनात येण्यापेक्षा मेलेलं बरं,’ असे भावनिक उद्गार माजी खासदार व सातारा लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी काढले.  वाई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उदयनराजे म्हणाले, ‘गड, किल्ले ही छत्रपती शिवरायांची आठवण व पराक्रमाची प्रतीके आहेत. या गड-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, असे माझे म्हणणे आहे. याबाबत राज्य शासनानेही नियोजन केलंय. गड, किल्ल्याबाबत मी जे वक्तव्य केलेच नाही, त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा काहींकडून प्रयत्न होत आहे. गड, किल्ले पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून, लोकांना किल्ल्यावर जाता यावे, राहण्याची व्यवस्था असावी, यासाठी त्याठिकाणी काही आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने भूमिका मांडली. या भूमिकेनुसार गड, किल्ल्यांवर निवासाची सोय, पायथ्याशी राहण्याची व्यवस्था असावी. गडावर जाण्यासाठी रोपवे असावा, अशी भूमिका मी मांडली होती. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मी जे बोललो ते बोललो; मात्र मी जे बोललोच नाही, त्याचे खापर माझ्यावर फोडले जात आहे.’‘चुकीचे खापर माझ्यावर फुटणार असेल तर हे बरोबर नाही. ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी झाल्यास पर्यटनवाढीस चालना मिळून रोजगारनिर्मिती होणार आहे. मी संकुचित बुद्धीचा नसून निवडणूक आली की माझ्या चारित्र्यहननाचा काहीजणांकडून कट शिजवला जातो,’ असा आरोपही उदयनराजेंनी या पत्रकार परिषदेत केला.----------------------जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडणार असून, विकासात कुठेही कमी पडणार नाही. विरोधकांनीही जिल्ह्यासाठी काय केले ते सांगावे. निवडणुकीच्या काळात माझ्या चारित्र्यहननाचा काहीजणांकडून कट शिजवला जात आहे.  - उदयनराजे भोसले

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019