शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विजा लागल्या कोसळू; दोन महिन्यांत दोघे ठार; नऊ जनावरेही मृत 

By नितीन काळेल | Updated: May 15, 2024 20:16 IST

जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस होतो. याच काळात मेघगर्जना होते. तसेच आकाशात विजाही चमकतात. त्यामुळे अनेकवेळा वीज जमिनीवरही पडते. यामध्ये लोकांचा तसेच पशुधनाचाही जीव जातो.

सातारा : जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वळवाचा पाऊस होत असून विजांचा कडकडाटही सुरू झाला आहे. त्यामुळे विजा कोसळू लागल्या आहेत. मागील दोन महिन्यात जिल्ह्यात विजा पडून दोघांचा मृत्यू तर ९ जनावरेही ठार झाली आहेत. तसेच झाडांवरही वीज कोसळली आहे. यामुळे सध्याच्या काळात वीजा कडाडत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस होतो. याच काळात मेघगर्जना होते. तसेच आकाशात विजाही चमकतात. त्यामुळे अनेकवेळा वीज जमिनीवरही पडते. यामध्ये लोकांचा तसेच पशुधनाचाही जीव जातो. तर मे महिन्यात वळवाचा पाऊस होत असताना नुकसानच अधिक घडते. कारण, जोरदार वारे सुटते. तसेच विजा कोसळण्याचे प्रमाण अधिक राहते. त्यामुळे जीवीतहानीही अधिक होते. त्यामुळे मे ते जून दरम्यानच्या काळाततरी विजांपासून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते.

सातारा जिल्ह्याचा विचार करता मागील दोन महिन्यात वीज कोसळून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. ३० मार्च रोजी जावळी तालुक्यात ३४ वर्षीय शेतकऱ्याचा वीज अंगावर पडून मृत्यू झालेला. संबंधित शेतकरी शेतात ज्वारी काढत होता. तर चार दिवसांपूर्वी फलटण तालुक्यात वीज कोसळल्याने तरुण ठार झाला. संबंधित तरुण इलेक्ट्रीक दुचाकीवरुन दोघा मित्रांसोबत जात होता. त्याचबरोबर वाई तालुक्यातील किकली येथे वीज पडून एक गाय ठार झाली होती. तर सातारा तालुक्यातील सांडवली येथे वीज कोसळून चार गायी आणि एक बैल ठार झाला. ही सर्व जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली होती. नुकतीच ही घटना घडली आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्यात माण तालुक्यात विजेच्या आवाजाने तीन जनावरे मृत झाली होती. आता येथून पुढेही वीजा कोसळण्याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह पशुधनाचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

अशी मिळते मदत...- वीज कोसळून व्यक्तीचा मृत्यू झाल्यास चार लाख रुपये

- मोठ्या मृत जनावरांसाठी ३० हजार रुपये- मृत शेळी-मेंढीसाठी ४ हजार रुपये

- व्यक्ती जखमी झाल्यासही मदतीची तरतूद आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यू