शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यात थोडा उजेड सोडा, अंधार फार झाला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

ओगलेवाडी : बीज बिलाची रक्कम न भरल्याने महावितरणने ग्रामपंचायतीचे पथदिव्याची वीज जोडणी खंडित केली आहे. यामुळे ग्रामीण भाग अंधारात ...

ओगलेवाडी : बीज बिलाची रक्कम न भरल्याने महावितरणने ग्रामपंचायतीचे पथदिव्याची वीज जोडणी खंडित केली आहे. यामुळे ग्रामीण भाग अंधारात बुडालेला आहे. कोरोनामुळे पंचायतीच्या वसूल कमी झाला आहे. यामुळे सद्या वीज बिल भरणे ग्रामपंचायतीला शक्य नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शासनाने वीजबिल भरून ग्रामीण भागातील पथदिवे सुरू करावेत आणि ग्रामीण भाग प्रकाशित करावा, अशी मागणी ग्रामीण लोक करीत आहेत.

मागील काही वर्षांत गावातील पथदिव्याचे वीजबिल हे ग्रामविकास खात्यामार्फत मिळणारे अनुदानातून जिल्हाधिकारी भरत होते. मात्र सध्या शासनाने हे वीजबिल ग्रामपंचायतीने भरावे, असा निर्णय केला व तशा सूचना दिल्या आहेत. या सूचनांनंतर महावितरणने वीज बिल भरण्याचा तगादा लावला. ज्या ग्रामपंचायतीनी वीज बिल भरले नाही त्या गावातील पथदिव्याची वीज जोडणी खंडित केली. त्यामुळे ग्रामीण भागात पूर्ण अंधार होत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत या दिवसात अंधार खूप असतो आणि वीज ही नसल्याने अधिकच अंधार होत आहे.

कोरोनामुळे सर्वाचे उत्पन्न घटले आहे. यामुळे नागरिकांना घरपट्टी पाणीपट्टी आणि इतर कर भरताना अनेक अडचणी येत आहेत. अनेकजण कर भरण्यासाठी अक्षम आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न प्रचंड मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करणे आणि उरलेल्या रकमेतून विकासकामे करायची का वीजबिल भरायचे हा मोठा प्रश्न ग्रामपंचायतीचे समोर उभा आहे. वीजबिलाची रक्कम मोठी असल्याने ती भरणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने वीजबिलाची रक्कम भरावी अशीच मागणी होत आहे. शासनाने याबाबत तातडीने पावले उचलून ग्रामपंचायतीला आणि ग्रामीण भागाला दिलासा द्यावा व पथ पुन्हा एकदा प्रकाशमान व्हावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

चौकट

पथदिव्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.

ग्रामीण भागातील पथदिवे बंद असल्याने आणि सद्या ग्रामपंचायती वीज बिल भरण्यासाठी सक्षम नसल्याने शासनाने तत्काळ वीज रक्कम भरावी आणि हा प्रश्न निकाली काढावा अन्यथा आंदोलन करणार आहे. तहसीलदारांकडे ही लवकरच निवेदन देण्यात येणार आहे.

- रामकृष्ण वेताळ,

सचिव, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा

चौकट 2

शासनाने सहकार्य करावे

सध्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न घटले असल्याने जमा आणि खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण झाले आहे. उत्पन्न कमी आणि कोरोनाचा भार असे दुहेरी संकट आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे शासनाने वीज बिल भरून सहकार्य करावे, अशी मागणी कऱ्हाड तालुक्यातील फत्तेसिंह जाधव सरपंच सैदापूर, ता. कराड