शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

छाताडावर बसून मराठा समाजाला आरक्षण घेऊ, मनोज जरांगे यांचा इशारा

By नितीन काळेल | Updated: October 20, 2023 23:09 IST

यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. रात्री दहाच्या सुमारास ही सभा संपली.

सातारा : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने ३० दिवसांचा वेळ मागितला. पण, आपण ४० दिवस दिले. आता मराठा समाज आरक्षणाचे हे पहिले आणि शेवटचे आंदोलन आहे. राज्यात आणि देशातही मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवणारी एकही शक्ती नाही. कारण, मराठा समाज छाताडावर बसून आरक्षण घेईल. शासनाला आता सुट्टी नाही,’ असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. फलटण येथे मराठा आरक्षण संदर्भात आयोजित सभेत जरांगे-पाटील बोलत होते. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. रात्री दहाच्या सुमारास ही सभा संपली.

मनोज जरांगे म्हणाले, ‘मराठा समाजाची दोन अंगे आहेत. मराठा क्षत्रीय असून त्याला लढायचं कसं ते माहीत आहे. तसेच शेती करुनही तो देशाला अन्न पुरवतो. आज मराठा समाज राज्यात सर्वत्र असून त्यांचं रक्ताचं नातं आहे. मराठा समाजाला सर्व निकषात बसूनही आरक्षण मिळत नाही. त्यामुळे आरक्षणाचा हा लढा ताकदीने लढायचा आहे. त्याचबरोबर पाच हजार पानांचा पुरावा मिळाला असून सरकारनेही वळवळ न करता आरक्षण द्यावे.

मराठा आणि कुणबी एक आहेत. त्यांनी कधी जात पाहिली नाही. पक्ष आणि नेतेही मोठे केले, असे सांगून जरांगे-पाटील पुढे म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षणाची पुन्हा संधी नाही. या संधीचे सोने करुया. पहिला आणि शेवटचा लढा आहे. आपल्यात फूट पडू न देता आरक्षणाचे पुण्य पदरात पाडून घेऊया. कारण, सरकारने वेळ मागून घेतल्याने ते कोंडीत आहेत. तर आपली कसोटी सुरू आहे. महाराष्ट्रातील ही लाट उसळली असून अनेक पिढ्यांची खदखद बाहेर पडली आहे.

२२ ऑक्टोबरला पुढील दिशा... मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाकडे चार दिवस आहेत. त्यांनी त्यापूर्वी आरक्षण द्यावे. नाहीतर २२ आॅक्टोबरला आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार आहे. अंधारात नाही तर मराठा समाजाला बरोबर घेऊन निर्णय घेणार, आंदोलन कसे करायचे हे ठरविणार, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी या सभेतून दिला.

जरांगे -पाटील यांनी दिलेले सल्ले...- मराठा समाजाची टीम तयार करुन गावांगावात जागृती करा.- आंदोलन शांततेत करा. जाळपोळ आणि उद्रेक अजिबात करु नका.- आरक्षणासाठी आत्महत्या करु नका. तरुणांनी आत्महत्या केली तर आरक्षण कुणासाठी मागायचे.- पहिला आणि शेवटचा लढा. आपल्यात मतभेद होऊ देऊ नका.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील