शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी; वीजगृहातील विसर्गही बंद

By नितीन काळेल | Updated: August 8, 2024 18:38 IST

धरण भरण्यासाठी वेळ लागणार; नवजाला ५६ मिलिमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ८७ टीएमसीवर साठा झाला होता. धरण भरण्यासाठी अजून १८ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर २४ तासांत नवजाला ५६ मिलिमीटरची नोंद झाली आहे.जिल्ह्यात जुलै महिन्यात सर्वत्रच धुवाधार पाऊस पडला. यामुळे पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाणी प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. पण, आॅगस्ट महिना उजाडल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत गेले आहे. सध्या पश्चिम भागातच पावसाची उघडझाप सुरू आहे. तर पूर्व माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात उघडीप आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. तरीही पश्चिम भागात अजून पावसाची आवश्यकता आहे. तरच धरणे भरणार आहेत.गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत काेयनानगर येथे ३० मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे ५६ आणि महाबळेश्वरला ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे ४ हजार ९६६ मिलिमीटर झाले आहे. यानंतर महाबळेश्वरला ४ हजार ६९८ आणि कोयनानगर येथे ४ हजार २२० मिलिमीटर पाऊस झाला. पाऊस कमी झाल्याने धरणातही पाण्याची आवक कमी होत आहे.गुरूवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ८ हजार १३५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८७.३० टीएमसी झालेला. धरणातील पाणीसाठा ८२.९५ टक्के झाला आहे. तर धरण भरण्यासाठी अजून सुमारे १८ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यातच धरणात पाण्याची आवक कमी असल्याने गुरूवारी सकाळपासून पायथा वीजगृहातील २ हजार १०० क्यूसेक विसर्गही थांबविण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण