शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Satara: पावसाची उघडीप; चार महिन्यांत नवजाला साडे पाच हजार मिलीमीटर पर्जन्यमान 

By नितीन काळेल | Updated: September 29, 2023 18:20 IST

कोयना धरणातील पाणीसाठा किती..जाणून घ्या

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असली तरी चार महिन्यात नवजा येथे तब्बल साडे पाच हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान झाले आहे. तर महाबळेश्वरच्या पावसानेही पाच हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. कोयना परिसरात पाऊस कमी असून धरणातील पाणीसाठा ९२ टीएमसीच्यावर गेला आहे.जिल्ह्यात जूनपासून सप्टेंबरपर्यंतचे चार महिने पावसाळ्याचे समजले जातात. या महिन्यात पडणाऱ्या पावसावरच खरीप आणि रब्बी हंगामाचे गणित अवलंबून असते. तसेच पिण्याचे आणि शेती पाण्याचा प्रश्नही अवलंबून असतो. पण, यावर्षी पावसाने जिल्हावासीयांना दगा दिलेला आहे. यंदा आतापर्यंत तरी अपुरे पर्जन्यमान झालेले आहे. तर मान्सूनचा पाऊसही उशिरा दाखल झाला होता.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धरला. त्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत धो-धो पाऊस कोसळत होता. यामुळे पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. तर अनेक मार्गावर दरडी कोसळल्या होत्या. पण, आॅगस्ट महिन्यात कमी पाऊस झाला. तसेच सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नाही. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासण्याची चिन्हे आहेत.पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. यातील बलकवडी आणि तारळी ही धरणेच भरल्यात जमा आहेत. तर इतर धरणांत ६० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा झालेला आहे. आता पाऊस झाल्यास ही धरणे भरणार आहेत. अन्यथा धरणे भरणे शक्य नाही. त्यातच कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पण, धरण भरण्यासाठी अजून १२ टीएमसीवर पाण्याची गरज आहे. तर उरमोडी धरणातून जिल्ह्याच्या पूर्व भागात सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. सध्या हे धरण ६० टक्केही भरलेले नाही. त्यामुळे अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे.

कोयनेला ३९२८ मिलीमीटर पाऊस..जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस होतो. याकाळात पश्चिमेकडील कोयनानगर, नवजा, तापोळा, महाबळेश्वर या भागात तुफान वृष्टी होते. त्यामुळे येथील पाऊस पाच-सहा हजार मिलीमीटरचा टप्पा पार करतो. या भागात आतापर्यंतच्या चार महिन्यात नवजाला सर्वाधिक ५५५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यानंतर महाबळेश्वरला ५३४७ मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगरला कमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ३९२८ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तर कोयना धरणात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील आवक एकदम कमी झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण