शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

धबधब्याच्या माहितीसाठी यंत्रणा सज्ज -रवींद्र मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:14 IST

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद : स्थानिकांना रोजगार मिळवून देणे, जंगलाचे संरक्षण करणे, नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविणे, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणे आदी कामे करण्यात येणार आहेत. - रवींद्र मोरे, पर्यटन प्रमुख, सह्याद्री पठार विभाग विकास संघ.

प्रशांत कोळी ।पावसाळ्यात मुख्य आकर्षण असणारा भांबवली धबधबा पाहण्यासाठी तसेच आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक भेट देत असतात. गर्द जंगलातून धबधब्याकडे जाण्यासाठी व परिसराची माहिती देण्यासाठी यंत्रणा, हंगामात किती पर्यटक येतात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजना याबाबत भांबवली येथील पर्यटन प्रमुख, सह्याद्री पठार विभाग विकास संघाचे रवींद्र मोरे यांच्याशी केलेली बातचित..

प्रश्न : वजराई धबधबा पाहण्यासाठी किती पर्यटक येतात?उत्तर : भांबवली-वजराई धबधबा पाहायला दरवर्षी अंदाजे एक लाख पर्यटक येतात. पर्यटक मुख्यत्वेकरून महाराष्ट्र, गुजरात व दक्षिणेकडील राज्यातील असतात. तुरळक पर्यटक हे उत्तर भारतीय असतात. 

प्रश्न : यंदापासून शुल्क आकारत आहे, कारण काय?उत्तर : जिल्हा नियोजन समितीने भांबवली वजराई धबधब्याला ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा ५ जानेवारी २०१८ रोजी दिला. धबधबा विकसित करण्यासाठी वन पर्यटनाअंतर्गत आर्थिक तरतूद केली आहे. सुविधा शासनाच्या मदतीने दिल्या आहेत. 

प्रश्न : पर्यटकांसाठी काही सुविधा दिल्या आहेत का?उत्तर : ठोसेघरच्या धरतीवर प्रेक्षागॅलरी बनविण्यात येणार आहे. ही प्रेक्षागॅलरी धबधब्या समोर उभारली जाणार असल्याने धबधब्याच्या रौद्ररुपाचे थ्रिलिंग अनुभवता येईल. पर्यटकांना बसण्यासाठी पॅगोडा, उरमोडी दर्शन व जंगल दर्शनासाठी दोन टॉवर, पाण्याचे एटीएम, जंगलातून चालण्यासाठी दगडी पायऱ्या, झाडांभोवती कट्टे, रॉक गार्डन, स्वागत कमान आदी सुविधा देणार आहेत. 

प्रश्न : धबधबा आणि परिसराची माहिती देण्यासाठी यंत्रणा राबविली का?उत्तर : पर्यटन शुल्क वसुलीचे पहिलेच वर्ष आहे. ‘भांबवली हिल स्टेशन’ ही पर्यटन पुस्तिका धबधबा व इतर स्थळांची माहिती देणारी यंत्रणा राबविली जात आहे.जगातील सर्वात उंच धबधबाभांबवली वजराई धबधबा तीन टप्प्यांत कोसळतो. वरच्या टप्प्याची उंची २५२ मीटर एवढी आहे व तिन्ही टप्प्यांची उंची ५५६ मीटर आहे. म्हणजेच १८४० फूट. तिन्ही टप्प्यांची उंची मोजली तर देशातला नंबर एकचा धबधबा ठरतो. मुख्य म्हणजे हे तिन्ही टप्पे एकाच दगडात आहेत, त्यामुळे तिन्ही टप्प्यांची उंची एकत्र करणे योग्य आहे. 

पर्यटकांसाठी आकर्षक स्थानेभांबवलीत निसर्गाने उधळण केली आहे. जगातील सर्वात मोठे भांबवली पुष्प पठार भांबवलीतच आहे. फक्त दसºयाच्या दिवशी या पठारावर विविधरंगी खेकडी बागडताना दिसतात. पांडवांच्या पायाचे ठसे या पठारावर पाहायला मिळतात. भांबवलीतील अखंड दगडात असलेले हनुमान मंदिर हे जागृतस्थान आहे. वजराई देवीचे मूळ स्थानक भांबवलीतच आहे. येथे नेहमीच गर्दी असते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस