शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी ७६ जागा लढविणार :लक्ष्मण माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 13:47 IST

सातारा : काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून आम्हाला जुळवून घेण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ७६ ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी ७६ जागा लढविणार :लक्ष्मण माने खटावमधील पारधी समाजातील महिलेला उमेदवारी

सातारा : काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून आम्हाला जुळवून घेण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ७६ जागा लढविणार आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील खटावमधील पारधी समाजातील महिलेला उमेदवारी देणार असल्याची माहिती आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.माने म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने आमची फसवणूक केली. केवळ दोन महिने आम्हाला झुलवत ठेवले. सोबत घ्यायचे नव्हते तर तेव्हाच सांगायचे ना. आमच्या आघाडीत सर्वसामान्य व गरीब लोक असल्यामुळे आम्हाला तिकीट देऊन उपयोग काय? असे प्रश्न आम्हाला केले जात होते. मात्र, घटनेने आम्हाला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार दिला आहे.

निवडून येऊ अथवा न येऊ, हे वंचित आघाडीचे धोरण असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ७६ ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जाणार आहेत. तसेच भाजप सरकारचा या निवडणुकीत पराभव करणे, हाच आमचा उद्देश आहे, असेही यावेळी लक्ष्मण माने यांनी सांगितले.

टॅग्स :laxman maneलक्ष्मण मानेSatara areaसातारा परिसर