शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जरंडेश्वर बाबत रस्त्यावर उतरुन ईडी ला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 13:05 IST

Sugar factory Koregaon Satara : कोरेगावचा जरंडेश्वर कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडी ला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.

ठळक मुद्देजरंडेश्वर बाबत रस्त्यावर उतरुन ईडी ला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदेदेऊर येथील ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात आव्हान

कोरेगाव : कोरेगावचा जरंडेश्वर कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडी ला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.

 

जरंडेश्वर कारखाना हा जिल्हाची प्रमुख अर्थवाहिनी आहे. ५० हजार शेतकऱ्यांना न्याय देणारा,१५ लाख मे टन गाळप करणारा, सातारा जिल्ह्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा, जिल्हा बँकेला ७ कोटी चा फायदा मिळवून देणारा, अनेकांचे संसार उभा करणारा हा कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडीला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.देऊर ता कोरेगाव येथील मुधाई मंगल कार्यालयात जरंडेश्वर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे बोलत होते.

यावेळी जि. प. कृषी सभापती मंगेश धुमाळ, बिचुकले सरपंच प्रशांत पवार, माजी प्राचार्य गुलाबसिग कदम, निलेश जगदाळे, नरशिंग दिसले, शंकरराव कदम, रमेश कदम, सह्याद्री बँकेचे संचालक दिलीप कदम, गजानन मोरे, वैशाली सुतार, कविता देशमुख, राजेंद्र कदम, धनसिग शिंदे, संदीप भोसले, निलेश कदम उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याबाबत ईडी ने कारवाई सुरू केली आहे. खरंतर ईडी ने कायदेशीर मार्गाने ही लढाई सुरू ठेवावी. यात जे काही समोर येईल ते येईल पण कोणत्याही परस्थितीत हा कारखाना बंद ठेऊ नये. यासाठी हे जनजागृती आंदोलन सुरु आहे.

सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावागावात या बाबत मेळावे घेऊन त्यानंतर एक निवेदन ईडी ला दिले जाईल. या निवेदनाबाबतीत सकारात्मक भूमिका दाखवली तर सहकार्य करू मात्र विरोध केला तर रस्त्यावर उतरून विरोध करु. ही भूमिका घ्यावी लागेल असे आमदार शिंदे म्हणाले.काहीही झालं तरी जरंडेश्वर चुकीच्या पध्दतीने बंद पडू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे. हा कारखाना आजही सुरू आहे. तो सुरुच राहील पण जर कोणी याला टाळा ठोकण्यासाठी आलं तर ५० हजार शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल अशी भूमिका आमदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

एक साखर कारखाना बंद राहिला तर किती मोठे नुकसान होत याची जाणीव आहे. हा कारखाना ज्यांच्या मुळे बंद झाला, त्यानंतर या कारखान्यासाठी अनेक व्यवस्था या ठिकाणी आल्या त्यांना ही या लोकांनी हकलून दिले. आज ही मंडळी दिल्लीला जाऊन आली त्यांनी हा कारखाना ईडी ने चालवावा अशी भूमिका मांडली किंवा सक्षम माणसाला चालवण्यासाठी द्या अशी मागणी दिल्लीत एका नेत्यांना केली.

खरं तर ज्यांच्यामुळे या कारखान्याचा लिलाव झाला ही मंडळी आज कारखाना परत मिळवण्यासाठी धरपडत आहेत. काहींनी तर कारखाना परत ताब्यात आल्याचा आनंद साखर वाटून केला.अडीच हजार गाळप क्षमता असलेला जरंडेश्वर आज जिल्ह्यात सर्वाधिक साडे बारा हजार गाळप प्रतिदिन करत आहे. चांगला दर देण्या बरोबरच जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांच्या उसाला समाधान कारक दर देत आहे. कामगारांना वेळेत पगार देत आहे. असं असताना चुकीच्या पध्दतीने हा कारखाना कोण बंद पाडत असेल तर जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली जाईल.प्रास्तविक शांताराम दोरके यांनी तर प्रा गुलाबसिग कदम, सरपंच प्रशांत पवार, कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेShashikant Shindeशशिकांत शिंदेSatara areaसातारा परिसरkoregaon-acकोरेगाव