शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

बियाण्यांसाठी ७४५ अर्जामधील १८१ शेतकºयांचे नशीब उजळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST

सातारा : शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. यामध्ये बियाण्यांसाठी जिल्ह्यातील ७४५ शेतकऱ्यांनी अर्ज केले ...

सातारा : शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. यामध्ये बियाण्यांसाठी जिल्ह्यातील ७४५ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १८१ जणांनाच प्रमाणित अनुदानित बियाणे मिळणार आहेत. यामध्ये खटाव तालुक्यातील सर्वाधिक ५१ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. २५ मेपर्यंत बियाणे, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, फलोत्पादन आदींसाठी जिल्ह्यातील ३९ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. यातील ७४५ शेतकऱ्यांनी प्रमाणित अनुदानित बियाण्यांसाठी अर्ज भरले होते. त्यानंतर आॅनलॉईन पध्दतीने सोडत झाली. यामध्ये १८१ शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळणार आहेत.

या वर्षी कडधान्य बियाणे २५ व ५० रुपये प्रतिकिलो, संकरित मका व बाजरी १०० रुपये प्रतिकिलो, ज्वारी व बाजरी ३० व १५ रुपये प्रतिकिलो, सोयाबीन १२ रुपये किलो या दराने बियाणे मिळणार आहे. एका शेतकऱ्याला २ हेक्टरपर्यंत लाभ मिळणार आहे.

दरम्यान, शासनाने या वर्षी पोर्टल सुरू केले असून, अनेक शेतकऱ्यांना याची माहितीही नाही. तसेच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अर्जही भरता आले नाहीत. त्यामुळे बियाण्यांसाठी अर्ज कमी आल्याचे सांगण्यात येत आहे.

चौकट :

अनुदानित बियाण्यांसाठी आलेले अर्ज ७४५

लॉटरी किती जणांना १८१

.................

चौकट :

तालुकानिहाय लाभार्थी संख्या

फलटण २१

कऱ्हाड १२

महाबळेश्वर १०

जावळी १६

खंडाळा १०

पाटण ३२

माण २६

खटाव ५१

.............

अर्ज करण्याची माहितीच नाही...

शासनाकडून अनुदानित बियाणे मिळतात. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो, याची माहिती नव्हती. त्यामुळे अर्ज करताच आला नाही. अनुदानित बियाण्यांबाबत ग्रामीण भागात जागृती होण्याची आणखी आवश्यकता आहे. तरच अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळेल.

- प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी

............................................

माॅन्सूनपूर्व पाऊस होत आहे. तरीही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. खरीप हंगामातील बियाण्यांसाठी शासनाच्या पोर्टलवर अर्ज केला होता. पण, अजून त्याबद्दल काही मेसेज आलेला नाही. त्यामुळे अनुदानावर बियाणे मिळणार का, याविषयी काही सांगता येत नाही.

- रामचंद्र पाटील, शेतकरी

.................................

खरीप हंगामासाठी पूर्वी तालुकास्तरावर बियाणे मिळत होते. आता पोर्टलवर अर्ज करावा लागतो. याबाबत मला उशिरा समजले. पण, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बाहेर जाऊन अर्ज करता आला नाही. त्यामुळे बियाणे बाहेरूनच विकत घ्यावे लागणार आहेत.

- किरण काळे, शेतकरी

............................................................