शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जनमताचा आदर करत मदनदादांनी भाजपमध्ये यावे : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:38 IST

‘मदनदादांना कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये घ्यायचे आहे, या मानसिकतेने आलो नाही. ते नेहमी जनतेच्या विचाराने चालले आहेत. जनतेला काय पाहिजे ते करत आहेत. मी काही

ठळक मुद्देखंडाळ्यातील कार्यक्रमात जाहीर निमंत्रण

खंडाळा : ‘मदनदादांना कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये घ्यायचे आहे, या मानसिकतेने आलो नाही. ते नेहमी जनतेच्या विचाराने चालले आहेत. जनतेला काय पाहिजे ते करत आहेत. मी काही म्हणणार नाही, याचा जनताच उचित निर्णय घेईल. विधानसभेत तुमच्या विचारांची गरज आहे. विधानसभेत एकत्र काम करू. त्यामुळे जनतेचा आवाज ऐकून मदनदादांनी भाजपमध्ये यावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी केले.

खंडाळा येथील किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योग खंडाळा-म्हावशी या साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन, श्रीगणेश मंदिराचे भूमिपूजन व भव्य शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाषराव देशमुख, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, किसनवीर साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले, व्हाईस चेअरमन गजानन बाबर, खंडाळा साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव गाढवे, व्हाईस चेअरमन व्ही. जी. पवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘साखर उद्योग राज्याचा महत्त्वाचा उद्योग आहे. कारखान्यातून शेतकऱ्यांना स्थैर्य लाभते; पण उसाचे भाव आपण ठरवत असलो तरी साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ठरत असल्याने अडचणी येतात. साखरेची आधारभूत किंमत देण्याचा केंद्राने निर्णय घेतला असल्यानेच गतवर्षी ९९ टक्के एफआरपी राज्यात दिली. इथेनॉल प्रकल्प उभे राहिले तर अर्थकारण उभे राहील. शेतकºयांना अधिक दर देता येईल. पेट्रोल, डिझेलसाठी बाहेर जाणारा खर्च वाचेल. देशाचे परकीय चलन वाढेल. इथेनॉल प्रकल्पासह कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’

यावेळी चंद्र्रकांत पाटील, सुभाषराव देशमुख यांची भाषणे झाली. मदन भोसले यांनी प्रास्ताविक केले. गजानन बाबर यांनी आभार मानले. यावेळी राज्य सहकारी बँकेचे अविनाश महागावकर, अनिल जाधव, विक्रम पावसकर, नगराध्यक्षा लक्ष्मी कºहाडकर, रोहिणी शिंदे, दीपक पवार, आनंदराव शेळके यांच्यासह कार्यकारी संचालक, शेतकरी उपस्थित होते.... आता निर्णय घ्या : देशमुखमदन भोसले यांनी सरकारला शुभेच्छा दिल्यानंतर मंत्री सुभाष देशमुख यांनी जनसमुदायाला ‘दादा भाजपात यावेत, असे वाटते का? ते या मतदारसंघातून विधानसभेत जावेत,’ असे कोणाकोणाला वाटते? असे विचारले. यावेळी उपस्थित सर्वांनीच हात उंचावून सहमती दर्शवली. तर काहींनी उभे राहून घोषणा देऊन होकार कळवला. त्यानंतर ‘आता कार्यकर्त्यांची अन् लोकांचीही इच्छा आहे. मी अनेकदा आपल्याकडे आलो, आता जनतेची भावना ओळखून निर्णय घ्या,’ असे आवाहन मंत्री देशमुख यांनी केले.विधानसभेत मदनदादांची गरजमदन भोसले यांनी केवळ राजकारण केले नाही तर जनतेच्या समस्या सोडवल्या. त्यांचे प्रश्न तळमळीने मांडल्या. अशी तळमळीची माणसे विधानसभेत दिसली नाहीत की दु:ख होतं. तुमच्यासारखी माणसे विधानसभेत असली पाहिजेत की, जी जनतेचा विचार तेथे मांडतात. तुम्ही उर्वरित काळासाठी मला शुभेच्छा दिल्या; पण त्या पुढील काळासाठीही हव्या आहेत. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्या एकत्रित शुभेच्छा विधानसभेत जातील,’ असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण