शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

पश्चिमेला पावसाचा जोर कमी; कोयना धरणातून विसर्ग सुरूच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर मंगळवारपासून जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर मंगळवारपासून जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे; तर कोयेनेचे दरवाजे सवा पाच फुटांवर स्थिर असून, धरणातून एकूण ४८६२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्याच्या मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यापूर्वी एक महिना पावसाची दडी होती. अपवाद वगळता पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला; तर पूर्वेकडे पावसाची उघडीप होती. आता मागील काही दिवसांपासून पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तसेच पश्चिम भागातील प्रमुख धरणांत वेगाने साठा वाढला. यामुळे वर्षभराची चिंता मिटली आहे. असे असले तरी मंगळवारपासून पाऊस कमी झाला आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर जूनपासून ४१८८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. नवजाला ३२ आणि यावर्षी आतापर्यंत ५४९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ५३ आणि जूनपासून ५५५८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४८६२० क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती, तर धरणातून एकूण ४८६२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पायथा वीजगृहातून २१०० आणि सहा दरवाजांतून ४६५२० असा एकूण ४८६२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणातून सोडण्यात येणारे पाणी कोयना नदीत जात आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली आहे.

चौकट :

धोम, कण्हेरमधून विसर्ग सुरू...

पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. धोम धरणात ९८.८० टक्के पाणीसाठा झाला आहे. कण्हेरमध्ये ९९.३९, कोयना ९८.६७, उरमोडी ९१.१२, बलकवडी ९९.३९ आणि तारळी धरणात ९४.२८ टक्के पाणीसाठा आहे. त्याचबरोबर सध्या धोममधून ३७५, कण्हेर १४६३, बलकवडी ११६३ आणि तारळी धरणातून ६८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

..........................................................