शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जे पाजतील नवऱ्याला दारू त्याला निवडणुकीत नोटा मारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:39 IST

सातारा : निवडणुकीत मतदारांना दारूचे आमिष दाखवून पार्ट्या देणा-या नेत्यांच्या विरोधात दारूमुक्ती आंदोलनाने मोहीम सुरू केली आहे. ‘जे पाजतील ...

सातारा : निवडणुकीत मतदारांना दारूचे आमिष दाखवून पार्ट्या देणा-या नेत्यांच्या विरोधात दारूमुक्ती आंदोलनाने मोहीम सुरू केली आहे. ‘जे पाजतील नव-याला दारू, त्याला निवडणुकीत नोटा मारू’ असे फलक आणि पत्रकांचे वाटप करून मतदारांमध्ये जागृती करण्याचे संघटनेने ठरवले आहे.

राज्यात सुमारे १२ हजार गावांत व मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था, नगर पंचायती आदी ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये उमेदवार व त्यांचे पाठीराखे राजकीय पक्षाचे नेते मतदारांना विविध आमिषे दाखवितात; मटण व दारू सर्रास पाजतात. निवडणूक कालखंडात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असते. युवकांनाही दारू पाजून ते व्यसनाच्या आहारी जाऊन, व्यसनी होतात. हे चित्र प्रत्येक निवडणुकीत बघायला मिळते.

राज्यातील निवडणूक कालखंडात निवडणूक होणा-या क्षेत्रात अवैध व वैध दारू विक्रीला नियंत्रण राहावे यासाठी दारूबंदीसाठी काम करणा-या राज्यातील संस्था, संघटनांनी राज्य निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उत्पादन शुक्ल विभागाला निवेदने पाठविली आहेत. निवडणूक कालखंडात निवडणूक क्षेत्रात पूर्णपणे दारू विक्रीवर नियंत्रण, गावात पोलीसांचा पहारा, परिसरातील बियर शॉपी, दारू दुकाने, धाबे नियमबाह्य दारू विक्री करणार नाहीत, रात्री उघडे ठेवणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. अनेक महिला संस्था, संघटनांनी गाव परिसरात ‘जे पाजतील माझ्या नव-याला दारू, त्या उमेदवारांना नोटा मारू, जे पक्ष पाजतील दारू-त्यांना कधीच मतदान ना करू’ अशी प्रचार पत्रके काढून, फलक लावून मिरवणूक गावात काढणार आहेत. या उपक्रमात दारूमुक्ती आंदोलनाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सहभागी होणार आहेत.

या आंदोलनाचे संयोजन भाई रजनीकांत यांनी केले आहे. जिल्हानिहाय जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्धाला पुष्पा झाडे, यवतमाळला रवी गावंडे, दिलीप भोयर, वाशिम मदन येवले, अकोला राहुल राऊत, राज्य संघटिका रत्नाबाई खंडारे, बुलडाणा अ‍ॅड. रत्नमाला गवई, लताबाई राजपूत; व्यसनमुक्ती राज्य सन्मान पुरस्कार प्राप्त माया धांडे, हिंगोली विशाल अग्रवाल, सातारा अ‍ॅड. वर्षा देशपांडे, शालिनीबाई वाघमारे, पुणे विभागीय संघटक अ‍ॅड. संतोष मस्के, अहमदनगर देवराव अंभोरे, नांदेड बळवंतराव मोरे, अमरावती डॉ. धर्मेंद्र राजपूत, नरेंद्र बैस, रायगड-संतोष ढोरे, गडचिरोली सर्च संस्था, मुक्तिपथ दल, डॉ. अभय बंग, भारतीय जनसंसद अहमदनगरचे प्रदेश अध्यक्ष अशोक सब्बन, हेरंब कुलकर्णी, अ‍ॅड. रंजना गवांदे आदी संस्थेचे प्रमुख सहभागी आहेत.

कोट :

लोकशाही मानणा-या आणि मतदानाचा हक्क बजावणा-या मतदाराला मतासाठी दारूचे आमिष दाखविण्याचे फॅड कुटुंबातल्या महिलांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकींपासूनच या पध्दतीवर अंकुश आणण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.

- अ‍ॅड. वर्षा देशपांडे, सातारा

.............