शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

विजा लागल्या कोसळू; दोन महिन्यांत दोघे ठार; नऊ जनावरेही मृत 

By नितीन काळेल | Updated: May 15, 2024 20:16 IST

जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस होतो. याच काळात मेघगर्जना होते. तसेच आकाशात विजाही चमकतात. त्यामुळे अनेकवेळा वीज जमिनीवरही पडते. यामध्ये लोकांचा तसेच पशुधनाचाही जीव जातो.

सातारा : जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वळवाचा पाऊस होत असून विजांचा कडकडाटही सुरू झाला आहे. त्यामुळे विजा कोसळू लागल्या आहेत. मागील दोन महिन्यात जिल्ह्यात विजा पडून दोघांचा मृत्यू तर ९ जनावरेही ठार झाली आहेत. तसेच झाडांवरही वीज कोसळली आहे. यामुळे सध्याच्या काळात वीजा कडाडत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस होतो. याच काळात मेघगर्जना होते. तसेच आकाशात विजाही चमकतात. त्यामुळे अनेकवेळा वीज जमिनीवरही पडते. यामध्ये लोकांचा तसेच पशुधनाचाही जीव जातो. तर मे महिन्यात वळवाचा पाऊस होत असताना नुकसानच अधिक घडते. कारण, जोरदार वारे सुटते. तसेच विजा कोसळण्याचे प्रमाण अधिक राहते. त्यामुळे जीवीतहानीही अधिक होते. त्यामुळे मे ते जून दरम्यानच्या काळाततरी विजांपासून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते.

सातारा जिल्ह्याचा विचार करता मागील दोन महिन्यात वीज कोसळून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. ३० मार्च रोजी जावळी तालुक्यात ३४ वर्षीय शेतकऱ्याचा वीज अंगावर पडून मृत्यू झालेला. संबंधित शेतकरी शेतात ज्वारी काढत होता. तर चार दिवसांपूर्वी फलटण तालुक्यात वीज कोसळल्याने तरुण ठार झाला. संबंधित तरुण इलेक्ट्रीक दुचाकीवरुन दोघा मित्रांसोबत जात होता. त्याचबरोबर वाई तालुक्यातील किकली येथे वीज पडून एक गाय ठार झाली होती. तर सातारा तालुक्यातील सांडवली येथे वीज कोसळून चार गायी आणि एक बैल ठार झाला. ही सर्व जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली होती. नुकतीच ही घटना घडली आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्यात माण तालुक्यात विजेच्या आवाजाने तीन जनावरे मृत झाली होती. आता येथून पुढेही वीजा कोसळण्याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह पशुधनाचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

अशी मिळते मदत...- वीज कोसळून व्यक्तीचा मृत्यू झाल्यास चार लाख रुपये

- मोठ्या मृत जनावरांसाठी ३० हजार रुपये- मृत शेळी-मेंढीसाठी ४ हजार रुपये

- व्यक्ती जखमी झाल्यासही मदतीची तरतूद आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यू