शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

महाबळेश्वरात पर्यटकांसाठी ‘डॉल्बी बंदी’चा एल्गार!

By admin | Updated: June 5, 2015 00:16 IST

उज्ज्वला तोष्णिवाल : पर्यावरणाच्या रक्षणासाठी लवकरच बैठका

सातारा : महाबळेश्वर तालुक्याचा समावेश ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये होतो. शहरालगत असलेल्या घनदाट जंगलात अनेक प्राणी वास्तव्यास आहेत. त्यामुळेच महाबळेश्वरचा पर्यटन व्यावसाय बहरला. मात्र, उत्सवात वाजविल्या जात असलेल्या कर्णकर्कश डॉल्बीमुळे प्राणीजीवन विचलित होते. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचतो. तसेच येथे जगभरातून येणारे पर्यटकही विचलित होत असतात. यासंदर्भात ‘लवकरच प्रशासनाच्या विविध विभागांची बैठक घेऊन महाबळेश्वर पालिका हद्दीत डॉल्बीला बंदी आणली जाईल,’ अशी भूमिका नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.लग्न समारंभ, उत्सवात लावल्या जात असलेल्या डॉल्बीमुळे अनेकांचा बळी जात आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘आव्वाज गावाचा... नाय डॉल्बी’चा ही मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये जिल्ह्यातील अनेक गावे उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. याच मोहिमेत महाबळेश्वर पालिकाही सहभागी होणार आहे, असा विश्वास नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरुन दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. महाबळेश्वर शहरात पालिका असली तरी भौगोलिक व्याप्ती छोटी आहे. त्यातच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाबरोबरच लग्न समारंभात डॉल्बी लावण्यावर तरुणाईचा भर असतो. महाबळेश्वर शहर नावाने मोठे असले तरी कमी जागेत ते वसलेले आहे. त्यातच एकाच ठिकाणी तासन्तास डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकत असते. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असते.शहराचे खरे आर्थिक स्त्रोत हे पर्यटन व्यावसाय आहे. जगभरातून दरवर्षी शेकडो पर्यटक भेट देत असतात. डॉल्बीच्या गोंगाटाचा या पर्यटकांना त्रास होत असतो. त्याचप्रमाणे शहरातील बाजारपेठेत असलेल्या दुकानातील काचा फुटण्याचेही प्रकार घडले आहेत. याचा सर्वाधिक त्रास हृदयरोग असलेल्या रुग्णांना बसायला लागला आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्येही डॉल्बीबंदी असावी असे रहिवाशांचे म्हणणे होते. यासंदर्भात महाबळेश्वर पालिकेने यापूर्वी प्रयत्न केले होते. गणेशोत्सव आढावा बैठकीत डॉल्बीला बंदी घालण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. मात्र, त्यावेळी प्रशासन अन् नागरिकांतून सकारात्मक पाठबळ मिळाले नव्हते. यावेळी प्रशासनाच्या सर्वच विभागांची मदत घेऊन तरुणांमध्ये प्रबोधन करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा तोष्णिवाल यांनी दिली. पर्यटकवृद्धीसाठी पर्यटकांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. बाहेरील पर्यटकांना शहराची माहिती नसते. त्या काळात चौकात तासनतास डॉल्बीमुळे वाहतुकीची कोंडी झाल्यास ते हतबल होतात. अन् पुन्हा येतात विचार करतात. त्यामुळे पर्यटक दुरावल्यास येथील पर्यटन उद्योग मोडकळीस येऊ शकतो. त्यामुळे महाबळेश्वर पालिकेने डॉल्बीला विरोध करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आव्वाज गावाचा.....नाय डॉल्बीचा !ऐन गर्दीच्या हंगामात वाहतुकीचे वांदेमहाबळेश्वरला दर उन्हाळ्यात लाखो पर्यटक जगभरातून येत असतात. मात्र, त्याच काळात लग्न तिथी असतात. त्याचप्रमाणे उन्हाळा सुटी, गणेशोत्सव सुटीत पर्यटक फिरण्यासाठी येतात अन् महाबळेश्वरची तरुणाई उत्साहात डॉल्बी लावून आनंद साजरा करते. त्यामुळे पर्यटकांना त्रास होतो. पर्यटक दुरावणे महाबळेश्वरबरोबरच सातारा जिल्ह्यालाही परवडणारे नाही. महाबळेश्वरची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून असल्याने या मुद्द्यावर भर देऊन डॉल्बीबंदीसाठी प्रबोधन केला जाणार आहे. उत्सवात वाद्य वाजविण्यास, आनंद साजरा करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र आपला आनंद साजरा करत असताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. डॉल्बी लावली तरी आवाजावर मर्यादा असणे गरजेचे आहे, मात्र तसे होत नाही. त्यामुळे कडक पावले उचलावी लागणार आहेत. - उज्ज्वला तोष्णिवाल, नगराध्यक्षा