शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

खेड्यात थोडा उजेड सोडा, अंधार फार झाला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

ओगलेवाडी : बीज बिलाची रक्कम न भरल्याने महावितरणने ग्रामपंचायतीचे पथदिव्याची वीज जोडणी खंडित केली आहे. यामुळे ग्रामीण भाग अंधारात ...

ओगलेवाडी : बीज बिलाची रक्कम न भरल्याने महावितरणने ग्रामपंचायतीचे पथदिव्याची वीज जोडणी खंडित केली आहे. यामुळे ग्रामीण भाग अंधारात बुडालेला आहे. कोरोनामुळे पंचायतीच्या वसूल कमी झाला आहे. यामुळे सद्या वीज बिल भरणे ग्रामपंचायतीला शक्य नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शासनाने वीजबिल भरून ग्रामीण भागातील पथदिवे सुरू करावेत आणि ग्रामीण भाग प्रकाशित करावा, अशी मागणी ग्रामीण लोक करीत आहेत.

मागील काही वर्षांत गावातील पथदिव्याचे वीजबिल हे ग्रामविकास खात्यामार्फत मिळणारे अनुदानातून जिल्हाधिकारी भरत होते. मात्र सध्या शासनाने हे वीजबिल ग्रामपंचायतीने भरावे, असा निर्णय केला व तशा सूचना दिल्या आहेत. या सूचनांनंतर महावितरणने वीज बिल भरण्याचा तगादा लावला. ज्या ग्रामपंचायतीनी वीज बिल भरले नाही त्या गावातील पथदिव्याची वीज जोडणी खंडित केली. त्यामुळे ग्रामीण भागात पूर्ण अंधार होत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत या दिवसात अंधार खूप असतो आणि वीज ही नसल्याने अधिकच अंधार होत आहे.

कोरोनामुळे सर्वाचे उत्पन्न घटले आहे. यामुळे नागरिकांना घरपट्टी पाणीपट्टी आणि इतर कर भरताना अनेक अडचणी येत आहेत. अनेकजण कर भरण्यासाठी अक्षम आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न प्रचंड मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करणे आणि उरलेल्या रकमेतून विकासकामे करायची का वीजबिल भरायचे हा मोठा प्रश्न ग्रामपंचायतीचे समोर उभा आहे. वीजबिलाची रक्कम मोठी असल्याने ती भरणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने वीजबिलाची रक्कम भरावी अशीच मागणी होत आहे. शासनाने याबाबत तातडीने पावले उचलून ग्रामपंचायतीला आणि ग्रामीण भागाला दिलासा द्यावा व पथ पुन्हा एकदा प्रकाशमान व्हावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

चौकट

पथदिव्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.

ग्रामीण भागातील पथदिवे बंद असल्याने आणि सद्या ग्रामपंचायती वीज बिल भरण्यासाठी सक्षम नसल्याने शासनाने तत्काळ वीज रक्कम भरावी आणि हा प्रश्न निकाली काढावा अन्यथा आंदोलन करणार आहे. तहसीलदारांकडे ही लवकरच निवेदन देण्यात येणार आहे.

- रामकृष्ण वेताळ,

सचिव, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा

चौकट 2

शासनाने सहकार्य करावे

सध्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न घटले असल्याने जमा आणि खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण झाले आहे. उत्पन्न कमी आणि कोरोनाचा भार असे दुहेरी संकट आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे शासनाने वीज बिल भरून सहकार्य करावे, अशी मागणी कऱ्हाड तालुक्यातील फत्तेसिंह जाधव सरपंच सैदापूर, ता. कराड