शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

ऊसदराबाबत आळी मिळी गुप चिळी, बळीराजाचे कान निर्णयाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 14:32 IST

साखर कारखाने सुरू होण्याची वेळ आली आहे. परंतु तालुक्यातील सर्वच साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत आळी मिळी गुप चिळीची भूमिका घेणे पसंत केले आहे. यंदा उसाचा पहिला हप्ता किती दिला जाणार? याबाबत चारपैकी एकाही साखर कारखान्याकडून वाच्यता होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

ठळक मुद्देकारखान्यांत ऊस दराबाबत स्पर्धा फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांचे एकमेकांकडे लक्षऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

फलटण , दि. २७ :  साखर कारखाने सुरू होण्याची वेळ आली आहे. परंतु तालुक्यातील सर्वच साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत आळी मिळी गुप चिळीची भूमिका घेणे पसंत केले आहे. यंदा उसाचा पहिला हप्ता किती दिला जाणार? दराबाबत चारपैकी एकाही साखर कारखान्याकडून वाच्यता होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

फलटण तालुक्यात एक सहकारी आणि तीन खासगी कारखाने आहेत. यावेळी चारही कारखान्यांत दराबाबत स्पर्धा असेल; पण नीरा खोऱ्यातील इतर कारखान्यातही तालुक्यातील ऊस जातो. त्यामुळे इतर कारखाने काय दर देतात, याबाबत सर्वजण लक्ष ठेवून आहेत.राज्यात ऊसदर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाही, अशी गर्जना करणाऱ्या शेतकरी संघटनांची ही केवळ वल्गना ठरतेय की काय, अशी परिस्थिती दिसत आहे.

मंत्री सदाभाऊ खोत व खासदार राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांबद्दल खरोखरच आस्था आहे की, एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी व आपली ताकद दाखविण्यासाठी आमचा वापर केला जाता आहे, असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. दोघेही यंदा उसाचा पहिला हप्ता किंवा उसाचा दर किती दिला पाहिजे, हे जाहीर करीत नसल्याचे शेतकऱ्यांना स्पष्ट दिसत आहे.

सरकारने १ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्यासाठी परवागनी देऊन यंदा साडेनऊ टक्के साखर उताऱ्यांस २ हजार ५५० एफआरपी जाहीर केली आहे. त्यामुळे पहिला हप्ता किमान त्यापेक्षा अधिक मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

अनेक कारखाने नियमाप्रमाणे एफआरपी देऊन मोकळे होतात. नंतर वाढीव दर देत नाहीत म्हणून शेतकरी संघटना एकाच वेळी उसाचा दर ठरवून मागत आहेत. परंतु कारखानदारांकडून कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही. हे शेतकऱ्यांना अस्वस्थ करत आहे. दरांची कोंडी कोणता साखर कारखानदार फोडणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतकरी संघटनेची भूमिकाही महत्त्वाचीऊसदर जाहीर होईल; पण तो दर साखर कारखानदार देणार का? असाही नंतर वादाचा मुद्दा असणार आहे. कारखान्याकडून दर पंधरवड्याचे ऊस बिल त्यांच्या पुढील आठवड्यानंतर दिले जाते. त्यामुळे १ नोंव्हेबरला कारखाने सुरू झाले तर २१ नोव्हेबरपर्यंत पहिला हप्ता किती द्यायचा, हे ठरवता येणार आहे. कदाचित त्यामुळे शेतकरी संघटना काय भूमिका घेते? हे पाहून हप्त्याचे पाहू या विचारातून कारखान्याच्या गोटातून शांतता पाहायला मिळते.

टॅग्स :FarmerशेतकरीSadabhau Khotसदाभाउ खोत