शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सत्तर फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान, रेस्क्यू टीमची तीन तास मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:41 IST

तब्बल तीन तासाच्या अथक् प्रयत्नानंतर कोल्ह्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात आले व तातडीने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथे सत्तर फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन विभागाच्या वन्यप्राणी रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढून जीवदान दिले. अखेर तीन तास केलेले अथक् प्रयत्न फळाला आले.आर्वी येथील धनाजी जाधव यांच्या शेतात सोनार वस्तीजवळ विहीर आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास धनाजी जाधव विहिरीवर गेले असता, त्यांना विहिरीमधील सिमेंटच्या जईवर कोल्हा बसलेला दिसला. विहीर सत्तर फूट खोल आणि पायऱ्या असल्यामुळे कोल्ह्याला वाचवायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला. काही वेळानंतर ही माहिती गावात पसरली आणि सायंकाळी रहिमतपूरचे वनपाल अनिल देशमुख यांना विहिरीत कोल्हा पडल्याची माहिती गावातील एकाने दूरध्वनीवरून दिली. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती कोरेगावचे वनक्षेत्रपाल घार्गे यांना दिली.त्यानंतर काही वेळातच वनपाल अनिल देशमुख, वनरक्षक संतोष काळे यांच्याबरोबरच कोरेगाव येथील वन्यप्राणी रेस्क्यू टीममधील वनरक्षक संतोष लोखंडे, विजय नरळे, अमर जाधव घटनास्थळी हजर झाले. त्यावेळी रात्र झाल्यामुळे विहिरीतील कोल्ह्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. या अडचणीच्या काळात आर्वीतील कुमार मदने व संतोष बंडलकर या धाडसी युवकांनी वन्यप्राणी रेस्क्यू टीममधील सदस्यांबरोबर वाघरीच्या साहाय्याने विहिरीतून कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली. तब्बल तीन तासाच्या अथक् प्रयत्नानंतर कोल्ह्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात आले व तातडीने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

विहिरीतील सिमेंटच्या गोल राऊंड असलेल्या जईच्यावरती पाणी पातळी असावी. त्या पाण्यात कोल्हा पडला असावा. मात्र शेतकऱ्याने विहिरीवरील मोटर सुरू केल्यानंतर दुपारपर्यंत पाणी पातळी जसजशी खाली जाईल, तसा कोल्हा आधारासाठी जईवर जाऊन बसला असावा, अशी शक्यता वनपाल अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर