शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ऊसदराबाबत आळी मिळी गुप चिळी, बळीराजाचे कान निर्णयाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 14:32 IST

साखर कारखाने सुरू होण्याची वेळ आली आहे. परंतु तालुक्यातील सर्वच साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत आळी मिळी गुप चिळीची भूमिका घेणे पसंत केले आहे. यंदा उसाचा पहिला हप्ता किती दिला जाणार? याबाबत चारपैकी एकाही साखर कारखान्याकडून वाच्यता होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

ठळक मुद्देकारखान्यांत ऊस दराबाबत स्पर्धा फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांचे एकमेकांकडे लक्षऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

फलटण , दि. २७ :  साखर कारखाने सुरू होण्याची वेळ आली आहे. परंतु तालुक्यातील सर्वच साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत आळी मिळी गुप चिळीची भूमिका घेणे पसंत केले आहे. यंदा उसाचा पहिला हप्ता किती दिला जाणार? दराबाबत चारपैकी एकाही साखर कारखान्याकडून वाच्यता होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

फलटण तालुक्यात एक सहकारी आणि तीन खासगी कारखाने आहेत. यावेळी चारही कारखान्यांत दराबाबत स्पर्धा असेल; पण नीरा खोऱ्यातील इतर कारखान्यातही तालुक्यातील ऊस जातो. त्यामुळे इतर कारखाने काय दर देतात, याबाबत सर्वजण लक्ष ठेवून आहेत.राज्यात ऊसदर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाही, अशी गर्जना करणाऱ्या शेतकरी संघटनांची ही केवळ वल्गना ठरतेय की काय, अशी परिस्थिती दिसत आहे.

मंत्री सदाभाऊ खोत व खासदार राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांबद्दल खरोखरच आस्था आहे की, एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी व आपली ताकद दाखविण्यासाठी आमचा वापर केला जाता आहे, असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. दोघेही यंदा उसाचा पहिला हप्ता किंवा उसाचा दर किती दिला पाहिजे, हे जाहीर करीत नसल्याचे शेतकऱ्यांना स्पष्ट दिसत आहे.

सरकारने १ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्यासाठी परवागनी देऊन यंदा साडेनऊ टक्के साखर उताऱ्यांस २ हजार ५५० एफआरपी जाहीर केली आहे. त्यामुळे पहिला हप्ता किमान त्यापेक्षा अधिक मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

अनेक कारखाने नियमाप्रमाणे एफआरपी देऊन मोकळे होतात. नंतर वाढीव दर देत नाहीत म्हणून शेतकरी संघटना एकाच वेळी उसाचा दर ठरवून मागत आहेत. परंतु कारखानदारांकडून कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही. हे शेतकऱ्यांना अस्वस्थ करत आहे. दरांची कोंडी कोणता साखर कारखानदार फोडणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतकरी संघटनेची भूमिकाही महत्त्वाचीऊसदर जाहीर होईल; पण तो दर साखर कारखानदार देणार का? असाही नंतर वादाचा मुद्दा असणार आहे. कारखान्याकडून दर पंधरवड्याचे ऊस बिल त्यांच्या पुढील आठवड्यानंतर दिले जाते. त्यामुळे १ नोंव्हेबरला कारखाने सुरू झाले तर २१ नोव्हेबरपर्यंत पहिला हप्ता किती द्यायचा, हे ठरवता येणार आहे. कदाचित त्यामुळे शेतकरी संघटना काय भूमिका घेते? हे पाहून हप्त्याचे पाहू या विचारातून कारखान्याच्या गोटातून शांतता पाहायला मिळते.

टॅग्स :FarmerशेतकरीSadabhau Khotसदाभाउ खोत