शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; कोयनेला १० मिलीमीटरची नोंद

By नितीन काळेल | Updated: June 13, 2024 20:11 IST

सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात अजून पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली नाही.

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून असलेला पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक २४ तर महाबळेश्वर येथे १२ आणि कोयनानगर येथे १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व भागातही तुरळक ठकिकाणी पाऊस पडला. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात अजून पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली नाही.

जिल्ह्यात मागील आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला. त्यामुळे सहा दिवस पाऊस पडत होता. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह कांदाटी खोऱ्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. तसेच भात खाचरातही पाणी साचले. यामुळे शेतकऱ्यांची भात लागणीची गडबड सुरू झाली आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. एक जूनपासून कोयनेला १८१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर नवजाला २२८ आणि महाबळेश्वर येथे १८३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तरीही अजुनही कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झालेली नाही. सध्या धरणात १५.१७ टीएमसी एेवढा पाणीसाठा आहे. पाणीसाठ्याची टक्केवारी १४.४१ आहे. तर धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

पूर्व भागातही चांगला पाऊस झाला आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात मागील सात महिन्यांपासून दुष्काळ होता. पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला. पण, मागील आठ दिवसांतील पावसाने सर्व चित्र बदलले आहे. या तालुक्यांतील जवळपास सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. रानात पाणी साचून राहिले. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वापसा आल्यानंतर सुरूवात होऊ शकते. तर मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. काही ठिकाणीच तुरळक स्वरुपात पाऊस होत आहे.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर