शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; कोयनेला १० मिलीमीटरची नोंद

By नितीन काळेल | Updated: June 13, 2024 20:11 IST

सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात अजून पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली नाही.

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून असलेला पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक २४ तर महाबळेश्वर येथे १२ आणि कोयनानगर येथे १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व भागातही तुरळक ठकिकाणी पाऊस पडला. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात अजून पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली नाही.

जिल्ह्यात मागील आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला. त्यामुळे सहा दिवस पाऊस पडत होता. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह कांदाटी खोऱ्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. तसेच भात खाचरातही पाणी साचले. यामुळे शेतकऱ्यांची भात लागणीची गडबड सुरू झाली आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. एक जूनपासून कोयनेला १८१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर नवजाला २२८ आणि महाबळेश्वर येथे १८३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तरीही अजुनही कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झालेली नाही. सध्या धरणात १५.१७ टीएमसी एेवढा पाणीसाठा आहे. पाणीसाठ्याची टक्केवारी १४.४१ आहे. तर धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

पूर्व भागातही चांगला पाऊस झाला आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात मागील सात महिन्यांपासून दुष्काळ होता. पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला. पण, मागील आठ दिवसांतील पावसाने सर्व चित्र बदलले आहे. या तालुक्यांतील जवळपास सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. रानात पाणी साचून राहिले. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वापसा आल्यानंतर सुरूवात होऊ शकते. तर मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. काही ठिकाणीच तुरळक स्वरुपात पाऊस होत आहे.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर